Friday, November 26, 2010

कविता रसग्रहण

मी काही बोलू का?
मला काही जप्त करायचे आहे...
महाभारत परत बोलायचं आहे...
त्यामागचा उद्देशच वाहताना दिसतोय...
माझ्या अर्थाचा अनर्थ होताना दिसतोय...
डोळेझाक करून कसे चालेल...मला तरी...
जप्त करू का प्रत्येकातून काही तरी...
मग नवेच महाभारत होईल...
परत मला सांगायला येईल का तो हरी?
न का येईना कोणी...
पण मी जप्त करणार काहीतरी प्रत्येकाचे
सांगाल कोणी काय काय जप्त करू??
पंडुचे...
द्रौपदीचे...
कुंतीचे...
पितामहांचे...
कर्णाचे...
हम्न...ओह मी?
मी गीता...हम्न तीच ती...गीता.
-रेणु खटावकर
(संदर्भ-शरपंजरी आज मी)

'शरपंजरी आज मी'या एका उत्तम कलाकृतीमधील awesome कविता.ही कविता या पुस्तकातील peak point आहे असे मला वाटते.सर्व महाभारतातील पात्रे अशी सुंदर बोलत असतात आणि एका नंतर एक अंगावर येत असतात:)त्यात मस्तपैकी मध्यावर रेणु यांचा हा प्रश्न.दोन मिनिटे ही कविता शांत करते आणि मग पुन्हा महाभारतातील कान्हा,कुंती,गंगा,भीष्मे इतर पात्रे संवाद साधतात...मन गुंतवतात.रेणु यांनी खरच खुप शांत आणि संयमी 'गीता रेखाटली आहे.

No comments: