Sunday, April 10, 2022

शिशिर ऋतू

 थंडीने पूर्ण शहर धुक्यात विसावलेलं असत.तेव्हा बालभारतीची बा.सी.मर्ढेकरांची “पितात सारे गोड हिवाळा “ ही कविता मला आठवते.अशा धुक्यात हरवलेली रम्य पहाट आनंद देते.

पितात सारे गोड हिवाळा
न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर
सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी
नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती

गंजदार पांढर्यार नि काळ्या, मिरवीत रंगा अन नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी
कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुर्याा शांततेचा निशिगंध

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्त्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्ध्य भास्करा
थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा

कवी - बा. सी. मर्ढेकर
सौजन्य-https://kavitabhavlelya.blogspot.com/2008/05/blog-post_22.html
हिवाळ्याच इतक सुंदर काव्य !आता मुंबईतच काय कुठे इतका गोड हिवाळा दिसतो का?

वातावरण शुष्क ,पानगळीचा मोसम पुन्हा सुरु होतो.पाण्याची कमतरता झाडांना जाणवते आणि बाष्पीभवन थांबवण्यासाठी पान गळतात.ज्या झाडांची मुळे खोल गेली आहेत त्यांची पानगळ होत नाही .ज्याची पानगळ झाली आहेत त्यांवर भडक फुलांचा साज चढतो आणि परागीभवन सोपं होत.

जास्वंद
१
3
2

शासनाने घाटाघाटात लावलेले ग्लीरीसिडीया म्हणजे उंदीरमारी/गिरिपुष्पचे मोहक फुले संक्राती नंतरच्या भटकंतीत दिसून येतात.
a
2

होलीहोक
a

शमीचा बहार /फुले मी पाहिल्यांच या काळात पाहिले.

z

सूर्याची किरणे मोहक असून या काळात गोड पदार्थ विशेषतः गुळ ,तीळ याचे सेवन आवडते.
महाकवि श्रीहर्ष संस्कृत महाकाव्य ‘नैषधीयचरित काव्यात शिशिरला दान देणारा श्रेष्ठ ऋतू मानला आहे
स्वत:चे सुंदर रूप शिशिरात दान करून कमळांनी पुण्याच कमावले आहे .त्यामुळे ते दमयंतीचे नेत्र आणि त्यांच्या कळ्या चकोराचे नेत्र झाले आहेत.

  • वर्णन


a

ऋतुसंहारात कालिदासाने थंडीचा हा ऋतू स्त्रियांसाठी ,प्रेमींसाठी लाभदायक याची पाचव्या सर्गात वर्णने केली आहेत.त्याचा सुरस आस्वाद यात घेता येईल.

ऋग्वेदात पाच ऋतू मानले गेले आहेत ज्यात शिशिर ऋतूचा समावेश हेमंत ऋतूशी एकत्रित केला आहे.
या पुरातन काळापासूनच इक्षु म्हणजेच ऊस याला शिशिरातील धरणीचे आच्छादन म्हंटले आहे.आजही संक्रातीनंतर ऊसाचे रस यथेच्छ प्यायला जातो 
सणांचा विचार करता ,महाशिवरात्री,माघी चतुर्थी आणि होळी,रंगपंचमी हे येतात.नवरंगात सगळा आसमंत प्रत्येक राधा –कृष्ण रंगून जातात !उत्तर भारतात याचा विशेष आनंद असतो.

पिचवाई चित्र
3

असा हा शिशिर उत्तरायण पाहत सरून फाल्गुन सुरुवातीलाच वसंत आगमनाने नाहीसा होत जातो.

-भक्ती