Saturday, May 4, 2024

सेपियन- पुस्तक परिचय

 




युवल नोव्हल हरारी हे नाव आता कोणाला माहित नाही हे फार कमी आहे. आपण कोण आहोत? आपण इथपर्यंत कसे आलो? येताना काय काय मागे सुटले आहे ?काय काय गाठोड घेऊन इथे आलो आहोत? ते गाठोड आहे का ते ओझं आहे? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हा माणूस एका झटक्यात (ह्या पुस्तकात) देतो. याचा अभ्यास इतका दांडगा आहे की त्याने अशा गहन विषयांवर सोपी वाटणारी अनेक पुस्तके लिहिले आहेत. पण हे पुस्तक जे आहे 'होमो सेपियन' हे पुस्तक  2012 म्हणजे जवळपास आज पासून बारा वर्षांपूर्वी दिलेले आहे. म्हणजे पुस्तक मला उशीरच मिळाले आहे. हे पुस्तकाची सुरुवातच होते ते पृथ्वीच्या उत्पत्तीपासून ज्यामध्ये पहिल्यांदा अणू येतात.मग त्यांपासून पदार्थ बनतात या पदार्थांपासून जीव बनतात आणि मग ह्या जीवांमध्ये हळूहळू उत्क्रांती होत होत माणूस ते शहाणा माणूस म्हणजे आपण उत्क्रांत होतो.पण ही नैसर्गिक उत्क्रांती होत असतांनाच अनेक प्राण्यांचे अस्तित्व आपण जाणूनबुजून संपवत आलो ही काळी बाजूही यात मांडली आहे.  हळूहळू इतर प्राणी व इतर आपल्याच प्रजाती निअंडरथर्ल माणसाला देखील संपून हा होमोसेपियन एकटा जगावर राज्य करत आहे. 

"आपले पूर्वज निसर्गाशी सुखसंवाद करून राहिले हा पर्यावरण प्रेमींच्या म्हणण्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका"... उलट "होमोसैपियन हे सर्वात संहरी प्रजाती होत". उत्क्रांती  दरम्यान होमोसेपियन ज्या ज्या ठिकाणी (खंडात)गेले तेथील प्रजातींचा आश्चर्यकारक विनाश होत गेला. 

होम सैपियन हे  आफ्रिका-आशिया नंतर ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या खंडात जाऊन स्थलांतरित झाले त्याचवेळी तेथे मोठे उलथापालथ झाली.पर्यावरण /हवामान बदलाने की तेथील प्राण्यांचा नाश झाला .परंतु हा योगायोग होमोसेपियन तिथे येणार आणि काही काळातच आणि एवढ्या महाकाळ प्राण्यांचा नाश होणे ही गोष्ट वारंवार घडत गेली.

आपण पाहू शकतो ऑस्ट्रेलियातील जवळपास 24 पैकी 23 मार्सुपिअल प्रजाती (सद्यस्थितीतील प्रसिद्ध कांगारू हा मार्सुपिअल म्हणजेच पिलांना पोटा बाहेरच्या पिशवीत वाढवणारा प्राणी) नष्ट झाल्या.साधारण न्यूझीलंड बाबतीत आहे. आग लावून गवत,झाडे जाळायची.अन्नासाठी गवताळ भागात प्राण्यांना यावे लागत आणि त्यांची शिकार करायची असे होमोसैपियन तत्व होते. त्यामुळेच अग्नी रोधक अशा निलगिरी वनस्पती व  त्यांवर जगणारे अनेक प्राणी वाचले.

ही होमोसैपियनची खुनशी लाट जमिनी पुरतीच होती.पाण्यातले जीव अनेक लक्ष उत्क्रांतीने इथवर पोहचले आहेत.पण आता समुद्री औद्योगिक क्रांतीने हे होमोसैपियन त्यांना पण नष्ट करतील.

हे सगळं घडलं नसतं तर मार्सुपिअल सिंहाचं आज राज्य असतं....



त्याला लागलेल्या शेतीचा शोध एक मोठा भाग म्हणजे स्वावलंबी झाला परंतु निसर्गाच्या विरुद्ध ही गोष्ट होती आणि तो नकळत गुलाम झाला आणि इथूनच गुलामगिरीचा देखील सुरुवात झाली.

उत्क्रांतीचे चलन भूक नाही आणि दुःखही नाही तर ते आहे डीएनएची नक्कल. एखाद्या कंपनीच्या बँकेत किती डॉलर जमा आहेत त्यावर कंपनीचे यश मोजतात कर्मचाऱ्यांच्या समाधानावर नाही. त्याचप्रमाणे प्रजातीतील जातीचे उत्क्रांती विषयक यश तिच्या डीएनएच्या नकलांच्या प्रतिवर मोजले.डीएनए आणखी प्रति शिल्लक नसतील तर जाती कायम नष्ट होऊन जातात एखाद्या जातीच्या अनेक प्रती असल्याची बढाई मारली जाते तेव्हा त्या जातीचे यश आणि तेव्हा त्या जातीची भरभराट होती यातून पाहिलं. तर शंभर पेक्षा हजार प्रती कधीही चांगल्या. 

वाईट परिस्थितीत अधिक लोकांना जिवंत ठेवण्याची क्षमता हीच कृती कृषी क्रांतीचे सार आहे

-युवलहरारी

कृषी क्रांतीने भटक्या सेपियन्सला डोमेस्टिक(घरात बसणारा) केले सेपियन्सने पिकांना माणसाळवल नाही.अशातही गहू ,तांदूळ आणि बटाटा यांच्या शेतीने त्याला पोषणमूल्ये तर नाहीच मिळाले पण कुपोषण व रोगराई वाढले.लोकसंख्येचा भस्मासुर निपजला.

शेतीसाठी खडतर कष्ट उपसून पाठीचा कणा सरकलाच पण हार्निया इतर समस्याही उद्भवला.पिकांवर अवलंबून राहत ,त्यांच्या सुरक्षेखातर अनेक टोळी संघर्ष सुरू झाले.कृषीक्रांती घोडचूक होती जी अनेक पिढ्यांनी comfort zone म्हणून परत परत केली??



मग काय माणसाकडे वेळ, पैसा काय काय यायला लागलं.नाही त्या गोष्टी सुचायला लागल्या .मस्त गोष्टी निर्माण करायला लागला. आणि अनेक संस्कृती निर्माण केल्या. या संस्कृतीमध्ये तो गटात देखील विभागला गेला.

३५,०००-४०,००० हजार वर्षांपूर्वी जर्मनीतल्या प्रागैतिहासिक काळात प्रारंभिक बोधात्मक क्षमता विकसित काळात होमो सेपियन्सने ही मूर्ती घडवली.अन्नसाखळीत तेव्हा सिंह सर्वोच्च होता.पण लवकरच सेपियन्सनी ती जागा घेतली.तरीही सिंहाबद्दलचा नितांत आदर इथे दिसतो आहे का?

कदाचित एक श्रद्धा निर्मितीचे सर्वात प्राचीन उदाहरण!



हे सर्व असतानाच लिपींचा लावलेला शोध कथा रचण्यासाठी मदतच करू लागल्या.

फक्त कायदे करणे आणि आपला प्रतिपाळ करणाऱ्या देवांच्या गोष्टी सांगणं या बाबी मोठी राज्य टिकून ठेवण्यासाठी पुरेशा नव्हत्या. राजाला काहीतरी कर गोळा करावा लागत असे"

-युव्हाल नोव्हा हरारी

पण माणसाची बौद्धिक क्षमतेमुळे हे कर ,त्यांची येणी,बाकी सर्व लक्षात ठेवणार कसे? मग तेव्हा पहिल्यांदा लेखन कलेचा उगम झाला मेसोपोटेमियात ही लेखन आंशिक(चित्र लिपी)होती.म्हणजे केवळ कराची नोंदणी यात होत असे काव्य,नाटक वगैरे गोष्टी यामध्ये लिहिल्या जात नसेल एकंदरीत म्हणजेच गणिती संकल्पना जेव्हा माणूस वापरू लागला तेव्हाच खूप मोठ्या  क्षेत्रासाठी ती उपायुक्त झाले.त्यात ही भारतीयांनी शोधलेले शून्य ते नऊ हे अंक अगदी महत्त्वाचे ठरले परंतु तेव्हा अनेकदा अरबांनी भारतावरती आक्रमण केले होते आणि त्यांनी ही शून्य ते नऊ ही अंक पद्धती जगाला ज्ञात करून दिली.युव्हाल म्हणतोय लिपी प्रथम मेसोपोटेमियात शोधली पण नक्कीच इतरत्रही ती विकसित होत असणारं.



