Saturday, May 4, 2024

सेपियन- पुस्तक परिचय

 




युवल नोव्हल हरारी हे नाव आता कोणाला माहित नाही हे फार कमी आहे. आपण कोण आहोत? आपण इथपर्यंत कसे आलो? येताना काय काय मागे सुटले आहे ?काय काय गाठोड घेऊन इथे आलो आहोत? ते गाठोड आहे का ते ओझं आहे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हा माणूस एका झटक्यात (ह्या पुस्तकात) देतो. याचा अभ्यास इतका दांडगा आहे की त्याने अशा गहन विषयांवर सोपी वाटणारी अनेक पुस्तके लिहिले आहेत. पण हे पुस्तक जे आहे 'होमो सेपियन' हे पुस्तक  2012 म्हणजे जवळपास आज पासून बारा वर्षांपूर्वी दिलेले आहे. म्हणजे पुस्तक मला उशीरच मिळाले आहे. हे पुस्तकाची सुरुवातच होते ते पृथ्वीच्या उत्पत्तीपासून ज्यामध्ये पहिल्यांदा अणू येतात.मग त्यांपासून पदार्थ बनतात या पदार्थांपासून जीव बनतात आणि मग ह्या जीवांमध्ये हळूहळू उत्क्रांती होत होत माणूस ते शहाणा माणूस म्हणजे आपण उत्क्रांत होतो.पण ही नैसर्गिक उत्क्रांती होत असतांनाच अनेक प्राण्यांचे अस्तित्व आपण जाणूनबुजून संपवत आलो ही काळी बाजूही यात मांडली आहे.  हळूहळू इतर प्राणी व इतर आपल्याच प्रजाती निअंडरथर्ल माणसाला देखील संपून हा होमोसेपियन एकटा जगावर राज्य करत आहे. 

"आपले पूर्वज निसर्गाशी सुखसंवाद करून राहिले हा पर्यावरण प्रेमींच्या म्हणण्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका"... उलट "होमोसैपियन हे सर्वात संहरी प्रजाती होत". उत्क्रांती  दरम्यान होमोसेपियन ज्या ज्या ठिकाणी (खंडात)गेले तेथील प्रजातींचा आश्चर्यकारक विनाश होत गेला. 

होम सैपियन हे  आफ्रिका-आशिया नंतर ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या खंडात जाऊन स्थलांतरित झाले त्याचवेळी तेथे मोठे उलथापालथ झाली.पर्यावरण /हवामान बदलाने की तेथील प्राण्यांचा नाश झाला .परंतु हा योगायोग होमोसेपियन तिथे येणार आणि काही काळातच आणि एवढ्या महाकाळ प्राण्यांचा नाश होणे ही गोष्ट वारंवार घडत गेली.

आपण पाहू शकतो ऑस्ट्रेलियातील जवळपास 24 पैकी 23 मार्सुपिअल प्रजाती (सद्यस्थितीतील प्रसिद्ध कांगारू हा मार्सुपिअल म्हणजेच पिलांना पोटा बाहेरच्या पिशवीत वाढवणारा प्राणी) नष्ट झाल्या.साधारण न्यूझीलंड बाबतीत आहे. आग लावून गवत,झाडे जाळायची.अन्नासाठी गवताळ भागात प्राण्यांना यावे लागत आणि त्यांची शिकार करायची असे होमोसैपियन तत्व होते. त्यामुळेच अग्नी रोधक अशा निलगिरी वनस्पती व  त्यांवर जगणारे अनेक प्राणी वाचले.

ही होमोसैपियनची खुनशी लाट जमिनी पुरतीच होती.पाण्यातले जीव अनेक लक्ष उत्क्रांतीने इथवर पोहचले आहेत.पण आता समुद्री औद्योगिक क्रांतीने हे होमोसैपियन त्यांना पण नष्ट करतील.

हे सगळं घडलं नसतं तर मार्सुपिअल सिंहाचं आज राज्य असतं....



त्याला लागलेल्या शेतीचा शोध एक मोठा भाग म्हणजे स्वावलंबी झाला परंतु निसर्गाच्या विरुद्ध ही गोष्ट होती आणि तो नकळत गुलाम झाला आणि इथूनच गुलामगिरीचा देखील सुरुवात झाली.

उत्क्रांतीचे चलन भूक नाही आणि दुःखही नाही तर ते आहे डीएनएची नक्कल. एखाद्या कंपनीच्या बँकेत किती डॉलर जमा आहेत त्यावर कंपनीचे यश मोजतात कर्मचाऱ्यांच्या समाधानावर नाही. त्याचप्रमाणे प्रजातीतील जातीचे उत्क्रांती विषयक यश तिच्या डीएनएच्या नकलांच्या प्रतिवर मोजले.डीएनए आणखी प्रति शिल्लक नसतील तर जाती कायम नष्ट होऊन जातात एखाद्या जातीच्या अनेक प्रती असल्याची बढाई मारली जाते तेव्हा त्या जातीचे यश आणि तेव्हा त्या जातीची भरभराट होती यातून पाहिलं. तर शंभर पेक्षा हजार प्रती कधीही चांगल्या. 

वाईट परिस्थितीत अधिक लोकांना जिवंत ठेवण्याची क्षमता हीच कृती कृषी क्रांतीचे सार आहे

-युवलहरारी

कृषी क्रांतीने भटक्या सेपियन्सला डोमेस्टिक(घरात बसणारा) केले सेपियन्सने पिकांना माणसाळवल नाही.अशातही गहू ,तांदूळ आणि बटाटा यांच्या शेतीने त्याला पोषणमूल्ये तर नाहीच मिळाले पण कुपोषण व रोगराई वाढले.लोकसंख्येचा भस्मासुर निपजला.

शेतीसाठी खडतर कष्ट उपसून पाठीचा कणा सरकलाच पण हार्निया इतर समस्याही उद्भवला.पिकांवर अवलंबून राहत ,त्यांच्या सुरक्षेखातर अनेक टोळी संघर्ष सुरू झाले.कृषीक्रांती घोडचूक होती जी अनेक पिढ्यांनी comfort zone म्हणून परत परत केली??



मग काय माणसाकडे वेळ, पैसा काय काय यायला लागलं.नाही त्या गोष्टी सुचायला लागल्या .मस्त गोष्टी निर्माण करायला लागला. आणि अनेक संस्कृती निर्माण केल्या. या संस्कृतीमध्ये तो गटात देखील विभागला गेला.

३५,०००-४०,००० हजार वर्षांपूर्वी जर्मनीतल्या प्रागैतिहासिक काळात प्रारंभिक बोधात्मक क्षमता विकसित काळात होमो सेपियन्सने ही मूर्ती घडवली.अन्नसाखळीत तेव्हा सिंह सर्वोच्च होता.पण लवकरच सेपियन्सनी ती जागा घेतली.तरीही सिंहाबद्दलचा नितांत आदर इथे दिसतो आहे का?

कदाचित एक श्रद्धा निर्मितीचे सर्वात प्राचीन उदाहरण!



हे सर्व असतानाच लिपींचा लावलेला शोध कथा रचण्यासाठी मदतच करू लागल्या.

फक्त कायदे करणे आणि आपला प्रतिपाळ करणाऱ्या देवांच्या गोष्टी सांगणं या बाबी मोठी राज्य टिकून ठेवण्यासाठी पुरेशा नव्हत्या. राजाला काहीतरी कर गोळा करावा लागत असे"

-युव्हाल नोव्हा हरारी

पण माणसाची बौद्धिक क्षमतेमुळे हे कर ,त्यांची येणी,बाकी सर्व लक्षात ठेवणार कसे? मग तेव्हा पहिल्यांदा लेखन कलेचा उगम झाला मेसोपोटेमियात ही लेखन आंशिक(चित्र लिपी)होती.म्हणजे केवळ कराची नोंदणी यात होत असे काव्य,नाटक वगैरे गोष्टी यामध्ये लिहिल्या जात नसेल एकंदरीत म्हणजेच गणिती संकल्पना जेव्हा माणूस वापरू लागला तेव्हाच खूप मोठ्या  क्षेत्रासाठी ती उपायुक्त झाले.त्यात ही भारतीयांनी शोधलेले शून्य ते नऊ हे अंक अगदी महत्त्वाचे ठरले परंतु तेव्हा अनेकदा अरबांनी भारतावरती आक्रमण केले होते आणि त्यांनी ही शून्य ते नऊ ही अंक पद्धती जगाला ज्ञात करून दिली.युव्हाल म्हणतोय लिपी प्रथम मेसोपोटेमियात शोधली पण नक्कीच इतरत्रही ती विकसित होत असणारं.



जसा हरारी काय म्हणतो की या सगळ्या गोष्टी माणसाने रचलेल्या कथा आहेत मी ह्याच कथांवर विश्वास ठेवून माणूस अजून एकमेकांशी भांडत आहे माझा धर्म श्रेष्ठ की तुझा धर्म श्रेष्ठ? माझा माझं राज्य श्रेष्ठ की तुझा राज्यश्रेष्ठ? ब्ला ब्ला ब्ला ...

हे सगळं घडत असतांना निसर्गाने केले नाही इतका भेदभाव शहाण्या माणसाने सर्वत्र सुरू केला.याच्या अधिक बळी पडल्या स्त्रिया..

डिस्क्रिमिनेशन म्हणजेच भेदभाव जगात काळे -गोरे, श्रीमंत- गरीब, स्वतंत्र -गुलाम अशा प्रकारचे भेदभाव चालत आलेले आहेत आणि हे दुष्टचक्र अजूनही संपले नाहीये. तो आणि ती म्हणजेच लिंग भेदभाव पण आहेत.हे निसर्गनिर्मित नाही तर मानवनिर्मित आहेत. तसेच आपण पाहतो की पितृसत्ताक  हे जगामध्ये जास्त ठिकाणी आहे. 

हरारी म्हणतो,

 "या सगळ्या नाट्यमय बदलांमुळेच लिंगभावाचा इतिहास चक्रावून टाकणारा ठरतो पितृसत्ताक पद्धती जैविक घटकांवर आधारित नसून निराधार पूरा कथान वर आधारित असल्याचे आज स्पष्टपणे दिसून येत आहे मग असा प्रश्न उपस्थित होतो की पितृसत्ताक व्यवस्थेला विश्वव्यापकता आणि स्थैर्य या गोष्टी कशा बरे लाभले असतील?"

फोटोत तेच सांगितले जैविक/निसर्ग कधीच स्त्रीला वेगळं समजत नाही ती मात्र सांस्कृतिक/सामाजिक पातळीवर अनेकदा भेदभावाला बळी पडत राहिली आहे.

पुस्तकात औद्योगिक क्रांती आणि वैज्ञानिक क्रांती यांचा खुप चांगाला आढावा घेतला आहे.अज्ञानाचा शोध आणि  ज्ञानाचा उलगडा ...e=mc2ह्या समीकरणाने सगळं जग बदलून टाकलं. माणूस हे सगळं करत असतानाच निरीक्षण शक्ती लागली त्यातही एका ज्ञानेंद्रियाने देखील आपण निरीक्षण करून त्यामध्ये वेगळे ज्ञान मिळू शकतो. हे निरीक्षण गणितीय साधनांनी केले तर त्याची पूर्णपणे पुष्टी होते. आणि हेच ज्ञान सत्य आहे की नाही ही त्याची खरी कसोटी नसून ते आपल्याला शक्ती देते की नाही याची खरी कसोटी आहे. त्याची उपयुक्तता ठरते .मग त्यालाच आपण उपपत्ती म्हणजेच संशोधन म्हणतो. हे संशोधन आपल्याला नवनिर्मितीसाठी अतिशय समर्थ बनवतात. अजून नवीन ज्ञान तयार करतात पण हे विज्ञान अजूनही स्वतःचे अग्रक्रम रवण्यास असमर्थ आहे. तेव्हा  साम्राज्याने त्याला हाताशी धरले. झालं तर अशाप्रकारे विज्ञानाचा वापर करून शुक्र मार्गक्रमण शिकण्यासाठी समुद्री मोहीम काढल्या गेल्या जगाच्या चार कोपऱ्यांमध्ये या धाडण्यात आल्या. सायबेरिया, उत्तर अमेरिका, मादागस्कर, दक्षिण आफ्रिका पुढे गेलेल्या येथे देखील त्या गेल्या महासागरात देखील त्या गेल्या. पण हे सगळं असताना लक्षात काय आलं की एवढ्या मोठ्या मोहिमा करताना त्यातील काम करणाऱ्या लोकांचा  दूर मोहिमेत मृत्यू  होतं.पण तिथेच स्कर्व्ही रोगाचा शोध लावला आणि आणि ब्रिटिश जेम्स लेंड यांनी सीट्रस फ्रुट देण्याचा सपाटा लावला.तिथे आणि मग काय जादू झाली. सागरी मोहिमांमध्ये विटामिन सी च्या कमतरतेने होणाऱ्या स्कर्वी रोगावर बऱ्या प्रकारे नियंत्रण मिळाल्यावर माणूस लांब लांब समुद्री मार्गाने जायला लागला आणि एक नवीनच विश्व त्याला समजले हिरो के लोकांनी याच्यामध्ये आणि त्यांनी पुढाकार घेतलाच नाही तर व्यापार नावाचे नवे तंत्र जगामध्ये स्थापित केले. आता या मोहिमा काढताना खर्चही लागत असेल आणि मग आला तिथे आणि एक लोकांनी एकत्र येऊन उभारलेली भांडवलशाही आणि या भांडवलशाहीतून होणाऱ्या नफा वेगवेगळ्या उद्योगांमध्ये देण्यात आला. उद्योगाची चक्रे वेगाने फिरली त्यापूर्वी फक्त मसल ऊर्जा किंवा सौर उर्जा याचाच माणूस वापर करत असे.  मग पुढे काय वेगवेगळ्या ठिकाणी वापर करताना वेगवेगळ्या खाण्यांचा शोध घेण्यात आला .मग सापडले अल्युमिनियम अल्युमिनियम हे पूर्वी सोन्यापेक्षा देखील महाग होते. कारण की त्याची उपयुक्तता आणि हाच अल्युमिनियम वापरून पुन्हा एकदा बदलले. 

हे सागरी मोहिमा करत असताना अनेक ठिकाणी लुटमारीचे देखील प्रकार व्हायला लागले. स्थानिक लोकांकडून देखील आक्रमणाचे भीती वाटायला लागली.फक्त राज्याचे सैन्य नाही किंवा राष्ट्राचे सैन्य नाही तर अशी मोठमोठे जहाज देखील स्वतःचे असे वैयक्तिक, पर्सनल सैन्य बाळगू लागले. तिथूनच पुढे महायुद्धाची हळूहळू पार्श्वभूमी बनत होती.

हे सर्व चालू असताना कुठेतरी विजेची ठिणगी पडली एडिसिनच्या डोक्यातच की, अस की आणि मग काय इलेक्ट्रिसिटी देखील आली आणि जगाचा पुन्हा एकदा कायापालट झाला.तो आजपर्यंत सुरू आहे.

पण हे सर्व कशासाठी सुरू आहे सुखासाठीच ना..पण तिथेही ज्या मेंदूतील जीव रसायनांमुळे सुख भावना निर्माण होती.त्या मेंदूला समजून घ्यायला आपण जोमाने सुरूवात केली आहेच..


सेरोटोनिन,डोपामाईन,ओक्सिटोक्सिन ही मेंदूतील जीव रसायने सुख मिळवण्यासाठी कारणीभुत आहेत.पण यांचा स्त्राव होण्याचा कालावधी प्रत्येकीसाठी, वेगवेगळ्या घटनांमध्ये वेगवेगळा असतो.याचीसुद्धा जनुके काही मागच्या पिढीतून मिळतात तर काही उत्क्रांतीसाठी /वंश चालविण्यासाठी हजारो वर्षांपासून बरोबर पुढे जात आहे.

एवढं सर्व असतानाही बाह्य घटकांनी,विचारधारेने बर्याच लोक शहारले जातात.स्थिर जितके राहायला शिकू तितकं मेंदूला समजून घेत राहू.त्यावर विजय मिळवून जग जिंकता राहू..

