Friday, November 26, 2010

कविता रसग्रहण

शब्द
शब्दांत एवढ सामर्थ्य असत की
त्याच्या तोडीला कोणीच नसत
म्हणूनच बनतात लेखक-कवि शब्द
शब्दच त्यांची किर्ती पसरवतो
शब्दानेच बनतो आशेचा किरण
त्याला व्यक्त करते कवीह मन
जीवन एक सुरेल सुरेख संगीत आहे
त्याला साद देतांना होते
शब्दांचे गीत
प्रकट होत असते शब्दांतून प्रत्येक भावना
यासाठीच शब्दांची
साथ हवी जीवना
शब्दांच्या बलावर
मीही झेप घेइन आकाशी
यासाठीच तर्
जोडीन शब्दांना आयुष्याशी
कवितेत शब्द वापरीन
मी हृदयस्पर्शी
आणि सर्वांची स्तुती
मिळवील साजेशी
शब्दांचा दोर हवा
जीवनाच्या पतंगाला
तरच तो पतंगहि भिडेल
विशाल गगनाला
सर्व कला गुण संपन्न असा हा शब्द
चंद्र,सूर्य,ता~यांना करितो स्तब्ध
-स्वप्नल उगले
संदर्भ:दैनिक केसरी(१९९९)

अगदी रोमांच उठलाय अंगावर आज पुन्हा ही कविता वाचून्.स्वप्नलची माझ्या बालमैत्रीणीची ही कविता आहे.she is dynamic,Brilliant girl.
ही कविता तिने लिहली वयाच्या १३ व्या वर्षी....
अगदी कोणालाही प्रेरणा देणारी कविता आहे.शब्द गुंफून या कवितेतून पंतगाची दोर शब्दांना करून ती पोहचली आहे चंद्र सूर्यापर्यंत....शब्दांचा गोडवा लागावा अशी ही सुंदर मुक्तछंद रचना...
शब्दांमध्ये ताकद आहे थांबलेल,भांबावलेल आयुष्य पुढे पुढे नेण्याच ,फुलवायच..शब्द जर अनुभवातून घडले तर लेखणीच आणि रसिकांच अहो भाग्यच ठरत.पण 'जे ना देखे रवि ते ते देखे कवि' या उक्तीप्रमाणे जर भविष्यातील कल्पना लेखणिच्या साथीने 'शब्दांनी'मांडल्या की स्वप्नलने लिहलेली कवितात्याच भविष्याची कल्पनेची साद देते.'शब्द'साधना करणे हे जीवनफुलाला भूत-वर्त-भविष्यकाळाला जवळ करण्यासारख आहे.
-भक्त्ती

No comments: