Thursday, August 17, 2023

जुन्नर भटकंती -२

 


पहिल्या भटकंतीतच मी नाणेघाटला पावसाळ्यात परत येण्याचं ठरवलं होतं.

सकाळच्या शांत गारव्यात जुन्नरकडे निघालो.आता रस्ता ओळखीचा झालायं.जुन्नरच्या जवळ आल्यावर मोठमोठ्या केळीच्या बागा आणि दुरच्या हिरव्या डोंगरांवर पसरलेली धुक्याची साय आनंदाची ग्वाही देत होती.

साधारण आठ वाजता जुन्नरला पोहचलो.पोटात इंधन भरून समोर भव्यतेची साद देणार्या शिवनेरीकडे कूच केले.मोगल,सुलतानी, निजामशाही या संकटांच्या हलकळ्ळोलात रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान!





यावर जाणार्या दोन वाटांपैकी अर्थातच सात दरवाज्यांची सोपी वाट निवडली.पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा(विकिपीडिया).आमची कोकरं उत्साहात धावत होती.एका कैदेतून सुटून स्वतः फोटोंच्या कैदेत अडकवत निवांत चाललो होतो.एकूण दरवाज्यांपैकी काहीच दरवाजांवर व्याघ्र शिल्प होते.सातवाहन काळात नाणेघाटावर देखरेखीसाठी या गडाची निवड झाली आणि इतर राजवटीत अभेद्य किल्ला अशी वाटचाल आणि बांधणी झाली.इथले महत्त्वाचे ठिकाण 'शिवाईदेवी मंदिर' जिजाऊ मातेने शिवाईहून 'शिवाजी'‌ नाव छत्रपती यांना दिले.देवीचा गाभारा प्रसन्नतेने ओतप्रोत आहे.त्याचे बाह्य बांधकाम आणि शेजारील लेण्या पाहून कार्लाची आठवण झाली.शिवाईदेवी मंदिराच्या बाजूला पुरातन लेण्या खोदलेल्या आहेत.एक स्तुप आणि इतर भिक्खूच्या राहण्याची सोय असलेल्या दगडी खोल्या आहेत.इथे पाण्याच्या खोदलेल्या खुप टाक्या आहेत.लेण्यांचा समूह पाहून.छत्रपती जन्मस्थान पाहायला निघालो.हा गड बहू झाडांनी वेढलेला आहे त्यामुळे चालतांना जीव सुखावतो.कोकरांची एनर्जी जरा कमी झाली होती.जन्मस्थळी पोहचलो.गड राजांच्या घोषणेने दुमदुमत होता.इतर वाडा पडला होता पण एकच ती प्रसिद्ध इमारत उभी आहे.त्या पाळण्यात अंगाई गात जिजाऊ शिवरायांना निजवित असेल,माझ्या मुखातून अंगाई उमटली "गुणी बाळ असा जागसी का तू राजा निज रे निज शिवबाळा"

सध्या वाचत असलेल्या 'दास डोंगरी राहतो ' पुस्तकातल्या दोन पानांचे अभिवाचन केले ज्यात रामदास स्वामी शिवबांना शिकवण देतात

“मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा”

“आहे तितुके जतन करावे, पुढे आणिक मेळवावे”

“महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे”

समोर भव्य बदामी आकाराचा तलाव आहे.त्यापुढे कडेलोट स्थान.बाजूलाच 'महादेव कोळी चौथरा' मोगलांच्या क्रूर कृत्याची, महादेव कोळींचे बंड मोडण्यासाठी त्यांचा केलेला शिरच्छेद यांची साक्ष देणारा चौथरा.परतीची वाट जराशी सोपी होती, तपासले असता जवळपास दोन्ही बाजूंनी मिळून ५ किमीची ही भटकंती-चढाई चार तासांची झाली.फुस्स झालेले कोकरू किरकोळ खरदेमुळी परत टणाटण उड्या मारु लागले



 .शिवनेरीवर पावसाने साधारण दर्शन दिल्यामुळे नाणेघाटाकडे पाऊसधारांच्या आशेने निघालो.शंभू डोंगरापासून स्वर्ग अवतरू लागला.