इति लेखन सीमा

-भक्ती


Monday, April 29, 2024

चॉकलेट आईस्क्रीम

 विना साखर, दूध आईस्क्रीम-

रोज बाहेरचे आईस्क्रीम देण्यापेक्षा घरी थंडा थंडा कूल कूल चॉकलेट


आईस्क्रीम/म्युस केले.विना साखर पदार्थ करायचा म्हणजे खजूर वापारायचे हे सूत्र आहेच.

नुसतं चॉकलेट फ्लेवर ऐवजी केळी पण वापरली.

साहित्य -तीन पिकलेली केळी, आवडीनुसार चॉकलेट कंपाऊंड(डार्क चॉकलेट) कोको पावडर,मखाना/ओट्स सुकामेवा पावडर,सात आठ खजूर

कृती-

चार केळी काप करून फ्रिजमध्ये अर्धा तास ठेवून गार करायचे.नंतर मिक्सरच्या भांड्यात ही थंड झालेली केळीची काप,मखाना सुकामेवा पावडर,  डार्क चॉकलेट बारीक केलेले खजूर टाकून फिरून  टाकायचे.मग चांगले फिरवून घ्यायचे.स्मूद मिश्रण झाल्यावर आवडत्या आकारात ओता.वरतून आवडीनुसार सुकामेवा,ट्रुटीफ्रुटी टाकायची. ३-४ तास डीप फ्रीजमध्ये मिश्रण ठेवायचे.नंतर मस्तपैकी आस्वाद घ्यायचा.मी वड्या केल्या आहेत 

-भक्ती

Sunday, April 28, 2024

ब्राह्मणी बारव आणि इतर पुरातन पाऊलखुणा

 


खूप दिवसापासून ब्राह्मणीची बारव पाहायचं मनात होतं. पण आज ते जुळून आलं. खरं म्हणजे सकाळीच ग्रुप ट्रेकला जायचं होतं पण पण उठायला उशीर झाला सहा साडेसहा वाजले होते. पिंपळगाव माळवीच्या रोडनी चाललो होतो तेव्हा म्हटलं जाऊ या. पुढे वांबोरी चा घाट ओलांडून काही अंतराने वांबोरी गाव लागते‌ गावाच्या सुरुवातीलाच उजवीकडे एक रस्ता जातो.

 तिथे पहिल्यांदा पाहिले ते खोलेश्वर मंदिर पुरातन शंकराचे मंदिर. गाभाऱ्यात पायऱ्या उतरण्यास खोल आहे. मंदिराचा बाह्यभाग अतिशय प्राचीन दिसल्याने सुंदर भासतो. या मंदिरात बाह्य भागावर अनेक मुर्ती कोरल्या आहेत.

पुढेच वांबोरी गावाच्या वेशीतून गेल्यावर एक पुष्करणीच म्हणजेच वाम तीर्थ नावाची जागा आहे. भव्य अशी पुष्करणी तिथे आहे. बाजूलाच एक भग्न मंदिर आहे आणि मागच्या बाजूला देखील पडीक अवस्थेत असलेले शंकराचे मंदिर आहे. वामतीर्थ हे वाल्मिकी ऋषींचे नावांवरून दिलेले आहे (ऐकीव माहिती).

 पुढे आम्ही निघालो ब्राह्मणीची बारव बघायला वांबोरी गावापासून पुढे 12 किलोमीटर वरच ब्राह्मणी गाव आहे.रस्ता अत्यंत चांगला असल्याने प्रवासाचा अजिबात ताण भासत नाही.

ब्राह्मणी बारबापर्यंत पोहोचलो. पुरातत्व खात्याने ही जागा आपल्या ताब्यात घेतल्याने तेथे चांगल्या प्रकारे स्वच्छता व सोय केलेली आहे.

 बारव म्हणजेच स्टेप वेल पायऱ्यांची विहीर. आजूबाजूला तळी अथवा तलाव हा पाण्याचा मोठा साठा असल्याने त्याच्यापासून येणारे झरे शोधून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या स्टेप्स वेल्स म्हणजेच पायऱ्यांच्या विहीर चौरस किंवा आयताकृती किंवा षटकोनी आकारात बांधल्या जातात .पुरातन जलव्यवस्थापनेचा हा एक उत्तम नमुना आहे.आणि त्याचबरोबर त्याच्या समोर एक मंडप असते या ठिकाणी तुम्ही मूर्तीची स्थापना बघू शकता किंवा मंडप हा त्यात हे मोकळा देखील असू शकतो व बाजूलाच अनेक प्रकारच्या तिथे खोल्या असू शकतात या ठिकाणी धार्मिक कार्यासाठी किंवा स्त्रिया पाण्यासाठी जमत असत व त्यानिमित्ताने त्यांना एकत्रित येण्याची संधी मिळत असे.

आता अशा बारवांचे स्वरूप हे अत्यंत कमी राहिले आहे त्यामुळे ज्या बारव आहेत त्यांचे संवर्धन करून तेथे दीपोत्सव करून आपण या बारवांना एक वेगळी सुद्धा एक पर्यटनाचे क्षेत्र म्हणून विकसित करू शकतो.


बारव हे नाव लांबी मोजण्याच्या ‘बाव’ या मापावरून आले असावे. बारा बाव लांब असलेल्या वास्तुला बारव असे संबोधले गेले असावे. अनेक वेळेला बारवेला कुंड, पुष्करिणी अथवा जलमांडवी या नावांनी संबोधले जाते.(संदर्भ -मानस मराठे)

बारवे कडचा भाग अत्यंत शांत निर्मळ सुंदर आहे. बाजूला चाफ्याची व इतर प्रकारची शोभिवंत सुगंधी फुले असल्याने आणि आवारा मोठा असल्याने अत्यंत शांत असे वातावरण तेथे आहे. आणि समोरच दिसते ती सुंदर अशी ब्राह्मणी बारव. या बारावेचा साधारणता काळ हा 2000 वर्षांपूर्वीचा असावा किंवा बाराशे वर्षांपूर्वीचा  असावा याबाबत ठोस अशी माहिती नाही.पण नक्कीच ही बारव खूप जुनी आहे. ही बारव पाहताना आपल्याला समोरच एक भग्न अवस्थेतील एक मंडप उंचावर दिसतो. शांत अशा सुंदर परिसराचा अनुभव घेण्यासाठी ही बारव एकदा नक्कीच पाहिली पाहिजे व डोळ्यांचे पारणे फेडले पाहिजे. 

पुढे समजले की गावामध्ये बल्लाळ देवीचे मंदिर आहे ते देखील अति प्राचीन असे आहे. बल्लाळ देवीचे मंदिर पाहायला गेलो . प्राचीन काळी मुस्लिम आक्रमणापासून वाचवण्यासाठी मूर्ती एका दर्ग्यासदृश खड्डा आणि वर उंचवटा अशा आकारात लपवली होती.तो भाग आजही देवीसमोर असून त्यावर चादर होती,त्याची आजही पूजा होते.आम्हाला दिसले की या ठिकाणी परत नवीन आधुनिक पद्धतीने तिथे ऑइल पेंट मंदिराला दिलेला आहे. त्यामुळे मूर्ती पाहताना थोडा त्रास होतो.परंतु खरं सांगते एकाहून एक सरस अशा मूर्ती तिथल्या खांबांवरती ,तिथल्या मंदिराच्या बाह्य भागावरती कोरल्या आहेत.प्रत्येक मूर्ती ही ही विशेष आणि एकमेकांपासून वेगळी आहे. 

मला बऱ्याच मूर्ती ह्या ओळखताच आलेल्या नाही. काही समाधीस्थ अवस्थेतील मूर्ती पाहून ह्या आणि मोठमोठ्या मूर्तींचे मोठमोठाले कान पाहून ही मूर्ती जैन ऋषींची आहे का किंवा दाढी पाहून ही मूर्ती इजिपशन आहे का अशा प्रकारचे मला वाटले. प्रत्येक खांबावरती असलेले भार वाहक यक्ष हे सगळे वेगवेगळे आहेत.मंदिराच्या बाह्यभागावर ते देखील कोरलेल्या मूर्ती ह्या सामान्य नव्हत्या नक्कीच याचा अभ्यासकांनी अभ्यास करून या विषयाची माहिती किंवा एखाद्या लेखन केले पाहिजे. मंदिरात मंदिराच्या परिसरामध्येच मागे शंकराचे जुने मंदिर आहे.

या मंदिराची अजून एक विशेषता म्हणजे ज्याप्रमाणे नेवासाला ज्ञानेश्वर महाराजांनी पैस खांबाला टिकून ज्ञानेश्वरी लिहिली त्याचप्रमाणे बल्लाळ देवीच्या आवारात असलेल्या 'अमृतानुभव' या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी 'अमृतांनाभव' हा ग्रंथ लिहिला. बाजूलाच एक अतिशय सुरेख असा शांतपणे बसून आराम करणारा महिषा आहे. जो ज्ञानदेवांनी ज्या रेड्याच्या तोंडून वेद वदवले त्याची प्रतिकृती मानली जाते.. 

मंदिरामागे  एक भव्य तलाव  आहे. मागच्या बाजूलाच महादेवाचे मंदिर जे अत्यंत मोठे , खूप पुरातन असणार. आहे कारण की तिथे अतिशय केवळ मंदिर  प्रवेशासाठी चौकट किंवा मंदिराची चौकट असलेली एक बाजू आपल्याला दिसते बाकीचे चहू बाजूचे मंदिरे पडलेले आहे.

अशा प्रकारे सुंदर असे मंदिरांचे अनुभव घेऊन परत निघालो आणि येताना मिसळपावचा आस्वाद घेतला.

-भक्ती




















Sunday, April 21, 2024

आजचामेन्यू-४

 #countbiomolecule  




मला जादूचा डब्बा मिळाला.आणि डाळींना मोड आणणे हा  कंटाळवाणा कार्यक्रम आनंददायी झाला.खाकराचे जे पसरट गोल डब्बे मिळतात ते वापरून मूग आणि मेथी दाणे याला मस्त मोड आले.भिजलेले दाणे टाकून दर रात्री पाण्याचा थोडा शिपका त्यावर मारायचा.तिसर्या दिवशी डब्याला खुलजा सिम सिम केलं की छान छान मोड दिसतात. 


१.वाटीभर मेथ्या रात्रभर भिजवल्या.

२.दुसर्या दिवशी एका किंचित हवा जाऊ शकेल अशा पसरट डब्यात त्या मोड यायला पसरून ठेवल्या.

३.तीन दिवसांनी मेथ्यांना छान मोड आले होते.

४.भाजी नेहमीप्रमाणे फोडणी देत बारीक  चिरलेला कांदा टोमॅटो परतून त्यात हे मोड आलेले मेथी दाणे परतून वाफवून घेतले.

दरवेळी त्याच त्याच चवीपेक्षा वेगळया चवीची भाजी मस्त लागते.चव खरच अप्रतिम आहे किंचीत कडू अगदी नाममात्र.

fenugreek sprouts taste delicious and have an excellent result on health & skin. They are a rich source of protein, fiber, vitamins A and C, calcium, and iron. It contains photochemical in a high quantity like phenols, alkaloids, tannins, and flavonoids it is a proven remedy for diabetes, carcinogenic, hypo cholesterol. Many types of research have proven their antioxidant and immunity booster properties.(Copied)

बाकी मेन्यू..



फ्लॉवर भाजी, मोड आलेल्या मेथी दाणेची भाजी, घरचं लिंबाचे लोणचे,भात तुरीचे वरण,अर्धी पोळी.वरण अळणी आहे.भातही अळणी आहे.वरण भात खातांना मीठ न घालता कमी मिठातल्या भाज्या एकत्र करून खाल्ला.

-भक्ती

Thursday, April 18, 2024

रेडिओअक्टिव्ह -सिनेमा परिचय



 #radioactive

काही स्त्रिया बंडख़ोर असतात.जाचक नियमांचे ओझं त्या अलगद दूर करतात  आणि नाविन्याचा शोधत घेत झगडतात  नकळत त्याचा आवाज घुमत राहतो.त्या इतक्या असामान्य होत्या म्हणून आजच्या युगातल्या स्त्रियांना बळ मिळते.

मेरी क्युरी...नावच खुप आहे ना‌‌..या थोर स्त्री वैज्ञानिकीची जितकी थोरवी सांगावी तितकी कमीच आहे.

रेडिओअक्टिव्ह' हा सिनेमा कणखर मेरीचे असेच माहित असलेले  आणि नसलेले पैलू प्रभावीपणे दाखवतो.

व्यक्तिशः मला पहिली नोबेल  विजेता स्त्री,दोन वेगवेगळ्या क्षेत्रात (केमिस्ट्री आणि फिजिक्स)यात नोबेल मिळविणारी एकमेव व्यक्ती इतकीच ओळख होती.पण वडिल गणितज्ञ , लहानपणीच आईचे छत्र हरवलेली मारिया स्क्लोदोव्स्का' उर्फ मेरी क्युरी .शिक्षण मिळवण्यासाठी अत्यंत झगडा देत पोलंड स्वदेश सोडून फ्रान्स गाठते.एक वैज्ञानिक होते.तिथेच पेरी क्युरी यांची विज्ञानाच्या प्रेमापोटी भेट होते आणि दोघांतही प्रेम फुलते.या दोघांतले नाते इतके सुंदर दाखवले आहे की सिनेमात नोबेल घ्यायला पेरी एकटाच जातो (कारण मेरी नुकतीच आई झालेली असते) तेव्हा मेरी चिडून त्याला एक थप्पड मारते पण म्हणते तुझा राग आलाय पण तुझ्यावर तितकेच प्रेम करते.

पोलोनियम आणि रेडियमच्या शोधासाठी यांना नोबेल मिळते.रेडिओअक्टिव्ह ही संकल्पना ,हा शब्द मेरीने जगाला पहिल्यांदा दिला.ती म्हणतच असते मला जग बदलायचे आहे.पेरीच्या अचानक अपघाती मृत्यूनंतर दोन मुलींचे संगोपन असूनही विज्ञानाचा ध्यास ती अजिबात सोडत नाही.त्याकाळातही एका सहकार्याबरोबर असलेले इंटीमसीचे नातं नाकारत नाही,दुसरे नोबेल पारितोषिक घेण्यासाठी सध्याच्या अफेअरमुळे येऊ नका असे पत्र मिळाल्यावर 'नोबेल मला ट्यालेंटसाठी मिळाले आहे माझ्या व्यक्तिगत आयुष्याचा याच्याशी संबंध नाही 'हे ती ठणकावून सांगत सोहळ्याला जाते.

मेरीच्या शिक्षणासाठी तिच्या बहिणीनेही तिला खुप साथ दिली होती.पहिल्यांदा बहिणीच्या शिक्षणासाठी मेरीने शिकवणी,शिक्षकीची नोकरी करत आर्थिक साहाय्य केले.नंतर बहिणीने तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मेरीला शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य केले.

पुढे मुलीही तेवढ्याच कणखर पहिल्या महायुद्धात आई मेरी क्युरी  बरोबर त्यांनी परिचारिका म्हणून काम केले होते .व सैनिकांच्या शरीरात घुसलेल्या गोळ्यांच्या जागा नक्की करण्यासाठी रेडीओलोजिक मोटारकार याचा शोध लावला .


कृत्रिम किरणोत्सर्गी(कण वा किरण बाहेर टाकणारी ) मुलदव्ये तयार करण्यात इरी क्युरीने (मेरी क्युरी यांची मोठी मुलगी)पतीबरोबर कार्य केले .या साठी दोघांना १९३५ साली रसायनशास्त्रचे नोबेल पुरस्कार मिळाले .

सिनेमात रेडिओ अक्टिव्ह शोधाने जगात जे मोठे बदल झाल्या अशा घटनांचे मध्येमध्ये चित्रणही दाखवलेले आहे -1956 मध्ये क्लीव्हलँड येथील रुग्णालयात बाह्य बीम रेडिओथेरपी , हिरोशिमा आणि नागासाकी ,1961 मध्ये नेवाडा येथे अणुबॉम्ब चाचणी आणि चेर्नोबिल आपत्ती यासह तिच्या शोधांचा भविष्यातील परिणाम दर्शविणाऱ्या दृश्यांसह मेरीच्या आयुष्यातील दृश्ये गुंतलेली आहेत(सौ.विकी)

आई जेव्हा वारली तेव्हापासुन तिने अध्यात्माचही त्याग केला, कदाचित तेव्हापासुन ती केवळ‌ फैक्टवर विश्वास ठेवू लागली.विज्ञानाची सम्राज्ञी मेरी क्युरीच्या आयुष्याचा हा 'रेडिओ अक्टिव्ह' सिनेमा नक्कीच पहा..

-भक्ती

OTT - Amazon Prime

Friday, April 12, 2024

इकिगाई


 इकिगाई


अर्थपूर्ण जगण्याचा सराव म्हणजे ईकिगाई

पश्चिमेकडील जीवनशैली आकर्षित करतांच भारताच्या पूर्वेला एक राखेतून भक्कम उभा राहिलेला देश जपान.लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस यांनी जपानमधील ब्ल्यू झोनमधील उदा.ओकिनावा दीर्घायुषी व्यक्ती असणारे सेंटोंरियन्स यांचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आहे.

*दीर्घायुषी ठणठणीत राहण्यासाठी भूकेपेक्षा ८० % च जेवा.जेवणामध्ये ताट रंगबिरंगी भाज्या फळ नैसर्गिक आंन्टीओक्सिडेंट यांनी भरू द्या.

*कार्यमग्नता देणारे काम म्हणजे ईकिगाई.आवडणार्या कामात आनंद तर मिळतोच आयुष्य सहज पूर्ण जगण्याचा फ्लो पण मिळतो.

*मल्टीटास्किंग न करता एका कार्यावर लक्ष केंद्रीत करा.

*काम अगदीच सोपे नको की आळस येईल जरा आव्हानात्मक कार्य करा पण क्षमतेच्या बाहेरचे काम घेऊन काळजीही वाढवू नका.

*सामाजिक जीवनात यशस्वी करा.मित्रांत,आप्तीयांमध्ये जा.खेळ, सामूहिक खाणपान साजरे करा, एकांतवास दीर्घ नको.

*भारतीय योगा प्रमाणेच जपानमध्येही फार महत्त्वाचे व्यायाम महत्वाचा आहे.रेडिओ ताईसो, ताई ची,क्विगोंग असे जपानी व्यायाम प्रकार लोकप्रिय आहेत जे सोपेही आहेत.

*विशेष बुद्धिझम ,कन्फुसियन्स यांचा जपानवर प्रभाव आहे,सर्वस्व त्यागाऐवजी वर्तमानात जगा!

*मूळ स्वभावापासून दूर नेणाऱ्या गोष्टी टाळा.


पुस्तक वाचताना जपान आणि भारत तुलना करता जपानमध्ये संन्यास दिसला नाही.तसेच एक

रोचक उदाहरण म्हणजे तिथली घरं लाकडाची आहेत.सर्व काही क्षणभंगुर आहे.कशातही जीव गुंतवू नका म्हणून तिथे पिढ्यांपिढ्या दिसणाऱ्या वास्तू फार कमीच आहेत असं पुस्तकात लिहिले आहे.

-भक्ती

Wednesday, April 10, 2024

श्रीखंड श्रीखंड

 


श्रीखंड श्रीखंड ..
गोठ्यातून ओह माफ करा
डेअरीतून आणा दूध एक लीटर
उकळी द्या येऊ एकदम बेटर
ऊन ऊन दूध हो द्या कोमट
विरजणाने जेव्हा होईल दही घट्ट
सूती कापडात दह्याला बांधा
निथळया पाणी पुरचुंडी टांगा
टांगलेल्या जीवा होता तास पूर्ण चौदा
चक्का..दिसता घट्ट ,पुरा झाला सौदा
फेटा फेटा.. पुरणयंत्री,कोण्या चाळणी
वा हैण्ड मिक्सी
एकास एक सम चक्का-पिठी करा एक
भुरभुरा इलाईची-सुकामेवा आवडीचा
निगुतीने करा हा श्रीखंड बेत आहे सवडीचा
-भक्ती
लेट पण थेट
#श्रीखंडपुरी

Thursday, March 21, 2024

आम्रतरू-आम्रमंजिरी(मोहर)

 


“ते शब्द ऐकून तिचे मन मोहरले ”, “माळरानालाही मोहर फुटला”, “अंकुराचे फुटणे,आंब्याचे मोहरणे आणि चाफ्याचे दरवळणे”
अशा अनेक वाक्यांत नाजूक मोहरणे हा शब्द प्रयोग कायमच आवडतो.गात्री रसांचा उन्माद झाली की झाड काय माणसाचे मनही मोहरत अशी आनंददायी ही कविकल्पना आहे.
पण वसंतोत्सवाचा खरा प्राण अनेक मनमोहक फुलांचा ‘मोहर’ आहे.याच मोहरामध्ये ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाते तो आंब्याचा घमघमणारा मोहर! वसंताची ही किमया आहे.
अरविदमशोकं च चुतं च नवमल्लिका।
नीलोत्पलं च पञ्चैते पंचबाणस्य सायकाः ॥
"संमोहनं च कामस्य पंचबाणाः प्रकीर्तिताः ॥
अरविंद (लालकमल), अशोक,आम्रमंजिरी, मोगरा व नीलकमल ही पाच फुले पंचबाण म्हणजे मदनाचीं पंचबाण अथवा पंचशर म्हणतात.याच्या धनुष्याचे बाण म्हणजे पांच फुलें असें मानलें आहे.आणि हा त्याचा बाण उसाच्या इकाकाठीपासून बनलेला असतो.
g
कामदेव,प्रत्यंचा भुंग्यांपासून बनली आहे तर ऊसाचा धनुष्यबाण.

इतर कोणत्याही फुलांच्या मदमस्त सुगंधापेक्षाही आब्यांचा मोहर सुगंध कामदेवाला प्रेमिकांमध्ये प्रेम फुलण्याच्या क्रियेला अधिक सहकार करतो.म्हणून या सुगंधाला सहकार असेही म्हणतात.
अङ्कुरिते पल्लविते कोरकिते विकसिते च सहकारे।
अङ्कुरितः पल्लवितः कोरकितो विकसितश्च मदनो ऽसौ॥

आंब्याच्या मोहराचे अगदी टोकदार असे बाण त्यावर रुंजी घालणारे भ्रमरानापासुंच कामदेवाच्या धनुष्याची दोरी बनवली आहे.असा हा वसंताचा योद्धा येत आहे ,सखी अनेक हृदयांना घायाळ करायला.
आम्रतरूचे नूतन पल्लव बाण तीक्ष्ण साचा
रूंजी घाली माळ भ्रामरी धनुची प्रत्यंचा
हाती घेऊन पहा पातला योद्धा ऋतुराज
मना जिंकण्या प्रणयिजनांच्या चढवितसे साज ॥
(धनंजय बोरकर यांनी कालिदासाच्या ‘ऋतुसंहार’चा मराठीत भावानुवाद केला.)
प्रफुल्लचूताङ्कुरतीक्ष्णसायो
द्विरेफमालाविलसद्धनुर्गुणः।
मनांसि वेद्धुम् सुरतप्रसङ्गिनां
वसन्तयोद्धा समुपागतः प्रिये
-ऋतुसंहार ६-१

महाकवी कालिदास यांच्या ऋतुसंहार या ग्रंथात मदनदेवाच्या या बाणांपैकी आम्रमंजिरीचे मुक्त हस्त कौतुकच केले आहे.
हिमालयाला जरी अनेक पुत्र होते तरी लाडक्या पर्वतीपासून त्याची नजर हटत नसे जसे वसंतात अनेक फुलं फुलली असली तरी भ्रमाराला आम्र फुलांवरच विशेष अनुराग असतो.
महीभृतः पुत्रवतो ऽपि दृष्टिस्तस्मिन्नपत्ये न जगाम तृप्तिम्।
अनन्तपुष्पस्य मधोर्हि चूते द्विरेफमाला सविशेषसङ्गा॥
-कुमारसंभव १-२७

याच मधुर अशा आम्र फुलांचा रस पिऊनच कोकिळेला पंचम स्वर फुटतो.
ज्याचा सर्वोत्तम बाण आंब्याच्या फुलांचा आनंददायक गुच्छ आहे, ज्याचे धनुष्य किमशुकाचे फूल आहे, ज्याचा चंदेरी चंद्र असे छत्र आहे, ज्याचा रौप्य हत्ती झुलत निघता ज्याच्या स्वारीसाठी मल्याया पर्वताची झुळूक वारासह घमघमणारी चंदनाच्या वासासम आहे. ज्याचे मधुर गीत गाणारे पक्षी आहेत, म्हणजे कोकिला तो जसा आहे, तो जगाचा विजय करणारा, तो निराकार प्रेमदेव, त्याच्या मित्राबरोबर, म्हणजे वसंता, वसती ऋतु, तुम्हा सर्वांवर उदार मनाने, उदार भावनेने जोडू दे.

