कविता रसग्रहण कसे करावे याविषयी थोडे.....
कविता प्रथम दोनदा -तीनदा वाचून ती संपूर्णपणे समजून घ्यावी.कविला कवितेतून काय सांगायचे आहे म्हणजेच तिची मध्यवर्ती कल्पना थोडक्यात विशद करून सांगावी.कवितेतील भावना,कल्पना,विचार ,नादमाधूर्य,चाल,अलंकार,काव्यगुण,कवितेचा प्रकार,कालाटणी,सूचकता,विडंबन यापैकी जे जे गुण आढळतात त्यांची नोंदी करावी.आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठी शक्य तेथे कवितेतील ओळी पुन्हा सादर कराव्या.शेवटी आपल्या मनावर त्या कवितेचा कोणता परिणाम झाला हेही सांगावे.कवितेत कवीला काय सांगायचे आहे याचे विवेचन रसग्रहणात करावे.दोषदिग्दर्शन शक्यतो टाळावे.रसग्रहणात कवितेवर टीका करू नये.कवितेतील सौंदर्य दर्शन म्हण्जेच रसग्रहण मात्र विसरू नये.
संदर्भ:सुगम मराठी व्याकरण-लेखन
लेखक:कै.मो.रा.वाळंबे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~`
रसग्रहणासाठी कवितेतील सौंदर्यस्थाने:
१.रसानुकूल चाल:म्हणजे अंगाई गीत शांत रस व त्याप्रंमाणे वाचन.तसेच इतर रस.
२.नादानुकारी शब्दरचना:उदा."रूणूझूणू ये रूणूझूणू ये झंकारित वाळा
लुटूलुटूलुटू दुडुदुडु ठुमकत ये बाळा"
३.विषयाला अनुरूप भाषा:उदा"या बसा पाव्हन अस राम राम घ्या
कोनच्या तुमी गावच गाठुड तिठ राहू द्या"
यात ग्रामीण भाषा वापरली याप्रमाणे इतर बोलीभाषेंचा ढब ब~याच कवितेंमध्ये दिसतो.
४.अलंकार-रूपक,अतिशयोक्ती,द्रूष्टांत इ.
५.अक्षरांच्या पुनरावॄत्तीने अनुप्रास साधला जातो.
उदा."हटातटाने पटा रंगवूनि जटा धरिशी का शिरी?
मठाची उठाठेव कातरी?"
यात ट आणि ठ या अक्षरांची पुनरावॄत्ती झाली आहे.
3 comments:
छान!
अजून थोडे विस्तृत व्हायला हवं!
Tu budhi de poem rasgrhan
Pls follow me
Post a Comment