वीरगळ आणि सतीशिळा ओळख (पाच दिवसीय ऑनलाइन अभ्यासक्रम)
सह्याद्री ट्रेकर्सने आयोजित केलेल्या पाच दिवसीय ऑनलाइन अभ्यासक्रमात मी वीरगळ आणि सतीशिळा यांचा अभ्यास पूर्ण केला. या क्षेत्रातील अनुभवी अभ्यासक अनिल दुधाने सर यांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले.
या अभ्यासक्रमादरम्यान वीरगळांची परंपरा जवळपास तिसऱ्या शतकापासून अस्तित्वात असल्याचे समजले. ही माहिती महत्त्वाची होती कारण वीरगळ ही फार प्राचीन शिल्पकला आहे, हे मला पूर्वी ठाऊक नव्हते. अगदी लोहयुग आणि अश्मयुगातही मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ दफनानंतर शिळा ठेवण्याची किंवा त्या जागेभोवती दगडांचे वर्तुळ (शिलावर्तुळ) तयार करण्याची प्रथा होती. काही ठिकाणी या वर्तुळावर दगडी छप्पर किंवा शिळाप्रकोष्ठही आढळते.
महाभारतात वीरांच्या मृत्यूला ‘वीरमरण’ म्हणून गौरव करण्यात आले आहे. त्यांना मोक्ष आणि स्वर्गप्राप्ती मिळते, असे वर्णन आहे. यासंबंधीची प्रसिद्ध श्लोक अशी आहे:
द्वाविमौ पुरुषौ लोके सूर्यमण्डलभेदिनौ । परिव्राड् योगयुक्तश्च रणे च अभिमुखो हतः ॥
या जगात मृत्यूनंतर थेट सूर्यमंडळ भेदून मोक्ष प्राप्त करणारे केवळ दोन पुरुष आहेत – एक म्हणजे योगसाधनेत लीन झालेला संन्यासी योगी आणि दुसरा म्हणजे रणांगणात शत्रूचा समोरासमोर सामना करताना वीरगती प्राप्त झालेला योद्धा.
कर्नाटकात चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात वीरगळांची परंपरा अधिक प्रसारित झाली. विशेषतः नदीकाठी या शिळा जास्त प्रमाणात आढळतात.
‘वीरगळ’ हा शब्द कानडी भाषेतील ‘वीरकल्लू’ या शब्दावरून आला आहे. ‘वीर’ म्हणजे शूर योद्धा आणि ‘कल्लू’ म्हणजे दगड. अर्थात ‘वीराचा दगड’. बहुतेक वीरगळी चार पट्ट्यांमध्ये विभागलेल्या असतात आणि प्रत्येक पट्टीचा विशिष्ट अर्थ असतो. काही वीरगळींवर तीन किंवा पाच पट्ट्या देखील आढळतात. बहुतेक वीरगळी दगडाच्या एकाच बाजूला कोरलेल्या असतात, तर काही चारही बाजूंवर कोरलेल्या असतात. ज्या वीरगळींवर शिलालेख असतो, त्यावरून ती कोणत्या वीरासाठी आणि कोणत्या काळातील आहे, याचा उलगडा होतो. मात्र शिलालेख असलेल्या वीरगळी फारच कमी आढळतात.
वीरगळींवरील चित्रांमधून योद्ध्याच्या मृत्यूचे स्वरूप समजते. शेवटच्या पट्टीत फक्त योद्धा दाखवला असेल तर तो युद्धात मारला गेल्याचे सूचित होते. गुरेढोरे दाखवली असतील तर तो गुरांचे रक्षण करताना मरण पावला, असे समजावे. त्यावरील पट्टीत मृत्यू कशाप्रकारे झाला (उदा. लढाईचा प्रकार) दाखवले जाते. त्यानंतरच्या पट्टीत अप्सरा त्याला स्वर्गात घेऊन जात असल्याचे चित्रण असते. सर्वात वरच्या पट्टीत तो स्वर्गात पोहोचल्यावर स्थानिक देवतेची पूजा करताना दाखवला जातो. काही वीरगळींवर सूर्य आणि चंद्र कोरलेले असतात, ज्याचा अर्थ ‘जोपर्यंत सूर्य-चंद्र टिकतील, तोपर्यंत ही व्यक्ती आणि तिची कृत्ये स्मरणात राहतील’ असा होतो. मध्यभागी कलश किंवा राज्यचिन्ह (वराह, हत्ती, हंस इ.) देखील कोरलेले असू शकते.
वीरगळींचे प्रकार
- आयताकृती वीरगळ: दगडाच्या एका किंवा तीन बाजूंवर कप्पे करून प्रसंग कोरलेले असतात.