जसा हरारी काय म्हणतो की या सगळ्या गोष्टी माणसाने रचलेल्या कथा आहेत मी ह्याच कथांवर विश्वास ठेवून माणूस अजून एकमेकांशी भांडत आहे माझा धर्म श्रेष्ठ की तुझा धर्म श्रेष्ठ? माझा माझं राज्य श्रेष्ठ की तुझा राज्यश्रेष्ठ? ब्ला ब्ला ब्ला ...

हे सगळं घडत असतांना निसर्गाने केले नाही इतका भेदभाव शहाण्या माणसाने सर्वत्र सुरू केला.याच्या अधिक बळी पडल्या स्त्रिया..

डिस्क्रिमिनेशन म्हणजेच भेदभाव जगात काळे -गोरे, श्रीमंत- गरीब, स्वतंत्र -गुलाम अशा प्रकारचे भेदभाव चालत आलेले आहेत आणि हे दुष्टचक्र अजूनही संपले नाहीये. तो आणि ती म्हणजेच लिंग भेदभाव पण आहेत.हे निसर्गनिर्मित नाही तर मानवनिर्मित आहेत. तसेच आपण पाहतो की पितृसत्ताक  हे जगामध्ये जास्त ठिकाणी आहे. 

हरारी म्हणतो,

 "या सगळ्या नाट्यमय बदलांमुळेच लिंगभावाचा इतिहास चक्रावून टाकणारा ठरतो पितृसत्ताक पद्धती जैविक घटकांवर आधारित नसून निराधार पूरा कथान वर आधारित असल्याचे आज स्पष्टपणे दिसून येत आहे मग असा प्रश्न उपस्थित होतो की पितृसत्ताक व्यवस्थेला विश्वव्यापकता आणि स्थैर्य या गोष्टी कशा बरे लाभले असतील?"

फोटोत तेच सांगितले जैविक/निसर्ग कधीच स्त्रीला वेगळं समजत नाही ती मात्र सांस्कृतिक/सामाजिक पातळीवर अनेकदा भेदभावाला बळी पडत राहिली आहे.

पुस्तकात औद्योगिक क्रांती आणि वैज्ञानिक क्रांती यांचा खुप चांगाला आढावा घेतला आहे.अज्ञानाचा शोध आणि  ज्ञानाचा उलगडा ...e=mc2ह्या समीकरणाने सगळं जग बदलून टाकलं. माणूस हे सगळं करत असतानाच निरीक्षण शक्ती लागली त्यातही एका ज्ञानेंद्रियाने देखील आपण निरीक्षण करून त्यामध्ये वेगळे ज्ञान मिळू शकतो. हे निरीक्षण गणितीय साधनांनी केले तर त्याची पूर्णपणे पुष्टी होते. आणि हेच ज्ञान सत्य आहे की नाही ही त्याची खरी कसोटी नसून ते आपल्याला शक्ती देते की नाही याची खरी कसोटी आहे. त्याची उपयुक्तता ठरते .मग त्यालाच आपण उपपत्ती म्हणजेच संशोधन म्हणतो. हे संशोधन आपल्याला नवनिर्मितीसाठी अतिशय समर्थ बनवतात. अजून नवीन ज्ञान तयार करतात पण हे विज्ञान अजूनही स्वतःचे अग्रक्रम रवण्यास असमर्थ आहे. तेव्हा  साम्राज्याने त्याला हाताशी धरले. झालं तर अशाप्रकारे विज्ञानाचा वापर करून शुक्र मार्गक्रमण शिकण्यासाठी समुद्री मोहीम काढल्या गेल्या जगाच्या चार कोपऱ्यांमध्ये या धाडण्यात आल्या. सायबेरिया, उत्तर अमेरिका, मादागस्कर, दक्षिण आफ्रिका पुढे गेलेल्या येथे देखील त्या गेल्या महासागरात देखील त्या गेल्या. पण हे सगळं असताना लक्षात काय आलं की एवढ्या मोठ्या मोहिमा करताना त्यातील काम करणाऱ्या लोकांचा  दूर मोहिमेत मृत्यू  होतं.पण तिथेच स्कर्व्ही रोगाचा शोध लावला आणि आणि ब्रिटिश जेम्स लेंड यांनी सीट्रस फ्रुट देण्याचा सपाटा लावला.तिथे आणि मग काय जादू झाली. सागरी मोहिमांमध्ये विटामिन सी च्या कमतरतेने होणाऱ्या स्कर्वी रोगावर बऱ्या प्रकारे नियंत्रण मिळाल्यावर माणूस लांब लांब समुद्री मार्गाने जायला लागला आणि एक नवीनच विश्व त्याला समजले हिरो के लोकांनी याच्यामध्ये आणि त्यांनी पुढाकार घेतलाच नाही तर व्यापार नावाचे नवे तंत्र जगामध्ये स्थापित केले. आता या मोहिमा काढताना खर्चही लागत असेल आणि मग आला तिथे आणि एक लोकांनी एकत्र येऊन उभारलेली भांडवलशाही आणि या भांडवलशाहीतून होणाऱ्या नफा वेगवेगळ्या उद्योगांमध्ये देण्यात आला. उद्योगाची चक्रे वेगाने फिरली त्यापूर्वी फक्त मसल ऊर्जा किंवा सौर उर्जा याचाच माणूस वापर करत असे.  मग पुढे काय वेगवेगळ्या ठिकाणी वापर करताना वेगवेगळ्या खाण्यांचा शोध घेण्यात आला .मग सापडले अल्युमिनियम अल्युमिनियम हे पूर्वी सोन्यापेक्षा देखील महाग होते. कारण की त्याची उपयुक्तता आणि हाच अल्युमिनियम वापरून पुन्हा एकदा बदलले. 

