Sunday, August 7, 2022

अळूच्या वड्या आणि अळू देठांची कोशिंबीर
















पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आळुच्या वड्या बनवायलाच पाहिजेत. या वेळेस मी गुजराती पद्धतीचा अळूच्या पत्र्या असे त्याला म्हणतात अशा ही करायच्या ठरवल्या.

या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घेता येईल की इतके दिवस जो माझा पदार्थ चुकत होता, ज्या प्रकारे त्याला लेयर पडत नव्हते .लक्षात आले की जे बेसन पीठ आहे ते घट्ट मळायचे आहे मळायचे म्हणण्यापेक्षा ते त्याचं जे बेसन पीठ आहे ते त्याचा घोळ जो आहे तो घट्ट करायला पाहिजे.

चला तर करूया मग अळूच्या पानाच्या वड्या

पहिल्यांदा ळूची दहा-बारा पाने घ्यायची पाणी स्वच्छ करून घ्यायची आणि त्याची देठे काढून घ्यायची अळुच्या पानांना आता तेल लावून घ्यायचे.

आता बेसन पीठ साधारणतः तीन वाट्या ग्यायाचे.

त्यात  दोन चमचे मिरची आलं लसूण पेस्ट ,ओवा, तीळ, हळद ,हिंग ,मीठ असे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचे आणि थोडे थोडे पाणी टाकत घट्टसर मळून घ्यायचे.

आळूची पानं घशाला खवखवणे म्हणून ती त्रिकोणी असतील असलेली हवी याकडे लक्ष द्यायचे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये चिंच गुळाचा एक छोटी वाटी कोळ घालायचा आहे .

आता आता आळूचे एक पान घेऊन त्यावर हे बेसन पिठाचे घोळ पसरवायचा आहे हातानेच आणि त्यावर दुसरे पान ठेवून तो देखील घोळ त्याच्यावरती पसरवायचा आहे तुम्हाला जेवढे जास्त लेअर्स हवे तेवढे जास्त पाने एकावर एक ठेवत जायच आहे. मी इथे साधारणता तीन पाने एकत्र घेतलेली आहेत.

https://drive.google.com/uc?export=download&id=11BdpF4m-7GNtA6QlejlLgEPtsjHi7-_F

त्यानंतर याची गुंडाळी करायची आहे .

ह्या अळूच्या पानांची केलेले गुंडाळी आता डायरेक्ट बारीक चिरून तळू शकतो म्हणजे उकडता ही पहिली पद्धत.

दुसर्या पद्धतीमध्ये आळूची ही रोल केलेली पाने उकडून घ्यायचे. अर्थात शिट्टी लावता ते भांड्यात किंवा इडली पात्र मध्ये उकडून घ्यायचे.

https://drive.google.com/uc?export=download&id=11UaCzRyWnNDScZO2fWCAWH7TZBy4wHCu

आता उकडलेली पाने गोलसर चिरून ती खमंग खुसखुशीत डीप फ्राय करून घ्यायचे.

अशा पद्धतीने दोन पद्धतीने अळूच्या वड्या झटपट तयार होऊ शकतात.

अळूच्या देठांची कोशिंबीर

आता आता अशी एक गंमत की आळूच्या देठांचं करायचं काय ?

तर शोधता शोधता एक पारंपरिक रेसिपी सापडली.

यामध्ये पहिल्यांदा आळूच्या देठाचे ज्या शिरा आहेत वरच्या त्या काढून घ्यायच्या, वरचा आवरण काढून घ्यायचे.

ते आवरण काढून घेतल्यानंतर त्याचे एक ते दोन सेंटीमीटर चे तुकडे करून घ्यायचे.



या देठांपासून ही दोन रेसिपीज तयार करू शकतो.

१.     ज्या पद्धतीने इतर भाज्या करतो त्या पद्धतीने परतवून हे देठ  हलकेसे भाजून  परतवून शेंगदाण्याचा कूट घालून भाजी करू शकतो.

२.      किंवा याची आपण कोशिंबीर किंवा रायता करू शकतो.

 तर मी कोशिंबीर केली यामध्ये

ही देठ पाण्यामध्ये उकळून घ्यायची

उकळलेल्या देठांमध्ये दोन किंवा एक चमचा दही घालायचे आहे.

दोन चमचे दाण्याचा कूट ,मीठ ,साखर (कधीही कोणत्याही लिंबू किंवा दह्याचा वापर केल्यावर एक चमचा साखर घालावी जेणेकरून ती चव जी आहे ती अतिशय आंबट होता बॅलन्स होते )

आता फोडणीसाठी तेल गरम करायचे.

गरम तेलामध्ये जिरे, हिंग आणि तीन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि गॅस बंद केल्यावर कोथिंबीर टाकायची चिरलेली कोथिंबीर टाकायची.

ही फोडणी तयार केलेल्या रायत्यामध्ये घायायाची.

करता करता आणखी एक आठवलं की फ्रिजमध्ये एक वाटी सोललेले डाळिंब आहे आणि मग अचूकच त्याच्यामध्ये मी डाळिंब दाणे टाकले.

अशी ही आळूच्या देठांची अधिक डाळिंबाची कोशिंबीर तयार तुमच्याकडे पेरू, सफरचंद जे फळ असेल ते बारीक चिरून ही तुम्ही ते टाकून ही कोशिंबीर तयार करू शकता.

परंतु ही कोशिंबीर फळांमुळे जास्त वेळ ठेवता लगेच खावी लागते


अळू वड्या,अळू देठ डाळिंब दाणे कोशिंबीर,घरी बनवलेली पनीर चिली J मैत्री दिनाच्या शुभेच्छा!



-भक्ती

 


Sunday, July 17, 2022

रताळीपासून तिखट पुरी

 


एकादशीला हक्काने घरात आलेले कार्बोहाड्रेट म्हणजे साबुदाणा ,बटाटा आणि रताळी !त्यात रताळीला एकादशीलाच जास्त आणंल  जाते.बाकी इतर वेळी तसे दुर्लक्षितचअसतात.रताळी –दाणे किस,रताळ्याची खीर झाली.आता दोन दिवसांनी लेकीसाठी तिखट पुऱ्या करायचं ठरवलं.गुळाच्या पाण्यात गोड पुऱ्याही होतात,पण तिला गोड  जास्त आवडतं नाही.

साहित्य-

४ उकडलेली रताळी

१ मोठी वाटी कणिक पीठ

१ छोटी वाटी रवा

आलं ,मिरची ,लसून,जिरे  यांची एकत्रित पेस्ट

४ चमचे तीळ

१ चमचा तिखट

१ चमचा हळद

१ चमचा धणेपूड

चिरलेली कोथिंबीर

चवी पुरते मीठ

तळण्यासाठी ३ मोठी वाटी तेल

कृती:

तर मग कुकरमध्ये उकडलेल्या रताळ्याची साल काढून चांगली स्मश करायची.

गव्हाच्या पिठात तेल व  हे कुस्करलेली रताळी टाकायची. यात रवा   आणि वरील सर्व जिन्नस आल पेस्ट ,तिखट ,धणेपूड टाकायचे.

शेवटी कोथिंबीर आणि तीळ भुरभुरले की खूपच सुंदर मिश्रण दिसते.आणि हाच तो महत्वाचा क्षण J



हे मिश्रण  एकजीव करून एक गोळा मळायचा.पाण्याची अजिबात गरज लागतं नाही.

एक मोठी  जाडसर पोळी लाटून वाटीने गोल आकाराच्या पुऱ्या बनवायच्या.

गरम तेलात मंद आचेवर तळून घ्यायच्या. जरा ट्यूब पेटली शेप कटर नव्हता ,हातानेच स्टारचा आकार करून तळला.एक छोटासा ट्री शेप कटर होता.बिस्कीट सारखा तो तळला.

महत्वाची गोष्ट –ह्या पुऱ्या गरमा गरमच खायच्या कारण  रताळीमुळे त्या लवकर मऊ होऊ शकतात.



-भक्ती  

 

 

एक भास

 अपूर्वाई कोंदणात​

तुझ्या माझ्या प्रितीत
चांदण....लख्ख प्रकाश|

सांज रंगी उधळतात
आठवणी मोती झेलत
निशब्द....मंद श्वास|

शोधे जादूई तळ्यात
मासोळी नयनांत
पाणकळा...तुझं आकाश|

मोरपंखात निथळत
कृष्ण मुरली सुरांत
राधा...एक भास|

-भक्ती
(हायकू लिहिण्याचा एक प्रयत्न)

सुंदर ते ध्यान

 ध्यास सावळ्या विठूचा मनी

वाट पंढरीची चालावी चालावी...

समस्त संतांना ज्या रूपाने भक्तीची दीक्षा दिली,त्याच विठूच्या रूपाचा ध्यास घेत आजही भक्तीमय वारकरी पंढरीकडे मार्गस्थ करीत राहतो. विठूचे ते कमरेवारचे दोन हात अत्ठ्ठावीस युगांपासून ठेवलेले आहेत.पण आताच लेकराला आवडत्या कामाला लावून एखादी माउली दोन क्षण कमरेवर हात ठेऊन निश्चिंत उभी आहे असा भास होतो.सार्या जगाचा कारभार हाकणारे हात क्षणभर विठूने कमरेवर ठेवले आहेत.
त्या विटेची ती काय समाधी अवस्था घट्ट रोवलेल्या संकल्पांची ध्योताकच आहे.

गळ्यात विराजमान तुळशी हार विठूला सदैव सुगंधित करतात.इकडे वारकर्याच्या डोयीवरच्या तुळसहीचा श्वास आसमंत दरवळत राहतो.विठुच्या गळ्यात रुळनार्या तुळशीच्या श्वासाशी एकरूप होत या माथ्यावरच्या तुळशी मार्ग काहीसा सुसाह्य करीत राहतात.

विठूचे रूप सावळे ! आषाढातले मेघही सावळे !हे धावणारे सावळे मेघ ,मेघातल्या सरी ,विठूच्या भक्तीरसात वारकऱ्यांनाही विठूचे सावळे रुपडं देतात.
विठूच्या कपाळीचा टिळा,केशर सुवास वाटेतल्या नदीच्या स्नानात सुगंधित करीत राहतात.

मजल दरमजल नामघोषात ,मनाचे कोष तोडीत चंद्रभागेच्या काठाशी भाव दान समर्पित करतात.कळसाच्या त्या दर्शनाने मनातील पुढच्या अनेक हेतूंना उंची देतात.तर विटेवर उभ्या त्या विठूच्या पावलांशी दोन क्षण नतमस्तक भक्ती केंद्रित मना ,त्या मन गाभाऱ्याचा विस्तार अनंत करतो.
पुन्हा पुढच्या वर्षी तेच सुंदर रूप,तोच ध्यास ,तोच श्वास ,पंढरीची वाट!

-भक्ती

Friday, May 13, 2022

मेथांबा

 


मेथांबा

कैरी म्हणजे माझ पाहिलं प्रेमच आहे .लहानपणी अशा तिखट मीठ लावून कैरी खायचे की समोर बघणाऱ्याचेच दात आंबायाचे.आता तर कलमी आंब्याच्या कैऱ्या अजिबात आंबट नसतात तेव्हा छान आंबट गोड लागतात.अगदी दुकानदार सुट्ट्या पैशांऐवजी  कच्चा आंब चोकलेट(गोळी) द्यायचा ती पण मलाच दिली जायची ;)

 कैरीच लोणचे घातलं की आई बरणी लपवून ठेवायची ,नाहीतर कधी फडशा पडेल सांगता येत नसे.सासारीपण कोणीच आवडीने लोणचं खात नाही पण माझ्यासाठे एक बरणी राखीव असते .

साखर आंबा ,गुळांबा एवढा नाही आवडत.पण आता दिवेकरबाई डायटवाल्या यांनी सांगितल्या प्रमाणे गोड खाण्याची इच्छा झाल्यास गुळांबा हा सर्वात योग्य पर्याय आहे,कारण गुळाचे लोह तत्व शरीरास मिळते.

कैरी किसून ,फोडी करून झटपट लोणची करता येतात.त्यातलाच मेथांबा हा एक सुंदर झटपट होणारा प्रकार आहे.

हा मेथांबा कैरीची साल काढून फोडणी देऊन करतात.पण मला जास्त उकडलेल्या कैरीचा आवडतो.फायदा असा कि पन्ह करण्यासाठी कैरी उकडून ठेवल्यावर दोन एक कैऱ्यावापरून कधीही मेथांबा करता येतो.मेथ्या ह्या आरोग्यासाठी चांगल्या असतात.तशाही मेथ्या कमीच खाल्या जातात.

आंबट गोड आणि त्यात मेथ्यांचाचा किंचित वेगळा स्वाद बराच काळ जिभेवर रेंगाळत राहतो.


साहित्य:

दोन उकडलेल्या कैरी

१ कप गुळ

१ चमचा मेथ्या

१ चमचे जिरे

१/२ चमचा मोहरी

१/२ चमचा हळद आणि हिंग

फोडणीसाठी तेल

तिखट मीठ आवडीनुसार –मेथांबा हा प्रकार तिखट अधिक छान लागतो.

उगाच कांदा,लसूण हे प्रकार कैरी बरोबर अजिबात आवडतं नाही.कैरीच्या स्वादाचा स्वत:चाच एक तोरा असतो J

कृती

उकडेल्या कैरीचा गर काढावा.सुरीने त्याचे तुकडे करावे.गर smash करू नये.फोडणीसाठी कढईत तेल घ्यावे .तेल गरम झाल्यावर जिरे ,मोहरी, हळद,हिंग घालावे.या सगळ्यांनी तडमताशा करत हळद लावून हिंगाचा अत्तर उधळल की मेथ्या त्यात टाकाव्यात gas मंद करावा.मेथ्या जळू नये याची काळजी घ्यावी.

आता उकडलेल्या  कैरीच्या फोडी त्यात टाकाव्यात.एक वाफ येऊ द्यावी.आता त्यात किसलेला गुळ घालावा .गुळ जसा हळू हळू एक जीव होता आणि पदार्थाचा रंग बदलू लागतो ते मोहक वाटत.आवडीनुसार तिखट टाकावे.मीठ टाकावे.

पुन्हा एक चांगली वाफ येऊ द्यावी,कैऱ्या उकडलेल्या असल्यामुळे अगदी कमी वेळ वाफ द्यावी.पाण्याची तर अजिबात गरज नाही.बरेच दिवस हा तयार मेथांबा बरणीत टिकवता येतो.तो जसा मुरेल तसा आणखीनच कमाल लागतो.

 

-भक्ती