पावसाची माया 

न्हाऊ घाली

डोंगराची काया

सुखावली दिठी

हिरव्या डोंगरा

देता चपळ मिठी...

असेच दृश्य या जुन्नरच्या दुसऱ्या भटकंती पाहिले.



सृष्टीचा मुक्त हस्त वरदान भाताच्या इवल्या रोपांवर,जागोजागच्या छोट्याशा झर्यांतून,डोंगरांवर लहणार्या तलम ढगांच्या पदरांवर दिसत होते.तो खळाळता गोड आवाज..रोज मेडिटेशनला 'प्ले' करते ,आज प्रत्यक्ष तृप्ती कानांना होताना रोमांच उठले.नाणेघाटला पोहचल्यावर तोच खळाळ हजारो वर्षांपासून ऐतिहासिक घाटातून आजही वाहत होता.हा काहीसा कठीण मार्ग प्रत्येक जण मोठ्या धीटाईने करतोच कसा याचे मला आश्चर्य वाटत असते.मी दुसऱ्या वेळी इथे आले हा आनंदही अवर्णनीय होता.पुढल्यावेळी पायथ्यापासून वर चढाई करणार असं ठरवलं.


नानाचा अंगठा अनेक चढत होते पण मला पाहायचा होता नाणेघाटचा प्रसिद्ध उलटा धबधबा(reverse waterfall).पण जायचं कसं?जसा विठोबा भक्ती भावाने आठवला की सामोरी येतोच अगदी तसेच एक काहीसे वृद्ध आजोबा समोर आले "जीवधनच्या पायथ्याशी उलटा धबधबा पाहायचा का?चला अमूक अमूक दक्षिणा द्या नेतो"असे म्हणाले.चला त्याच्यामागून अर्ध्या रस्त्यात वाहनाने गेलो आणि मग पायी निघालो.ओहो...हिरव्या जीवधन किल्ल्याहून धावणारे शुभ्र मऊ ढग.. स्वर्गच!

कोकरू बदकाच्या मागे धावत होतं..प्रचंड गोड व्हिडिओ आलाय.

माझी लेक 'आबा आबा'  नाना प्रश्न निरसण करत त्या वृद्ध आजोबांचे बोट पकडून पुढे गेली.ज्या क्षणी उलटा धबधब्यापाशी  पोहचलो ते आश्चर्यकारक दृश्य पाहिले.खालच्या दरीतील वार्याच्या प्रचंड दाबामुळे कड्यांवरून खाली पडणारे पाणी मोठ्या फोर्सने वर फेकले जाते.त्यात जो तो मनसोक्त भिजत होता.भारतात चारही उलटे धबधबे केवळ याच नाणेघाट डोंगर रांगांत आहेत की त्यातील एक मी पाहत होते.परतीच्या वाटेतही आबाचे 'विठोबा'चे बोट तिने सोडले नव्हते.

नाणेघाट 


उलटा धबधबा 





नाणेघाट नेहमीप्रमाणे मन जड झाल होत.

Tuesday, August 8, 2023

हिंग बीज सुप्तावस्था

 



वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ' (Council ofScientific and Industrial Research - CSIR) ह्या केंद्र सरकारच्या संशोधन संस्थेशी संलग्न असलेल्या हिमाचल प्रदेशातील 'इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन बायोरिसोर्स टेक्नॉलॉजी, पालमपूर' (Institute of Himalayan Bioresource Technology, Palampur - IHBT) ह्या संस्थेने २०१८ च्या ऑक्टोबर ते डिसेंबर ह्या काळात इराण मधून दोन टप्प्यांत 'फेरुला असाफोटीडा' ह्या वनस्पतीच्या सहा वाणांचे बियाणे आयात करून 'नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस, नवी दिल्ली' (National Bureau of Plant Genetic Resources, New Delhi -NBPGR) ह्या संस्थेच्या देखरेखीखाली भारतात प्रथमच हिंगाची व्यावसायिक लागवड करण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले.

 माहितीनुसार फेरुला असाफोटीडाच्या बियांमध्ये सुप्तावस्थेचे(seed dormancy) प्रमाण खूपच जास्त आहे.