हे सागरी मोहिमा करत असताना अनेक ठिकाणी लुटमारीचे देखील प्रकार व्हायला लागले. स्थानिक लोकांकडून देखील आक्रमणाचे भीती वाटायला लागली.फक्त राज्याचे सैन्य नाही किंवा राष्ट्राचे सैन्य नाही तर अशी मोठमोठे जहाज देखील स्वतःचे असे वैयक्तिक, पर्सनल सैन्य बाळगू लागले. तिथूनच पुढे महायुद्धाची हळूहळू पार्श्वभूमी बनत होती.

हे सर्व चालू असताना कुठेतरी विजेची ठिणगी पडली एडिसिनच्या डोक्यातच की, अस की आणि मग काय इलेक्ट्रिसिटी देखील आली आणि जगाचा पुन्हा एकदा कायापालट झाला.तो आजपर्यंत सुरू आहे.

पण हे सर्व कशासाठी सुरू आहे सुखासाठीच ना..पण तिथेही ज्या मेंदूतील जीव रसायनांमुळे सुख भावना निर्माण होती.त्या मेंदूला समजून घ्यायला आपण जोमाने सुरूवात केली आहेच..


सेरोटोनिन,डोपामाईन,ओक्सिटोक्सिन ही मेंदूतील जीव रसायने सुख मिळवण्यासाठी कारणीभुत आहेत.पण यांचा स्त्राव होण्याचा कालावधी प्रत्येकीसाठी, वेगवेगळ्या घटनांमध्ये वेगवेगळा असतो.याचीसुद्धा जनुके काही मागच्या पिढीतून मिळतात तर काही उत्क्रांतीसाठी /वंश चालविण्यासाठी हजारो वर्षांपासून बरोबर पुढे जात आहे.

एवढं सर्व असतानाही बाह्य घटकांनी,विचारधारेने बर्याच लोक शहारले जातात.स्थिर जितके राहायला शिकू तितकं मेंदूला समजून घेत राहू.त्यावर विजय मिळवून जग जिंकता राहू..

इति लेखन सीमा

-भक्ती


Monday, April 29, 2024

चॉकलेट आईस्क्रीम

 विना साखर, दूध आईस्क्रीम-

रोज बाहेरचे आईस्क्रीम देण्यापेक्षा घरी थंडा थंडा कूल कूल चॉकलेट


आईस्क्रीम/म्युस केले.विना साखर पदार्थ करायचा म्हणजे खजूर वापारायचे हे सूत्र आहेच.

नुसतं चॉकलेट फ्लेवर ऐवजी केळी पण वापरली.

साहित्य -तीन पिकलेली केळी, आवडीनुसार चॉकलेट कंपाऊंड(डार्क चॉकलेट) कोको पावडर,मखाना/ओट्स सुकामेवा पावडर,सात आठ खजूर

कृती-

चार केळी काप करून फ्रिजमध्ये अर्धा तास ठेवून गार करायचे.नंतर मिक्सरच्या भांड्यात ही थंड झालेली केळीची काप,मखाना सुकामेवा पावडर,  डार्क चॉकलेट बारीक केलेले खजूर टाकून फिरून  टाकायचे.मग चांगले फिरवून घ्यायचे.स्मूद मिश्रण झाल्यावर आवडत्या आकारात ओता.वरतून आवडीनुसार सुकामेवा,ट्रुटीफ्रुटी टाकायची. ३-४ तास डीप फ्रीजमध्ये मिश्रण ठेवायचे.नंतर मस्तपैकी आस्वाद घ्यायचा.मी वड्या केल्या आहेत 

-भक्ती

Sunday, April 28, 2024

ब्राह्मणी बारव आणि इतर पुरातन पाऊलखुणा

 


खूप दिवसापासून ब्राह्मणीची बारव पाहायचं मनात होतं. पण आज ते जुळून आलं. खरं म्हणजे सकाळीच ग्रुप ट्रेकला जायचं होतं पण पण उठायला उशीर झाला सहा साडेसहा वाजले होते. पिंपळगाव माळवीच्या रोडनी चाललो होतो तेव्हा म्हटलं जाऊ या. पुढे वांबोरी चा घाट ओलांडून काही अंतराने वांबोरी गाव लागते‌ गावाच्या सुरुवातीलाच उजवीकडे एक रस्ता जातो.

 तिथे पहिल्यांदा पाहिले ते खोलेश्वर मंदिर पुरातन शंकराचे मंदिर. गाभाऱ्यात पायऱ्या उतरण्यास खोल आहे. मंदिराचा बाह्यभाग अतिशय प्राचीन दिसल्याने सुंदर भासतो. या मंदिरात बाह्य भागावर अनेक मुर्ती कोरल्या आहेत.

पुढेच वांबोरी गावाच्या वेशीतून गेल्यावर एक पुष्करणीच म्हणजेच वाम तीर्थ नावाची जागा आहे. भव्य अशी पुष्करणी तिथे आहे. बाजूलाच एक भग्न मंदिर आहे आणि मागच्या बाजूला देखील पडीक अवस्थेत असलेले शंकराचे मंदिर आहे. वामतीर्थ हे वाल्मिकी ऋषींचे नावांवरून दिलेले आहे (ऐकीव माहिती).

 पुढे आम्ही निघालो ब्राह्मणीची बारव बघायला वांबोरी गावापासून पुढे 12 किलोमीटर वरच ब्राह्मणी गाव आहे.रस्ता अत्यंत चांगला असल्याने प्रवासाचा अजिबात ताण भासत नाही.

ब्राह्मणी बारबापर्यंत पोहोचलो. पुरातत्व खात्याने ही जागा आपल्या ताब्यात घेतल्याने तेथे चांगल्या प्रकारे स्वच्छता व सोय केलेली आहे.

 बारव म्हणजेच स्टेप वेल पायऱ्यांची विहीर. आजूबाजूला तळी अथवा तलाव हा पाण्याचा मोठा साठा असल्याने त्याच्यापासून येणारे झरे शोधून त्या ठिकाणी अशा प्रकारच्या स्टेप्स वेल्स म्हणजेच पायऱ्यांच्या विहीर चौरस किंवा आयताकृती किंवा षटकोनी आकारात बांधल्या जातात .पुरातन जलव्यवस्थापनेचा हा एक उत्तम नमुना आहे.आणि त्याचबरोबर त्याच्या समोर एक मंडप असते या ठिकाणी तुम्ही मूर्तीची स्थापना बघू शकता किंवा मंडप हा त्यात हे मोकळा देखील असू शकतो व बाजूलाच अनेक प्रकारच्या तिथे खोल्या असू शकतात या ठिकाणी धार्मिक कार्यासाठी किंवा स्त्रिया पाण्यासाठी जमत असत व त्यानिमित्ताने त्यांना एकत्रित येण्याची संधी मिळत असे.

