Thursday, May 18, 2023

‘एव्हरीथिंग,एव्हेरीव्हेअर, ऑल at वन्स’


 

जर तुम्हांला बुद्धीला ताण द्यायला आवडतं असेल.आऊट ऑफ बॉक्स साय –फाय सिनेमा आवडतं असेल तर ‘एव्हरीथिंग,एव्हेरीव्हेअर ऑल at वन्स’ हा सिनेमा तुमच्यासाठी आहे.

मी हा सिनेमा बघण्याचे कारण म्हणजे सात ऑस्कर या सिनेमाने खिशात घातले आहे.तेव्हा पाहायला सुरुवात केलीच.

सुरुवातीलाच कुरकुर करणारे,धोबी व्यवसाय असणारे पालक आणि एकुलती एक मुलगी जी गे आहे भेटतात.शेवट पर्यंत असच काहीतरी संथ चालेल तर असे वाटते.पण मग टेक्स ऑफीसमध्ये वेमोंडमुळे(नायक म्हणता येईल) जो काही धुमाकूळ सुरु होतो त्याने एवेलीन(नायिका)चे जसे डोकं गरगरत तसच आपलपण गरगरायला लागते.

तर पहिला भाग ‘एव्हरीथिंग’ सुरु होतो.तुम्ही Matrix पाहिला आहे का ? तर त्या सारखाच आपला वावर अनेक समांतर जगात असतो.प्रत्येक ठिकाणी आपली भूमिका ,वावर वेगवेगळा पण इथे डेस्टिनी एकच आहे ...मृत्यु ,तो तुम्हाला येतोच.एवेलीनला अनेक समांतर जगाचे दर्शन देऊन त्या त्या जगातली तिची ताकद तिला मिळवून लढायचं आहे ,कोणा विरुद्ध  तर  जोबू (शत्रू) ती तिची मुलगी ‘जॉय’ च दाखवली आहे.

एवेलीनचे सिनेमा नायिका,शेफ,सिंगर,मोठ्या बोटाची बाई असे काही समांतर रूप आहेत.आता ही रूप का आली तर एवेलीनचं एक दु:ख आहे, ‘मी जर वडिलांविरुद्ध लग्नाचा निर्णय घेतला नसता तर माझ आयुष्य खूप वेगळे असले असते” असे तिला वाटते.हे लग्न नसत तर ती काय असती याचे हे अनेक समांतर जग ,त्यात तिचा शत्रू जोबू तिला मारणार असतो.एवेलीन मरते.पण परत जिवंत होते वेमोंडवर तिला विश्वास वाटू लागतो.

दुसरा भाग सुरु होतो ‘एव्हेरीव्हेअर यातही आता एवेलीन नशीब बदलायला त्या त्या समांतर लोकांची मदत घेवू पाहते.जरा कॉम्प्लेक्स घटना दिसतात.जॉय उर्फ जोबू आईला हे सगळ सोडून चाल दूर असं काहीतरी सांगत असते.ती तीच ऐकणारच पण वेमोंड तिला रोखतो ,सरतेशेवटी जगात प्रेमाहून मोठ काहीच नाही याचा तिला साक्षात्कार होतो.सर्वांनी प्रेमाने वागावे ,जगाला प्रेम अर्पावे असे ती सांगते.

जॉय ऐकत नाही तिला ती खूप समजावते जॉय परत येते.

मग सुरु होतो तिसरा भाग ‘ऑल at वन्स’ म्हणजे एवढे सगळ महाभारत न होता एवेलीन लग्नाचा निर्णय योग्य आहे-वेमोंडच सगळ्यात जवळचा आहे हे सगळ मान्य /accept करते तेव्हा ‘जॉय’ ही बरोबर असतो आणि सुखरूपपणे कुटुंब यशस्वी tax भरते.एकत्र नांदतात.

तर यात ‘जॉय’ हे पात्र आनंदाचे रूपक दाखवले आहे.आयुष्यात घेतलेल्या निर्णयांची आनंदाने जबाबदारी घेतल्याने ‘जॉय’ दूर जात नाही.

-भक्ती

Monday, May 15, 2023

पैस भेट!

 


काल जागतिक मातृदिन होता. “जो जे वांछील ,तो ते लाहो||प्राणिजात ||” असे समस्त विश्वासाठी पसायदान जिथे मागून साऱ्या विश्वाची ‘माउली’ झालेल्या ज्ञानेश्वरांच्या पैस  या खांबाला भेट दिली.उणापुरा तीन फुट कातळ खांब ,जरासा एकटाच! डाव्या बाजूला सूर्य चंद्र हे पैस म्हणजे अवकाश यांच चिरंतर प्रतिक आहे.प्राकृत मराठी जिथे नवतरुण युवकाच्या असीम विद्येतून जिथे आकार घेत होती,ज्ञानेश्वरीचे अमृत जिथे पाझरले  तिचा साक्षीदार हा पैस!पैसाभोवती वारकरी सांप्रदाय आजही परंपरा जपत आहे ,याचे मुल्य कित्येक पिढ्या चुकवू शकत नाही.दोन क्षण पैसवर डोके टेकवले असता,काळ गळून पडावा आणि माउली प्रगटावी.अमृताचे बोल कानी पडत आहे,समस्त जग आजूबाजूला बसून तल्लीन व्हावे असे वाटले.दुर्गाबाईंचे ‘पैस’ हे ललित पुस्तक प्रसिद्ध आहे.त्यात बाई म्हणतात “पैसच्या वरचे जग आजही पैशावरच तोलले आहे.”पण तरीही ज्ञानेश्वरी ज्याने अनुभवली त्याने अनेक कोनापैकी एक जीवन कोन नक्कीच जाणला आहे.

१५ व्या शतकापर्यंत करवीरेश्वर हे महादेवाचं मंदिर अस्तित्वात होते.पण नंतर क्षतीग्रस्त झाले.याचे काहे अजून दोन जुने खांब आवारातल्या दत्त मंदिरात दिसले.यावरून हे मंदिर किती जुने हे मला  नाही समजले पण तो भाग पुरातत्व विभागाचा आहे.मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यानी मला जेव्हा दहा वर्षापूर्वी आले होते तेव्हाही भुरळ घातली होती आणि आजही!पण इतक्या वर्षात मनाच्या प्रदेशातील उलथापालथ जाणवली. पण मराठीशी नाळ जोडलेली कायमचीच आहे. तेव्हा कवितेच्या आधाराने पैसची नजरेला  ओढ आणि आज जरा अवकाश विस्तारलेली आत्मिक नजरेची ओढ जाणवली.पसायदान गाऊन पुढे निघाले,आणखीन एक  ‘अमृतानुभव’ पाहायला.

नेवासमध्ये विष्णू अवतारांपैकी एक अर्धनारीनटेश्वर ‘मोहिनिराज’ अवताराचे मंदिर आहे.ह्या मंदिराचे सुव्यवस्थित बांधकाम पाहून मी थक्कच झाले.साधारणत: सतराव्या शतकात यांचे पुर्नबांधणी अहिल्यबाई होळकर यांच्या काळात झाली. प्रवेशद्वाराशीच आकर्षक द्वारपाल-भालदार ,चोपदार  मूर्ती आहेत.मंदिराच्या छतावरील विविध वाद्ये धारण केलेली शिल्पे मोहक आहेत. भारवाहक यक्ष अगदी मोजावेत इतकी भरपूर होते.मंदिराच्या चौकटीवर विष्णू अवतार कोरलेले आहेत. मोहिनीराजाच्या मूर्ती शेजारी लक्ष्मीदेवीची मुर्ती आहे. पण मंदिर भर वस्तीत आहे,गाभाराही अनेक माणसांना ,कार्यक्रमांना सामावून घेण्याइतपत  मोठा नाही त्यामुळे जास्त काळ थांबू शकले नाही.मंदिराचे बाह्यरूप केवळ अप्रतिम आहे. हेमाडपंथी बांधकाम,होळकर काळातील मंदिरांप्रमाणे आकर्षक कळस.काही शिल्पे या कोरलेली पाहायची राहिली बहुतेक.

मनात विचार आला एक ऐहिक अमृतपान आणि एक आत्मिक अमृतपान अनुभवलेले हे नशीबवान ठिकाणच आहे.

आणि हो नेवासातील शनी शिंगणापूर ही पाहिले.येताना जातांना गुलमोहराचे लाल झुबर आणि बहावाची पिवळी झुंबर निसर्गाची ग्वाही अधोरेखित करत राहिली.

-भक्ती