बियाणे सुप्तावस्थेच्या दोन भिन्न श्रेणी आहेत: बाह्य आणि अंतर्जात

बीजाच्या गर्भाच्या बाहेरील परिस्थितीमुळे एक्सोजेनस सुप्तता उद्भवते. एक्सोजेनस सुप्तावस्थेचे उदाहरण म्हणजे जेव्हा बियाणे आवरण ओलावा आत शिरण्यासाठी खूप टिकाऊ असते, प्रभावीपणे उगवण रोखते. 

बीजाच्या गर्भामध्ये रासायनिक बदलांमुळे अंतर्जात सुप्तता उद्भवते. अंतर्जात सुप्तावस्थेमुळे वनस्पती अंकुरू शकत नाही याचे एक कारण म्हणजे भ्रूण अद्याप पूर्णपणे विकसित झालेला नाही किंवा विशिष्ट हंगामी संकेत मिळालेले नाहीत .अंतर्जात रासायनिक अवरोधकांमुळे उगवण देखील दडपले जाऊ शकते.

अशावेळी बीजांची सुप्तावस्था  का असते ?

१.बीज आवरण पर्मिअबल ,कठीण असणे

२.बीज भ्रुण परिपक्व नसणे

३.ABA बीज रोपण प्रतिकूल संप्रेरकाचे प्रमाण अधिक असणे

४.थंड हवामान न मिळणे (vernalization)

बीजांची सुप्तावस्था लवकर  मोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकिया कराव्या लागतात.

१.बीजावारण कोमल करणे-(scarification) –Acid,रब्बिंग,कॅत्तिंग

२.वनस्पती संप्रेरके GA3 ,Cytokinin वाढवणे-

३.ABA चे प्रमाण कमी करणे,ऑक्सिजन देणे,हिटिंग

४.थंड वातावरण तीन आठवड्यापर्यंत देणे.

 फेरुला असाफोटीडाच्या बियांमध्ये सुप्तावस्थ (seed dormancy) वनस्पती संप्रेरके GA3 ,Cytokinin वाढवणे आणि थंड वातावरण तीन आठवड्यापर्यंत देणे या पद्धतीने मोडली आहे.त्यातही थंड वातावरण ५ C,१५C आणि २५C ह्या प्रकिया वेगवेगळ्या काळासाठी जसे आठवडा ते २४-२८ दिवस वगैरे.यातील ५ C –वीस दिवसांसाठी सर्वात यशस्वी परिणाम देते.

या cold scarification नन्तर बीज सहा वेगवेगळ्या मेडिया  संयोजन (मिडिया कॉम्बिनेशन) मध्ये ग्लास हाऊस मध्ये वाढवले. ऊती संवर्धन पद्धतीत कृत्रिम पोषक द्रव्ये (macro,micro,vitamin,hormones,sugar),प्रकाश,तापमान पुरवले जाऊन एकाच,उत्तम अनुवांशिक गुणधर्म असलेले हजोरो निरोगी रोप ग्लासमध्ये तयार तयार केले जातात.

संशोधन प्रबंधामध्ये हे सहा मिडिया संयोजन काय हे दिसत नाहीये .पण साधारणत: हाफ स्ट्रेन्थ मुराशिगे आणि स्कूग कृत्रिम मिडियात (1/2 MS मिडिया) GA3,cytokinin संप्रेरके वेगवेगळ्या प्रमाण संयोजनात वापरलले जातात.अशी महत्वाची(endangered) बियाणे,वनस्पती वनस्पती ऊती संवर्धन (plant tissue culture)  या पद्धतीने वाढविले जातात. अशा पद्धतीने ८०० वनस्पती सप्लिंग तयार करून लावली आहेत.वनस्पती ऊती संवर्धन मूळ हेतू शेतकऱ्यांना निरोगी,अधिक उत्पादकता असणारी  रोपे मिळवून देणे आहे.एका माहीतीनुसार हा प्रयोग येत्या दशकात याशावी झाल्यास  हिंगाच्या शेतीत  दर हेक्टरी  ३ लाख रुपये गुंतवणूक करून शेतकरी १० लाखापर्यंत उत्पन्न मिळवू शकतो.त्यानुसार बीज पासून रोपे तयार झाल्यानंतर इतर एक्क्सप्लान्ट नवीन रोप निर्मितीसाठी वापरता येईल का हे पाहणे मनोरंजक आहे.