कुळीथ खर तर उष्ण असल्यामुळे हिवाळ्यात कुळीथ ,कुळीथ पीठ वापरून याचे पदार्थ तयार करतात.पण मागे सांगितल्याप्रमाणे #शेंगोळे खूप आवडतात .एका कृषिप्रदर्शनात तयार शेंगोळे -कुळीथ पीठ विकत घेतले.त्यात आधीच गव्हाचे पीठ लसूण ,तीळ ,तिखट ,मीठ हे घातलेले होते.आज मी दुसऱ्यांदा शेंगोळे तयार केले .कुळीथ पीठ थोडं जड असतं, त्यामुळे जास्त तेल घालून मळल्यास शेंगोळे चांगले फुटतात
कुळीथ पीठ-अर्धा कप. पीठ चिकट होत असेल तर गव्हाचे पीठ किंवा ज्वारीचे पीठ २ ते ४ टेबलस्पून
कांदा-१
टोमॅटो-१
लसूण पाकळ्या १०
हिरव्या मिरच्या ४
कोथिंबीर १/४ कप
जीरे १ टीस्पून
ओवा १ टीस्पून
हळद १/२ टीस्पून
मीठ चवीनुसार
तेल २-३ टेबलस्पून (पीठात घालायला)
फोडणीसाठी
तेल ४ टेबलस्पून
मोहरी १ टीस्पून
हिंग १/४ टीस्पून
सुक्या लाल मिरच्या २
पाणी – ग्रेव्ही साठी गरजेनुसार जास्त-कमी
कृती
मसाला वाटून घ्या
लसूण + हिरव्या मिरच्या + जीरे + थोडी कोथिंबीर + थोडं मीठ एकत्र बारीक वाटून घ्या.परतलेला कांदा,टोमॅटो यांचीही ग्रेव्ही यात एकत्र करा.
एका परातीमध्ये कुळीथ पीठ घ्या.त्यात ओवा,तीळ जिरे आणि २ चमचे तेल टाकत हळूहळू थोडं-थोडं गरम पाणी घालून मध्यम घट्ट पीठ मळा.
जरा घट्टच मळा .पण चिकट नको.५ मिनिटं चांगलं मळून घ्या. झाकण ठेवून १० मिनिटं राहू द्या.
शेंगोळे बनवा
हाताला थोडं तेल लावा.पीठाचा छोटा गोळा घेऊन बोटांनी लांबट, लहान लहान तुकडे करून वळा.ट्रेडिशनल पद्धतीत चकलीच्या सोऱ्यातून किंवा हाताने लांब लांब करून बनवतात, जाडाई बोटाएवढी ठेवा.
एका मोठ्या भांड्यात ४-५ कप पाणी उकळायला ठेवा.थोडं मीठ आणि १/२ टीस्पून तेल टाका.उकळी आल्यावर शेंगोळे हळूहळू सोडा शेंगोळे ८-१२ मिनिटं शिजवा ते वर तरंगायला लागतील आणि चांगले फुगतील.
दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करा. मोहरी फोडणी हिंग सुक्या लाल मिरच्या ,ग्रेव्ही टाकत परतून घ्या.उकळलेले शेंगोळे यात सोडा .२-३ मिनिटं शिजवून गॅस बंद करा.
गरमागरम शेंगोळे वाटीत काढा, वरून कोथिंबीर टाका.
ताक, कोथिंबीरची चटणी किंवा लिंबू पिळून खाल्ल्यास मजा येते!
कुळीथ पीठ (हुलगा पीठ किंवा horse gram flour) हे Macrotyloma uniflorum या वनस्पतीपासून तयार केले जाते. हे पीक भारतातील प्राचीन काळापासून लागवडीत आहे आणि त्याचा इतिहास खूप जुना आहे.कुळीथ हे दक्षिण आशियातील उष्णकटिबंधीय भागातील मूळचे पीक आहे, मुख्यतः भारत हे त्याचे केंद्र मानले जाते.पुरातत्वीय पुराव्यानुसार, भारतात कुळीथाचे अवशेष इ.स.पू. २५०० ते २००० पासून सापडले आहेत. हे प्राचीन भारतातील प्रमुख पिकांपैकी एक होते.
भारतातील दक्षिणेकडील प्रायद्वीप( Peninsular India) आणि पश्चिम भारत (उदा. सौराष्ट्र) येथे स्वतंत्रपणे पिकवले जाण्याची शक्यता आहे. काही अभ्यासानुसार, उत्तर-पश्चिम भारतात सुमारे ४००० वर्षांपूर्वी आणि दक्षिण भारतात ३५०० वर्षांपूर्वी स्वतंत्र डोमेस्टिकेशन झाले.
वैदिक काळापासून कुळीथाचा उल्लेख आहे. आयुर्वेदात (अष्टांग संग्रह, सुश्रुत संहिता इ.) त्याचे औषधी गुणधर्म सांगितले आहेत – उष्ण, तुरट, मूत्रल, कफघ्न इत्यादी. ते जनावरांच्या खाद्यासाठी (घोड्यांसाठी विशेष) आणि माणसांच्या आहारासाठी वापरले जायचे, म्हणून इंग्रजीत "horse gram" हे नाव पडले.
महाराष्ट्रात कुळीथ हे गावरान आणि पारंपरिक पीक आहे, विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि डोंगराळ भागात.
खरीप किंवा रब्बी पेरले जाते. माळरान, हलकी-मध्यम जमिनीत चांगले येते आणि कमी पावसात)ही टिकते .म्हणून दुष्काळप्रतिरोधक पीक.
महाराष्ट्रात ते हुलगा / हुलगे / कुळीथ म्हणून ओळखले जाते. कोकण आणि मालवण भागात कुळीथ पीठ जात्यावर दळून पिठलं, शेंगोळे, थालीपीठ, उसळ इत्यादी पारंपरिक पदार्थ बनवले जातात.
हिवाळ्यात शरीर गरम ठेवण्यासाठी, कंबरदुखी, सर्दी-खोकला, मुतखडा, मधुमेह इत्यादींसाठी वापरले जाते. गरीब लोकांचे मुख्य कडधान्य म्हणून ओळखले गेले, पण आज पौष्टिकतेमुळे शहरातही लोकप्रिय झाले आहे.
भारतात मुख्य उत्पादक राज्ये: कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, ओडिशा, महाराष्ट्र, छत्तीसगढ इ.महाराष्ट्रात रत्नागिरी, कोकण भागात भातानंतर रब्बी म्हणून लागवड वाढली आहे.हे क्लायमेट रेसिलिएंट हवामान बदल सहन करणारे पीक आहे, कमी पाणी आणि कमी सुपीक जमिनीतही चांगले येते.
कुळीथ पीठाचा इतिहास हजारो वर्षांचा आहे – प्राचीन काळापासून आजपर्यंत ते आरोग्य, अन्न आणि शेतीत महत्त्वाचे राहिले आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीत ते "poor man's food" नव्हे तर "powerful medicine and staple" होते! 

No comments:
Post a Comment