आता अशा बारवांचे स्वरूप हे अत्यंत कमी राहिले आहे त्यामुळे ज्या बारव आहेत त्यांचे संवर्धन करून तेथे दीपोत्सव करून आपण या बारवांना एक वेगळी सुद्धा एक पर्यटनाचे क्षेत्र म्हणून विकसित करू शकतो.


बारव हे नाव लांबी मोजण्याच्या ‘बाव’ या मापावरून आले असावे. बारा बाव लांब असलेल्या वास्तुला बारव असे संबोधले गेले असावे. अनेक वेळेला बारवेला कुंड, पुष्करिणी अथवा जलमांडवी या नावांनी संबोधले जाते.(संदर्भ -मानस मराठे)

बारवे कडचा भाग अत्यंत शांत निर्मळ सुंदर आहे. बाजूला चाफ्याची व इतर प्रकारची शोभिवंत सुगंधी फुले असल्याने आणि आवारा मोठा असल्याने अत्यंत शांत असे वातावरण तेथे आहे. आणि समोरच दिसते ती सुंदर अशी ब्राह्मणी बारव. या बारावेचा साधारणता काळ हा 2000 वर्षांपूर्वीचा असावा किंवा बाराशे वर्षांपूर्वीचा  असावा याबाबत ठोस अशी माहिती नाही.पण नक्कीच ही बारव खूप जुनी आहे. ही बारव पाहताना आपल्याला समोरच एक भग्न अवस्थेतील एक मंडप उंचावर दिसतो. शांत अशा सुंदर परिसराचा अनुभव घेण्यासाठी ही बारव एकदा नक्कीच पाहिली पाहिजे व डोळ्यांचे पारणे फेडले पाहिजे. 

पुढे समजले की गावामध्ये बल्लाळ देवीचे मंदिर आहे ते देखील अति प्राचीन असे आहे. बल्लाळ देवीचे मंदिर पाहायला गेलो . प्राचीन काळी मुस्लिम आक्रमणापासून वाचवण्यासाठी मूर्ती एका दर्ग्यासदृश खड्डा आणि वर उंचवटा अशा आकारात लपवली होती.तो भाग आजही देवीसमोर असून त्यावर चादर होती,त्याची आजही पूजा होते.आम्हाला दिसले की या ठिकाणी परत नवीन आधुनिक पद्धतीने तिथे ऑइल पेंट मंदिराला दिलेला आहे. त्यामुळे मूर्ती पाहताना थोडा त्रास होतो.परंतु खरं सांगते एकाहून एक सरस अशा मूर्ती तिथल्या खांबांवरती ,तिथल्या मंदिराच्या बाह्य भागावरती कोरल्या आहेत.प्रत्येक मूर्ती ही ही विशेष आणि एकमेकांपासून वेगळी आहे. 

मला बऱ्याच मूर्ती ह्या ओळखताच आलेल्या नाही. काही समाधीस्थ अवस्थेतील मूर्ती पाहून ह्या आणि मोठमोठ्या मूर्तींचे मोठमोठाले कान पाहून ही मूर्ती जैन ऋषींची आहे का किंवा दाढी पाहून ही मूर्ती इजिपशन आहे का अशा प्रकारचे मला वाटले. प्रत्येक खांबावरती असलेले भार वाहक यक्ष हे सगळे वेगवेगळे आहेत.मंदिराच्या बाह्यभागावर ते देखील कोरलेल्या मूर्ती ह्या सामान्य नव्हत्या नक्कीच याचा अभ्यासकांनी अभ्यास करून या विषयाची माहिती किंवा एखाद्या लेखन केले पाहिजे. मंदिरात मंदिराच्या परिसरामध्येच मागे शंकराचे जुने मंदिर आहे.