आम्रीमञ्जुलमञ्जरीवरशरः सत्किंशुकम् यद्धनुर्
ज्या यस्यालिकुलम् कलङ्करहितम् चत्रम् सितांशुः सितम्।
मत्तेभो मलयानिलः परभृतो यद् वन्दिनो लोकजित्
सोऽयम् वो वितरीतरीतु वितनुर् भद्रम् वसन्तान्वितः॥
ऋतुसंहार-६-२८

काही काव्यामध्ये या सुन्दर मोहरा पाहुन ज्यान्चे पती व्यापारासाठी देशभ्रमण करीत असतील अशा स्त्रीयान्चा व्याकुळही शब्दोदित केला आहे.
कवींची अशी रसभरीत वसंत आणि आम्र तरूचे रूप यांचा घनिष्ठ संबंधावर अनेक काव्ये आहेत.

आपणही निरीक्षण करता दिसते की दिवसभर या आंब्याच्या रसाळ ,सुगंधी मोहरावर ना ना प्रकारची पाखरे असतात.पण मधमाशीचा प्रिय हा रस ,दिवसभर तिच्या हुम्मम्म्म्म आवाजाने भरलेला असतो.असे म्हणतात की जणू आंब्याचे झाडच हुम्म्म्म स्वर काढत कंपण पावत असते.ह्या मधमाश्यांमुळे त्यांना चिकटलेले पराग कण एका झाडाच्या फुलापासून दुसऱ्या झाडाच्या फुलावर पडून क्रॉस पॉलीनेशन घडून येते .आणि फलधारणा घडून येते.आंब्याच्या झाडाचे सेल्फ पॉलीनेशनही होते .म्हणजे एकाच फुलामध्ये स्त्री व पुरुष बीज असलेले फुल असेल तर अथवा स्त्रीबीज ,पुरुष फुलही वेगवेगळी असतात.पण स्त्री बीज असणारेच फुल फळ धारणा करू शकते.

आंब्याचा मोहर पाहता झाड अगदी त्या एका एका शेंडयावर शेकडो फुलांनी भरून गेलेले असते.पण हळू मोहर गळू लागतो.आणि मोजकीच फळे झाडाला दिसतात.याचाच एक अर्थ की कितीही संकटे आली ,सुंदरता (फुले)देखील गळाली तरी त्यातूनही चांगले घडू शकते ,चांगले फळ मिळू शकते,हिम्मत हरायची नाही.

क्रमशः

-भक्ती
सन्दर्भ-The Mango Motif in Sanskrit Poetry-Dr.S.R.Sarma

Thursday, March 14, 2024

काही उपयुक्त चित्रे


 महाराष्ट्रातील किनारपट्टीवरचे किल्ले


Friday, February 16, 2024

मुळा चटणी, पराठा,सैलड

 


#आजचामेन्यू
#मुळा
#radish
#countbiomolecule

हरभरे भिजवलेले होते तेव्हा रविवारी भिजवले होते तेव्हा विचार केला की हरभरे भिजवले होते तेव्हा विचार केला की मुळ्याचे काहीतरी करूया. मुळ्याचा ठेचा/ मुळ्याची चटणी करायचा ठरवलं.

त्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं आहे सर्वप्रथम भिजवून उकडलेले हरभरे पाहिजे.किंवा केवळ भिजवलेले हरभरे आपण वापरू शकतो. किसलेला मुळा दोन वाटी,हिरवी मिरची जिरे, लसूण पाकळ्या.

पहिल्यांदा फोडणी दिल्यानंतर मुळा आणि हरभरा मिरची सह आणि लसणासह चांगला परतून घ्यायचे आहेत आणि हे परतलेले जिन्नस मिक्सर मधून वाटून घ्यायचे आहेत. आता ज्यांना ज्यांना ठेचा/चटणी आवडते त्यांनी भाकरीसोबत खाण्याचा आनंद घ्या.



आता तुमची मुलं मुळा खात नाही ना?? हे तुम्ही म्हणतच असाल तर त्याला आता आपण करूया मुळ्याचे पराठे. हा तयार मुळ्याची चटणी आहे ती पराठा करताना आपण वापरू शकतो. गव्हाच्या पिठातल्या उंड्यामध्ये आपण हे सारण भरून त्याचे पराठे खरपूस असे भाजून घेऊ शकतो. लहान मुलांना खायला देऊ शकतो.



आता काही घरी डायट वाले पण मंडळी असतील व त्यांच्यासाठी  सॅलेड बनवू शकतो मुळा आणि हरभऱ्याचे. हेच जे हरभरे आहेत ते उकडून घेतले असतील उकडताना सर्वांना माहितीच आहे की त्यामध्ये एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद हिंग तमालपत्र अशा गोष्टी टाकून त्यामध्ये अजून त्याची पौष्टिकता किंवा त्याची चव आपण वाढवू शकतो.


सॅलेड तयार करण्यासाठी ज्या आपल्याला अजून भाज्या लागतात त्या म्हणजे चिरलेला टोमॅटो, चिरलेला थोडासा कांदा ,किसलेला मुळा आणि आत्ताच सीजन जो आहे त्या सीझनमध्ये मिळणाऱ्या कैरीच्या आपण थोडे थोडे फोडी करून घेऊया आणि त्याचबरोबर एक वेगळी टेस्ट म्हणून त्याच्यामध्ये आंबट गोड अशी टेस्ट म्हणून त्याच्यामध्ये ताजे द्राक्षे काप करून टाकायचे आहेत.
म्हणजे एक वेगळीच चव लागते त्यामध्ये तिखट मीठ टाकायचं आहे कैरी असल्यामुळे लिंबाची गरज नाही.

पण तरीही जर आवडत असेल तर दही चांगले फेटून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये हे तयार झालेले सॅलेड टाकायचे आहे. असेही खाऊ शकता एक वेगळे चाट मसाला टाकून त्याची छान चाट ही तयार होतं


-भक्ती

Tuesday, February 6, 2024

आधुनिक जीवशास्त्राची साधने - जनुककोशशास्त्र (Genomics)

 



आधुनिक जीवशास्त्राची साधने - जनुककोशशास्त्र (Genomics)-

लेखक-असीम अमोल चाफळकर 

सध्याच्या युगात जैविक संशोधन हे येणार्या पिढ्यांसाठी वरदान ठरणार आहे.त्यासाठी नवीन तंत्रज्ञान त्यांचा वापर कसा केला जातो हे पुस्तकात सांगितले आहे.

ज्याप्रमाणे भाषा हे संवादाचे, माहितीचे साधन आहे.जी मानवनिर्मित असते.तसेच निसर्गनिर्मित भाषा डीएनए जिची मुळाक्षरे  AGCT/U आहेत.या मुळांपासून संपूर्ण सजीवांचा उत्क्रांती पासूनचा ग्रंथच जीनोम स्वरूपात लिहिला गेलाय.जो अभ्यासाठी सिक्वेन्सिंग, डेटाबेस हे महत्त्वाचे टप्पे आहेत.जे या पुस्तकात रोचक पद्धतीने सांगितले आहे.

सर्वप्रथम डीएनए म्हणजे काय कसा बनतो.त्यापासून‌ पुढे प्रथिने वगैरे सांगितले आहेच पण जंक /रद्दी डीएनए बद्दल भरपूर उहापोह केला आहे.पुढे संगरने रचिला पाया थर्ड जनरेशन सिक्वेन्सिंग झाला कळस उक्ती सार्थ करणारा सिक्वेन्सिंग/अनुक्रमण पद्धती स्पष्ट केली आहे.ते तंत्रज्ञान इतके प्रगत होत गेले की काही लाखांचा खर्च काही हजारांत आणि हातावर मावेल इतक्या छोट्या यंत्रापर्यंत पोहचला आहे.पुढच्या प्रकरणात ही जनुक अनुक्रमण  माहिती एकत्रित करण्याची पद्धत डेटाबेस जीनबैंक एनसएंबल कसे काम करतात हे सांगितले आहे.

