अलड्ड वयातील कळीची ही कविता आहे
तुझी आठवण येते तेव्हा......
आईच्या कुशीत शिरुन
हलकेच मुक अश्रु गिळुन
मी घेते अलगद रडुन
आई म्हणते,"काय झाल बाळा?"
मी म्हणते "काही नाही डोके दुखतेय अजुन"
तुझी आठवण येते तेव्हा......
प्रिय सखीचा हात धरते घट्ट
बोलावे वाटते पण मन करते निगरगट्ट
विसरुन जाते पुढचा काळोख कुट्ट
सखी म्हणते ,"काय झाले प्रिये?"
मी म्हणते"काही नाही तु हवी हाच हट्ट"
तुझी आठवण येते तेव्हा ........
मनीला मी खुप खुप कुरवाळते
तिच्यावरच्या मायेत ओलावा सापडतो
केशराची ढेव तिच्या दुधात ओतते
मनी काही नाही म्हणत,फ़क्त डोळे लुकलुकवते
मी मात्र तिच्या पुढे एकदम व्यक्त होते....
#भक्ती.
तुझी आठवण येते तेव्हा......
आईच्या कुशीत शिरुन
हलकेच मुक अश्रु गिळुन
मी घेते अलगद रडुन
आई म्हणते,"काय झाल बाळा?"
मी म्हणते "काही नाही डोके दुखतेय अजुन"
तुझी आठवण येते तेव्हा......
प्रिय सखीचा हात धरते घट्ट
बोलावे वाटते पण मन करते निगरगट्ट
विसरुन जाते पुढचा काळोख कुट्ट
सखी म्हणते ,"काय झाले प्रिये?"
मी म्हणते"काही नाही तु हवी हाच हट्ट"
तुझी आठवण येते तेव्हा ........
मनीला मी खुप खुप कुरवाळते
तिच्यावरच्या मायेत ओलावा सापडतो
केशराची ढेव तिच्या दुधात ओतते
मनी काही नाही म्हणत,फ़क्त डोळे लुकलुकवते
मी मात्र तिच्या पुढे एकदम व्यक्त होते....
#भक्ती.
No comments:
Post a Comment