या मंदिराची अजून एक विशेषता म्हणजे ज्याप्रमाणे नेवासाला ज्ञानेश्वर महाराजांनी पैस खांबाला टिकून ज्ञानेश्वरी लिहिली त्याचप्रमाणे बल्लाळ देवीच्या आवारात असलेल्या 'अमृतानुभव' या खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी 'अमृतांनाभव' हा ग्रंथ लिहिला. बाजूलाच एक अतिशय सुरेख असा शांतपणे बसून आराम करणारा महिषा आहे. जो ज्ञानदेवांनी ज्या रेड्याच्या तोंडून वेद वदवले त्याची प्रतिकृती मानली जाते.. 

मंदिरामागे  एक भव्य तलाव  आहे. मागच्या बाजूलाच महादेवाचे मंदिर जे अत्यंत मोठे , खूप पुरातन असणार. आहे कारण की तिथे अतिशय केवळ मंदिर  प्रवेशासाठी चौकट किंवा मंदिराची चौकट असलेली एक बाजू आपल्याला दिसते बाकीचे चहू बाजूचे मंदिरे पडलेले आहे.

अशा प्रकारे सुंदर असे मंदिरांचे अनुभव घेऊन परत निघालो आणि येताना मिसळपावचा आस्वाद घेतला.

-भक्ती




















Sunday, April 21, 2024

आजचामेन्यू-४

 #countbiomolecule  




मला जादूचा डब्बा मिळाला.आणि डाळींना मोड आणणे हा  कंटाळवाणा कार्यक्रम आनंददायी झाला.खाकराचे जे पसरट गोल डब्बे मिळतात ते वापरून मूग आणि मेथी दाणे याला मस्त मोड आले.भिजलेले दाणे टाकून दर रात्री पाण्याचा थोडा शिपका त्यावर मारायचा.तिसर्या दिवशी डब्याला खुलजा सिम सिम केलं की छान छान मोड दिसतात. 


१.वाटीभर मेथ्या रात्रभर भिजवल्या.

२.दुसर्या दिवशी एका किंचित हवा जाऊ शकेल अशा पसरट डब्यात त्या मोड यायला पसरून ठेवल्या.

३.तीन दिवसांनी मेथ्यांना छान मोड आले होते.

४.भाजी नेहमीप्रमाणे फोडणी देत बारीक  चिरलेला कांदा टोमॅटो परतून त्यात हे मोड आलेले मेथी दाणे परतून वाफवून घेतले.

दरवेळी त्याच त्याच चवीपेक्षा वेगळया चवीची भाजी मस्त लागते.चव खरच अप्रतिम आहे किंचीत कडू अगदी नाममात्र.

fenugreek sprouts taste delicious and have an excellent result on health & skin. They are a rich source of protein, fiber, vitamins A and C, calcium, and iron. It contains photochemical in a high quantity like phenols, alkaloids, tannins, and flavonoids it is a proven remedy for diabetes, carcinogenic, hypo cholesterol. Many types of research have proven their antioxidant and immunity booster properties.(Copied)

बाकी मेन्यू..



फ्लॉवर भाजी, मोड आलेल्या मेथी दाणेची भाजी, घरचं लिंबाचे लोणचे,भात तुरीचे वरण,अर्धी पोळी.वरण अळणी आहे.भातही अळणी आहे.वरण भात खातांना मीठ न घालता कमी मिठातल्या भाज्या एकत्र करून खाल्ला.

-भक्ती

Thursday, April 18, 2024

रेडिओअक्टिव्ह -सिनेमा परिचय



 #radioactive

काही स्त्रिया बंडख़ोर असतात.जाचक नियमांचे ओझं त्या अलगद दूर करतात  आणि नाविन्याचा शोधत घेत झगडतात  नकळत त्याचा आवाज घुमत राहतो.त्या इतक्या असामान्य होत्या म्हणून आजच्या युगातल्या स्त्रियांना बळ मिळते.

मेरी क्युरी...नावच खुप आहे ना‌‌..या थोर स्त्री वैज्ञानिकीची जितकी थोरवी सांगावी तितकी कमीच आहे.

रेडिओअक्टिव्ह' हा सिनेमा कणखर मेरीचे असेच माहित असलेले  आणि नसलेले पैलू प्रभावीपणे दाखवतो.