पुढील तीन प्रकरणात शास्त्रज्ञांच्या मुलाखतीद्वारे जनुककोशशास्त्र आणि समावेशी सजीवसृष्टी, कृषिक्षेत्र, वैद्यकीय क्षेत्रातील त्याचे उपाययोजना अनेक उदाहरणं सहित वाचण्यासाठी मनोरंजन आहे.

जसे मुंगी कशाप्रमाणे कित्येक कोटी वर्षांपासून बुरशीची शेती करते.

कशाप्रकारे 'क' जीवन सत्व करण्याची क्षमता मानव हरवून बसला.

लुकाचा जनुककोश शोधायचे प्रयत्न ,काही अंतराळात,रेडिएशन मध्ये जगू शकणार्या सर्वशोशिक जीवांचे जनुककोश कसे फायदेशीर होऊ शकतील.

कृत्रिम जनुककोश -न्यूनतम जनुककोश तयार करतानाच प्रवास म्हणजे केवळ आवश्यक प्रथिने/घटक तयार करणरेच जनुकं वापरत जास्तीचे जनुक कमी करत जाणे.

QTL अनुक्रमण हे जीबी आणि जनुककोशशास्त्र द्वारे सहज होऊन नवीन वाण तयार होण्याचा काळ ८-१० वर्षांहून कमी होत २-३ वर्षे होऊ शकतो हे स्पष्ट करतना भारतीय हरभरा पिकाचे संशोधन खोलवर सांगितले आहे.

वैद्यकीय क्षेत्रात सार्स  चे वेगवेगळे ७३ प्रकार COVIDSeq पद्धती कशी विकसित केली गेली दिसून येते.

लेखक असीम चाफळकर यांनी सद्य स्थितीतील जनुककोशशास्त्रातील संशोधन,त्यातील भारतीय संशोधक केंद्र CSIR,PUSA तेथील संशोधकांचे  यांचे मोलाचे योगदान समजतेने दृष्टीस पाडले आहे.

पुस्तकात इंग्रजी शब्दांसाठी अनेक मराठी शब्द लीलया सुंदर पद्धतीने वापरले आहेत.जनुकोशशास्त्र हा शब्द आधी जनुकसंचित जरासा क्लिष्ट होता.तसेच क्लाऊड साठी माहितीमेघ,म्युटेशनसाठी उत्परिवर्तन,मैक्रोमोलिक्यूल महारेणू ,बेसपेअर स्केल-जनुकीय मोजपट्टी,प्रायमेट कपीकूळ. आकर्षक मुखपृष्ठ पुढेही योग्य अशी असंख्य छायाचित्रे, तुलनात्मक तक्ते यांची रेलचेल आहे.

खुप दिवसांनी आधुनिक संशोधनपर पुस्तक वाचल्याचे समाधान मिळाले.

-भक्ती

Tuesday, January 23, 2024

पंजाबी पिन्नी करंजी

 





थंडीचे छान गार गुलाबी दिवस आहेत.पोटातला अग्नी खारीक-खोबर्याने तृप्त होतो.ऊबदार होतो.पण माझी लेक खारीक खोबरं लाडूंना तोंड लावेल तर शपथ!मग आईने त्यात एक वाटी गव्हाचे पीठ भाजून टाकले (अशा लाडूंना पंजाबी पिन्नी म्हणतात हे मी #Mumbai Swayampakghar  च्या एका पोस्टमध्ये वाचलं होतं).तरीही खाईना.लहान मुलांचे खाण्याचे अजब गणित असतं.आता यात गव्हाचे पीठ पडलाच आहे ,तर करंज्या कराव्यात.तर यात तीळही घालावेत असं वाटलं.मला करंज्यांना मूरड पाडता येत नव्हत्या चारचौघी फराळ करतांना त्यांना पटापट करंज्यांना मूरडी घालताना , आपल्याला येत खुप वाईट वाटायचं.चित्त एकाग्र केले आणि करंज्यांच्या कडांना  मूरड घातल्या(चुकल्या तरी आपल्यालाच खायच्या आहेत हे समजून).अशा मस्त जमत गेल्या ,खरच #डरकेआगेजीतहै हे ब्रीद काय खोटं नाही.

म्हणून रव्या मैद्याच्या करंज्या केल्या.अहो आश्चर्यम गरमा गरम पाच एक करंज्या तिने खाल्ल्या.आणि ही डिजाइन काय मस्त आहे करंजीची , म्हणून मी या खातेय अस म्हणाली :).खरच मस्त खुसखुशीत पंजाबी पिन्नी करंजी या पुढे आता हमखास करत राहणार!


साहित्य -

खारीक -खोबरे बारीक केलेले-दोन वाटी

गुळ-एक वाटी

सुकामेवा बारीक केलेला-एक वाटी

डिंक तळलेला-अर्धी वाटी

भाजलेले गव्हाचे पीठ -एक वाटी

मेथ्यापूड-अर्धा चमचा


करंजी साठी १:१/२ प्रमाणात बारीक रवा मैदा एक चमचा मोहन टाकून दूधात भिजवून अर्धा तास ठेवला.


कृती-

वरील साहित्य एकत्र करून घेतले .

करंज्या लाटून दोन चमचे सारण भरून कडांना मूरड पाडली.

किंचित लालसर तळल्या.

गरमागरम तयार!

-भक्ती

Monday, January 15, 2024

हरीश्चंद्रगड-पाचनई मार्गे

 

हरीश्चंद्रगड-पाचनई मार्गे

तारामती शिखरवरून सूर्योदय 



हरिश्चंद्रेश्वर मंदिर 
पुष्पवैभव
कोकणकडा 
गडावरील मंदिरशिल्प 




३१ डिसेंबरला हरिश्चंद्रगडला जायचं होत पण त्यादिवशी त्यावर मनाई सरकारकडून झाली.परत ट्रेक  कैम्प कडून १४ जानेवारीला हा ट्रेक होणार होता ,मग जायचं ठरलच.ट्रेकला डॉक्टर,अधिकारी,बँकर,पत्रकार पासून विद्यार्थी सर्व वयोगटातले मंडळी होती.सागर आणि प्रियांका ट्रेक लीड करणार होते.

या आधी सोपे सिंहगड ,शिवनेरी,रायरेश्वर ,केंजळगड केले होते.पण हरिश्चंद्रगड ‘भटक्यांची पंढरी’ का मनाला जातो ते या ट्रकने उमगले.रात्री ११ ला नगरहून निघालो ,रात्रीचा प्रवास झोप लागलीच कोतुळच्या अलीकडे जाग आली कुट्ट अंधार आणि खिडकीतून पाहिलं तर आकाशातला सप्तर्षी बरोबर येत होता(किंवा कदाचित सप्तर्षीच ओळखता येत असल्याने खच्च भरलेल्या चांदण्यांच्या आकाशातून तो म्होरका माझ्यासाठी झाला.

रात्रीच पाचनई गावात चारच्या सुमारास पोहचलो.अंधारात टोर्चच्या मदतीने गडाकडे निघालो.हवेत गारवा होता आकाशात ताऱ्यांची पखरण उधळली होती .इतके तारे खूप म्हणजे खूपच दिवसांनी डोळे भरून पाहिले होते.गड चढायला सुरुवात केली.जसे जसे पुढे जात होतो तस तसे अंधारात एक वेगळच धाडस वाटू लागले.पुढे एका सपाट जागी आलो तर तारे पाहून प्रचंड आनंद वाटत होता.हा ध्रुव का तो शुक्र म्हणत शुक्रतारा मंद वारा ओळी गुणगुणल्या गेल्या.शिडी  चढून गेल्यावर भव्य कपारीला अनुभवत पुढे निघालो .अजून किती महंत म्हणत एक दीड तास झाले होते.तीन चार दुसरे ग्रुपही चालत होते.माझी घाई सुर्योदयापूर्वी तारामती शिखर पर्यंत जायला पाहिजे ही होती.काही ठराविक वेळाने पाणी आणि विश्रांतीसाठी पाच मिनिटे थांबत असू.चांगली दोन अडीच तास पायांची दौड केल्यावर गडावरच्या मंदिराचे मोहक दर्शन झाल्यावर शांततेचा स्पर्श मनाला झाला.

आता मागचे लोक अजून गडावर पोहचायचे होते गडावर वाट  रेंगाळले कारण तारामती पर्यंतची वाट माहित नव्हती .सूर्योदय चुकतोय ही रुखरुख मनाला होती,किती वेळ झाली तरी मागची मंडळी येईना पुढे जाता येईना ,मला बाई रडूच यायला लागल होत.पण मंडळी आली.काहीच जण वर चढण्यासाठी निघाले आणि प्रियांकाने लीड केलं.मी झपझप पुढे निघाले.तारामती वेळेत गाठणे शक्यच नव्हते.एका पठारावर आलो ,समोर पहुडलेले  डोंगर ,उजनीचे पाणी,क्षितिजापाशी लाल केशरी रंगाची उधळण झाली होती.मी सर्वात पुढे होते.सर्वाना या जागी बोलवायला परत मागे गेले आणि तिथे घेऊन गेले.समोरच दृश्य पाहून मुली म्हणाल्या ‘वाह ,काकू ब्रो मानल तुम्हाला तुमच्या मुळे हा नजारा दिसतोय’ .आणि तत्क्षणी सुर्यनारायण बिंदूरूपातून हळू हळू क्षितीजातून उगवत होता.तुझ्याचसाठी थांबलो होतो अस सूर्य म्हणत होता जणू.दुर्गभ्रमंतीचे खूप लेख आणि फोटो पाहत असल्याने समोरचा ‘नेढ’ मला अचानक  ओळखता आला सर्वांना तो मी दाखवला.सोनेरी प्रभा सगळीकडे पसरली होती.सोनेरी उन्हात न्हाहून खाली उतरलो.

खाली उतरल्यावर कोकणकड्याकडे निघालो.कोकणकड्याचे अपूर्व सौदर्य डोळ्याचे पारणे फेडीत होते.एका टोकाकडून शेवटच्या  टोकापर्यंत अर्धगोलाकार कडा पाहत गेले.जमिनीवर उलट झोपून पाहत राहिले.नळीचा मार्ग, आजोबा डोंगर,सतीचा डोंगर,जुन्नर गेट,साधाल,नळीचा मार्ग,रोहिदासगड असे काही गड,वाटा ओळखता आले.कोकणकडा इथे सुर्योदया पूर्वी आलो तर हवामानाच्या अनुकुलतेनुसार इंद्रव्रज पाहण्याचा योग घडू शकतो.जे पहिल्यांदा इंग्रज शासनातील एका अधिकार्याने पहिल्यांदा पाहिलं आणि यांची नोंद केली .

नाश्ता केला आणि परत फिरल्यावर मंदिराकडे जाताना जागोजागीचे टेंट ,आबाल वृद्धांची मांदियाळी या पंढरीत दिसत होती.मंदिराचे शिखर आकर्षक आहे. इथे असलेल्या लेण्या पाहिल्या तारामती शिखरावर लेण्यात दिगंबर बालगणेश मूर्ती आहे.त्याबजुलाच अनेक मुर्तीविरहीत विश्राम गृह आहेत. ज्ञानेश्वर आणि इतर भावंडानी समाधी घेतल्यानंतर इथेच चांगदेवाने ‘तत्वसार’ १३ वे शतक ग्रंथ लिहिला त्यात हरिश्चंद्रगडाचा उल्लेख आणि सौंदर्याची महती(श्लोक -१०२८ -१०३३)  त्यात आहे .तसेच अनेक पुराणातही या गडाचा उल्लेख आहे ,हे रा.चि.ढेरे यांच्या ‘चक्रपाणि’ या ग्रंथात सांगितले आहे.तसेच इथे सापडलेला शिलालेख हा पुण्यातील चांगावटेश्वर शिलालेखा सारख्याच शैलीत आहे.गोनीदा यांनीही आपल्या पुस्तकांत हा शिलालेख आणि या गडाचा उल्लेख आहे.

हरिश्चंद्रगड या विषयी प्रा.प्र.के.घाणेकर यांचे एक उत्कृष्ट व्हिडीओ मी पहिला होता.त्यात सांगितल्या प्रमाणे नवव्या शतकातील  झांज या शिलाहार  राजाने गोदावरी व भीमाशंकर या व या दरम्यान उगम पावणाऱ्या नदींच्या उगम स्थानच्या जवळ एका शैलीची  इतर बारा शिव मंदिर उभारले.त्यातील पाच नाशिक ,पाच पुणे तर दोन(रतनवाडी,हरीश्चंद्रगड) नगर जिल्हातील आहेत.हरिश्चंद्रगड गडावर मंगळगंगा नदीचा उगम होतो तिथे हे हरिश्चंद्रेश्वर शिव मंदिर आहे.हीच नदी पुढे मुळा नदी होते.त्यामुळेच इथे पाण्याचा अनेक नैसर्गिक टाक्या ज्या अत्यंत स्वच्छ पिण्यायोग्य आहे.मंदिराबाहेर दोन शिलालेख आहेत ज्यात चांगदेवाचा उल्लेख आहे.समोरच असलेली सप्ततीर्थ पुष्करणी आणि १४ मंदिर सदृश्य कोनाडे पाहिले.तसेच जागोजागी अनेक छोटे छोटे मंदिरे आहेत.

त्यांनतर केदारनाथ गुफेत गेलो.त्याच्या जवळच असलेल्या ओढ्यामुळे इथे पावसाचे पाणी आत शिरते .ओव्हर फ्लो नंतरचे अतिरक्त पाणी २ मीटरच्या आसपास उंची असलेल्या भव्य शिवपिंडीच्या आजूबाजूला थंडगार पाणी सतत असते.पाण्यात उतरून दर्शन घेतले.एका भिंतीवर असलेले शिवपूजन शिल्प पाहिले.

मनाची थंडाई झाल्यावर या सुंदर गडाच्या आठवणी साठवून गड उतरायला लागलो.चढतांना अंधार होता आता सजगतेने गड पाहत उतरू लागलो. गावात पोहचल्यावर गरमागरम बाजरीची भाकरी ,मटकी,इंद्रायानी भात वाट पाहतच होत.इतक्यात समोर जालावरचे मित्र असणारे ,योग,ट्रेकिंग याचे सच्चे जाणकार विवेक पाटील समोर दिसले.वाह ,अमला तर खूप आनंद झाला.इतक्या दिवस त्यांच्या सर्व पोस्ट वाचत आले आहे आणि ९९.९९% त्या मला पटतात आणि आवडतातच अनेकदा तिथे मी मत मांडते.आम्ही बराच वेळ  आरोग्य,ट्रेकिंग,सिनेमा अनेक विषयांवर मोकळ्या गप्पा मारल्या.मला तर भारी ट्रेक नन्तर हा बोनसच आनंद मिळाला.



माझे काही जुजबी -निरीक्षण हरीश्चंद्रगड हा वेगवेगळया मार्गांनी चढता येतो.त्यातील सर्वात सोपी पाचनई ही वाट आहे तर अवघड माकडनाळ आहे असे समजले.तसेच खिरेश्वर,नळीची वाट ,टोलारखिंडीची वाट ट्रेकरकडून जास्त परिचितपणे वापरली जाते.कोकणकड्याहून सूर्यास्त वा सूर्योदय पाहण्यासाठी,तारामती शिखर सूर्योदय ,रात्रीचे आकाश निरीक्षण (अभ्यास) करण्यासाठी एक रात्र टेंट मध्ये राहण्याचे ,एक दिवस गड असे नियोजन पाहिजे.पावसाळ्यात मार्गदर्शक सह गडाचा माहोल अनुभवायला पाहिजे.पुष्पवैभव पाहण्यासाठी पावसाळ्यानंतर एक ट्रेक पाहिजे.आता मोजा मी आणखी किती वेळा हरिश्चंद्रगडावर जाणार आहे :)

-भक्ती