#वाचाल_तर_समृद्ध_व्हाल
#कवीला_ऐकाल_तर_जाणीवा_विस्ताराल
वाचन का करायचे? ,वाचनालय वाचणाऱ्यासाठी का सुरु ठेवायचे? तर या पुस्तकांमधले विचार मनात झिरपत राहतात ,नकळत शबदांचा ओलावा आयुष्य सुखकारक,ताकदीचे करते.
सकाळ पुस्तक महोत्सवात अहिल्यानगर येथे दुसऱ्यांदा रंगला. पुस्तकांची मांदियाळी पुस्तक वाचन,वाचनालय या विविध मार्गांनी फुलवणाऱ्या वाचनवेड्याना मान्यवराकडून गौरवपत्रक दिले गेले.
यानिमित्ताने कविसंमेलन आयोजित होते.खूप दिवसांनी कवी संमेलन अक्षरशः अनुभवले.काव्य ही भावभावनांचा ,विचारांचा अनोखा मेळ सर्वांना लाभत नाही.म्हणूनच जाणलं पाहिजे "जे न देखे रवी ते ते देखे कवी "
माजी आमदार लहू कानडे, ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, तुकाराम धांडे, भरत दौंडकर, संदीप जगताप, अमोल बागूल यांच्या काळजाला हात घालणाऱ्या कविता अनुभवता आल्या.
ज्येष्ठ कवी **अरुण म्हात्रे यांनी अनेक मराठी कवींच्या कविता नारायण सुर्वे ,पाडगावकर कार्यक्रमात वेळोवेळी सादर केल्या .त्यात अत्रे व इतर साहित्यिकांच्या खुमदसार किस्से पेरून वातावरण अलगद हास्यमयही केले.त्यांचा उत्साह वय विसरायला लावणारा होता . म्हात्रे यांनी वेळ निराळी आहे' ही कविता आणि अखेर उंच माझा झोका हे गीत सुरांच्या साथीने सादर केले.
**तुकाराम धांडे यांनी 'आई होती तेव्हा' ही कविता सादर केली."आई होती तेव्हा,जातं जतंगाण गाण गायचं उखळामध्ये नाचताना, मुसळ छतापर्यंत उड्या मारायचं" अहाहा डोळ्यासमोर नाचत आकाशाकडे झेपावणारे मुसळ उभं राहील.थेट ग्रामीण रंगढंगातला हा कवी नक्की ऐका https://www.facebook.com/share/v/1BjrThSPEv/
तुकाराम आणि आजोबा या कवितेत दोघांमधलं साम्य काय तर "डोंगर"तुकारामांचा भंडाऱ्याचा तर आजोबांचा गावातला खूप वेगळी निसरग-माणूस यांच्या नात्याची कविता आहे ."भूगोल "कविता तर जंगल.गाव गिळणाऱ्या ससत्तांधला चपराक आहे .
नाशिकचे कवी व शिक्षक **संदीप जगताप हे त्यांच्या शेतकऱ्यांच्या समस्या, आई आणि सामाजिक विषयांवरील भावूक व प्रेरणादायी कवितांसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. 'शेतकरी मुलाशीच लग्न करा' अशी साद घालणाऱ्या त्यांच्या कविता तरुण वर्गात खूप व्हायरल झाल्या आहेत.https://www.facebook.com/share/v/1CNhjdyTYP/ लहानपणीची "इन्स्पेक्शन "कविता आई-तिचे कष्ट अधोरेखित करतात .
''बैलावानी राबणारा बाप गाईवानी होता.. हात त्याचा खरबुडा पण आईवानी होता..'' कवी **भरत दौंडकर यांची ही कविता आणि "मुलगा काय करत होता पुस्तक वाचत होता ",गुंठा गुंठा जमीन विकून आज गोफ आली गळ्यात , पण एक प्लेट मातीचा वास हुंगायला उद्या रक्त येईल डोळ्यात, -गोफ या कवीची या कविता आजचे वास्तव दाखवतात https://youtu.be/uzeNUZ0dfCI?si=_oj5_z4tfBv3BtE_
स्वतःचा वेगळा असा ठसा उमटविणारी कविता म्हणून 'क्रांतीपर्व', 'टाचाटिभा', 'तळ ढवळताना' या कवितासंग्रहांचे निर्माते माजी आमदार **लहू कानडे यांनी "लोकशाही "कवितेत सत्य स्वीकारायचे धैर्य देते हे दिसले .
नगरचे प्रसिद्ध ,हरहुन्नरी कलावंत कवी **अमोल बागुल यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचालन तर केलेच पण त्यांच्या "सुलभ आत्महत्या सेतू केंद्र" या कवितेने आत्महत्या आणि मनाची अवस्था याचा निराळा आयाम सादर केला .
अशा काव्याने भरलेल्या संध्याकाळी मन हरखून गेले आणि मोबाइल हातात घेण्याची इच्छाच राहिली नाही. हा एक उत्तम उपाय आहे मोबाइल व्यसन कमी करण्याचा मनाला उभारी देणारा, आनंद देणारा. आता असे कविसंमेलन नियमित हजेरी लावण्याचा निश्चय केला :)
-भक्ती

No comments:
Post a Comment