व्यक्तिशः मला पहिली नोबेल  विजेता स्त्री,दोन वेगवेगळ्या क्षेत्रात (केमिस्ट्री आणि फिजिक्स)यात नोबेल मिळविणारी एकमेव व्यक्ती इतकीच ओळख होती.पण वडिल गणितज्ञ , लहानपणीच आईचे छत्र हरवलेली मारिया स्क्लोदोव्स्का' उर्फ मेरी क्युरी .शिक्षण मिळवण्यासाठी अत्यंत झगडा देत पोलंड स्वदेश सोडून फ्रान्स गाठते.एक वैज्ञानिक होते.तिथेच पेरी क्युरी यांची विज्ञानाच्या प्रेमापोटी भेट होते आणि दोघांतही प्रेम फुलते.या दोघांतले नाते इतके सुंदर दाखवले आहे की सिनेमात नोबेल घ्यायला पेरी एकटाच जातो (कारण मेरी नुकतीच आई झालेली असते) तेव्हा मेरी चिडून त्याला एक थप्पड मारते पण म्हणते तुझा राग आलाय पण तुझ्यावर तितकेच प्रेम करते.

पोलोनियम आणि रेडियमच्या शोधासाठी यांना नोबेल मिळते.रेडिओअक्टिव्ह ही संकल्पना ,हा शब्द मेरीने जगाला पहिल्यांदा दिला.ती म्हणतच असते मला जग बदलायचे आहे.पेरीच्या अचानक अपघाती मृत्यूनंतर दोन मुलींचे संगोपन असूनही विज्ञानाचा ध्यास ती अजिबात सोडत नाही.त्याकाळातही एका सहकार्याबरोबर असलेले इंटीमसीचे नातं नाकारत नाही,दुसरे नोबेल पारितोषिक घेण्यासाठी सध्याच्या अफेअरमुळे येऊ नका असे पत्र मिळाल्यावर 'नोबेल मला ट्यालेंटसाठी मिळाले आहे माझ्या व्यक्तिगत आयुष्याचा याच्याशी संबंध नाही 'हे ती ठणकावून सांगत सोहळ्याला जाते.

मेरीच्या शिक्षणासाठी तिच्या बहिणीनेही तिला खुप साथ दिली होती.पहिल्यांदा बहिणीच्या शिक्षणासाठी मेरीने शिकवणी,शिक्षकीची नोकरी करत आर्थिक साहाय्य केले.नंतर बहिणीने तिचे शिक्षण पूर्ण झाल्यावर मेरीला शिक्षणासाठी आर्थिक साहाय्य केले.

पुढे मुलीही तेवढ्याच कणखर पहिल्या महायुद्धात आई मेरी क्युरी  बरोबर त्यांनी परिचारिका म्हणून काम केले होते .व सैनिकांच्या शरीरात घुसलेल्या गोळ्यांच्या जागा नक्की करण्यासाठी रेडीओलोजिक मोटारकार याचा शोध लावला .


कृत्रिम किरणोत्सर्गी(कण वा किरण बाहेर टाकणारी ) मुलदव्ये तयार करण्यात इरी क्युरीने (मेरी क्युरी यांची मोठी मुलगी)पतीबरोबर कार्य केले .या साठी दोघांना १९३५ साली रसायनशास्त्रचे नोबेल पुरस्कार मिळाले .

सिनेमात रेडिओ अक्टिव्ह शोधाने जगात जे मोठे बदल झाल्या अशा घटनांचे मध्येमध्ये चित्रणही दाखवलेले आहे -1956 मध्ये क्लीव्हलँड येथील रुग्णालयात बाह्य बीम रेडिओथेरपी , हिरोशिमा आणि नागासाकी ,1961 मध्ये नेवाडा येथे अणुबॉम्ब चाचणी आणि चेर्नोबिल आपत्ती यासह तिच्या शोधांचा भविष्यातील परिणाम दर्शविणाऱ्या दृश्यांसह मेरीच्या आयुष्यातील दृश्ये गुंतलेली आहेत(सौ.विकी)

आई जेव्हा वारली तेव्हापासुन तिने अध्यात्माचही त्याग केला, कदाचित तेव्हापासुन ती केवळ‌ फैक्टवर विश्वास ठेवू लागली.विज्ञानाची सम्राज्ञी मेरी क्युरीच्या आयुष्याचा हा 'रेडिओ अक्टिव्ह' सिनेमा नक्कीच पहा..

-भक्ती

OTT - Amazon Prime