- स्तंभ वीरगळ / चतुर्भुज वीरगळ: एकाच पाषाणस्तंभाच्या चारही बाजूंवर शिल्पे कोरलेली असतात.
उपप्रकार (वीरमरणाच्या प्रसंगानुसार)
- गोधन / गोवर्धन वीरगळ: यादव काळात गाईंचे रक्षण करताना मरण पावलेल्या वीरांसाठी. यात गाईंचे कळप कोरलेले असते.
- चौर्य वीरगळ: गावावर चोर-लुटारूंचा हल्ला परतवताना मरण पावलेल्या वीरांसाठी.
- पशु वीरगळ: वाघ, बिबट्या इत्यादी हिंस्त्र प्राण्यांशी झुंज देताना मरण पावलेल्या वीरांसाठी.
- अश्वदल / गजदल वीरगळ: घोडेस्वार किंवा हत्तीस्वार युद्धात शहीद झालेल्या योद्ध्यांसाठी.
- आरमारी / नौका वीरगळ: समुद्री किंवा नदीतील नाविक युद्धात मरण पावलेल्या वीरांसाठी.
सतीशिळा
युद्धात पती धारातीर्थी पडल्याची बातमी ऐकून पत्नीने सती जाण्याची प्रथा होती. त्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या शिळांवर काटकोनात दुमडलेला, मनगटापर्यंत चुडा भरलेला हात (भडखंबा) कोरलेला असतो. किती पत्नी सती गेल्या त्यानुसार हातांची संख्या दिसते.
सती
ही एक अनिष्ट रूढी
होती. जाणत्या आणि सुधारकांनी तिचा त्याग केला. संत माउलींनी सती जाणाऱ्या स्त्रीच्या मृत्यूला ‘वोखटे’ (भयंकर, वाईट) म्हटले आहे, परंतु त्यांनी या प्रथेचे समर्थन
केलेले नाही. ते केवळ रूपक
म्हणून वापरले आहे
आतां ईश्वरप्राप्तीलागीं
।
प्रवर्ततां
ज्ञानमार्गीं
।
धिंवसेयाचि
आंगी
।
उणीव
नोहे
॥
१८६
॥
वोखटें
मरणा{ऐ}सें
।
तेंही
आलें
अग्निप्रवेशें
।
परी
प्राणेश्वरोद्देशें
।
न
गणीचि
सती
॥
१८७
॥
गधेगळ: राजाने
दिलेल्या जमीन-दानाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याला अपमानजनक शिक्षा दर्शवणाऱ्या शिळा. यावर “तया माये, गाढवू घोडू...” असे स्पष्ट शब्द आणि चित्र कोरलेले असते. त्याचा सोपा अर्थ असा की,"ज्याने कोणी राजाचा हा आदेश मानला
नाही किंवा या दानात अडथळा
आणला, त्याच्या आईशी गाढवाचे मिलन करवले जाईल". त्या काळात ज्यांना लिहिता-वाचता येत नव्हते, त्यांनाही ही कडक शिक्षा
सहज समजावी, म्हणून ही आकृती कोरली
जात असे
वीरगळ
संवर्धन
पूर्वीच्या
काळात अज्ञानामुळे या वीरगळांची वेताळ, शनिदेव म्हणूनही पूजा झालेली दिसते.परंतु काही गावात या वीरगळ शंभरहून
अधिक सापडतात.जिथे त्यांचे संवर्धन केले जात आहे .
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात असलेले किकली हे गाव महाराष्ट्रातील पहिले अधिकृत ‘वीरगळींचे गाव’ म्हणून प्रसिद्ध आहे. या गावाला नवव्या ते दहाव्या शतकातील शिलाहार आणि यादव कालीन समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे.गावातील पुरातन मंदिर परिसर, ओढे आणि शेतात विखुरलेल्या सुमारे १०० ते १५० वीरगळी एकत्र करून त्यांचे भव्य संवर्धन करण्यात आले आहे. कडवई (तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी) हे महाराष्ट्रातील पहिले अधिकृत ‘सतीशिळांचे गाव’ म्हणून ओळखले जाते.कडवई गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या सुमारे ५५ हून अधिक प्राचीन सतीशिळा आणि वीरगळी एकाच ठिकाणी एकत्रित करून त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे.इतिहासकारांच्या मते, ११ व्या ते १२ व्या शतकात परिसरात किंवा जवळच असलेल्या भवानीगढ किल्ल्याच्या परिसरात मोठे युद्ध झाले असावे. त्या युद्धात शहीद झालेल्या वीर योद्ध्यांच्या पत्नींनी येथे सती पत्करली होती, ज्याची साक्ष या शिळा देतात.