Friday, November 26, 2010

कविता रसग्रहण

लाजू कशी
सजू कशी
उरी आली कळ
थकलेल्या सुरापाशी
पिकलेले फळ
सांगू कशी
झाले पिशी
कानी आली साद
भादव्याचा देह माझा
सावरीचे भान

या भावनेमध्ये एका परिपक्व प्रेमाचा आनंद लाभतो.अल्लड वयातिल,हुरहुरणारे ,भोळे प्रेम यांना खळखळाट फारच...पण या शब्दांमध्ये एक खासच वैशिष्ट्य ,विशेष भाव,ती नजाकत आहे.
सांगू कशी
झाले पिशी
कानी आली साद
भादव्याचा देह माझा
सावरीचे भान
वाह!!!!प्रीतीत हरवू गेली ती,भान अस्तित्व सारसार प्रेमाच्या एशा~यान ती भूलून गेली..भाद्रपदचा देह,काहीसा प्रगल्भपणा दिसतो आणि श्रावणासारख नव पल्लवीच नाजूक मन म्हनॅजे प्रेमात हरवलेल्या लावण्य़वती पण पिकलेल्या या प्रीत गोड फळाच्या फांदीला कोमल कोवळ्या पानांची झालर आहे.


ठुमरीच्या पायात राधेचे पैंजण
ठुमरीच्या हातात कान्हाची मुरली
ठुमरीच्या श्वासात मीरेची भक्ती
ठुमरीच्या कंठात आत्माचची पुकार
ठुमरीच्या डोळ्य़ांत मिलनीची तृप्ती
ठुमरीच्या वाटेवर अमूर्ताचे मंदिर
जियो! जियो! सूर ताल लय...सार संगीत भारतीय संगीत जियो!

ह्या ओळीवाचून संगीताचा घट भरलेला आहे पण मी तहानलेलीही होउ शकत नाही अशी अवस्था आहे..
म्हणून शब्द रसग्रहण...

सृष्टी न सृष्टी ,तन अन मन अलौकिक भावनेनी जणू भारलेली या शब्दांनी भासते.की हीच ठुमरी जिने राधेचे पैंजण ,कान्हाची मुरली,मीरेची भक्ती,मिलनाची आस,आत्म्याची पुकार आपल्या
पायात्,हातात,श्वासात,कंठात ,डोळ्यांत धारण करून अप्रतिम सौंदर्य मिळवले आहे...तिच्या पुढच्या वाटेवर या संपुर्ण सच्च्या रूपामुळे पवित्र मंदिर भेटणार आहे,,की ज्याचा आस्वाद ठुमरी रसिकांना देणार आहे.मस्त.

No comments: