Monday, February 3, 2025

गीतारहस्य १.विषयप्रवेश आणि २.कर्मजिज्ञासा

 #गीतारहस्य१-कर्मयोगशास्त्र

१.विषयप्रवेश



अद्वैत मोक्ष द्वैत विशिष्टाद्वैत, पातंजलयोग हे निवृत्तिपर मार्ग गुलामी होती असे कोणी म्हटले तर ?

भगवद गीतेवर टीका | भाष्य लिहिण्याचा प्रत्येक सांप्रदायसाठी एक आवश्यक बाबच होती. पहिल्यांदा आदिशंकराचार्यानी मायावादात्मक अद्वैतवाद व

कर्मसंन्यास, श्रीरामानुजार्यानी मायासत्यत्त्वप्रतिपादक विशिष्टाद्वैत व वासुदेवभक्ती मध्वाचार्यानी है विष्णुभक्ती, श्री वल्लभाचार्याती शुद्धद्वैतावादद व शांकरद्वैत व भक्ति, ज्ञानदेवांचे पातंजलयोग व भक्ति किंवा नुसती भक्ती, नुसता योग अगर नुसते ब्रम्हज्ञान अनेक प्रकारचे केवळ निवृत्तीपर मोक्षधर्मच गीतेत प्रतिपादय आहेत, असा निरनिराळ्या सांप्रदायिक भाष्यकारांनी। टीकाकारांनी आपल्यापरी गीतार्थाचा निश्चय केला आहे.

भगवद्गीता कर्मयोग प्रधान । प्रवृत्तिपर आहे असे कोणीच का म्हणत नाही.

अशाप्रकारे १००० वर्ष गीता निवृतिपर (भक्ती । संन्याय मार्ग विविध सांप्रदायांनी दाखवून प्रवृत्तिपर गीतेला का पाहिलेनाही? हे परखड मत टिळकांना ठेवले आहे. 

 तसेच ग्रंथतात्पर्य 'उपक्रमोपसंहारो' म्हणजे ग्रंथाचा आरंभ व शेवट या दोन गोष्टी होत. परंतू अनेक टीकाकार सरळवाट सोडत अनेक वाटा घेत भक्ती ,योग ,निष्कामकर्म यांचाच उहापोह करीत आपआपल्या  सांप्रदायाचे अर्थवाद करीत  राहिले.

#गीतारहस्य२

#कर्मजिज्ञासा१.

पुढील प्रकरणात टिळकांनी कर्म करतांना अनेक नीती शास्त्रानुसार कशा करायच्या,पाळायच्या यांचा संभ्रम पडत असतो‌ तेव्हा अपवाद कसा ओळखावा हे सांगितले आहे.तेव्हा काळानुसार धर्म बदलतो.नीतीस अनेक अपवाद असतात.अर्थात ते समजण्यासाठी सूक्ष्म अभ्यास असावा अथवा कृष्ण साथीला हवा.

"सूक्ष्मा गतिर्हि धर्मस्य " - धर्माची तत्त्वे सूक्ष्म आहेत इतकेच नव्हे तर पुढे "बहुशाखा हह्मनंतिका " त्यास अनेक फाटे फुटलेले असून त्यापासून निष्पन्न होणारी अनुमानेही निरनिराळी असतात असे महाभारतात म्हटले आहे (वनः २०८.२) महाभारतात अशाच थोर पुरुषांच्या अनेक प्रसंगाचा, त्यांच्या वागण्याचा उहापोह कथा स्वरुपात केला आहे. हेच मर्म सामान्यांना, सामान्य मर्म शास्त्रीय विवेचनानंतर) अर्जुनाचा कर्तव्यमोह घालविण्याच्या निमित्ताने श्रीकृष्णांनी पूर्वी जो उपदेश केला त्या आधारे व्यासांनी भगवद्‌गीतेत प्रतिपादले आहे.

किं कर्म किमकर्मेति कवयोडप्यत्र मोहिता: । गीता ४१६

अर्थ-कर्म कोणते आणि अकर्म कोणते याबददल पंडितांनाहि मोह पडत असतो;

अकर्म - कर्माचा अभाव आणि वाईट कर्म

अर्जुनाला कर्तव्यजिज्ञासा व मोह युद्‌धारंभी झाला. तसेच कर्त्या पुरुषांवर पुरुषांवर पुष्कळदा असे प्रसंग येतो , हे करू का लेकरू असे विवंचनेचे प्रसंग येतात.

पुढे कर्मजिज्ञासा प्रकरणात अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी) कायावाचामनाची शु‌द्धता आणि इंद्रियनिग्रह या पाच नीतीधर्माची विश्लेषण मनुचे श्लोक, महाभारत, गीता, उपनिषदातील कथांद्‌वारे त्यातील अनुमानानुसार केले आहे.

**अहिंसा- हिंसा करु नये, हिंसा म्हणजे केवळ नुसता जीव घेण्यास होणेच नव्हे तर दुसऱ्या प्राण्यांचे मन किंवा शरीर यांस इजा करणे याचाहि त्यांत समविश होतो.

पण आत्मसंरक्षणासाठी आतातायी, अधर्मीच्या हत्येचे पाप लागत नसते. परंतू हवेत, पाण्यांत, फळांत वगैरे सर्व ठिकाणी जे शेकडों अत्यल्प जीव भरलेले आहेत त्यांची हत्या कशी बंद होणार?

सूक्ष्मयोनिनि भूतानि तर्कगम्यानि कानिचित् ।

पक्ष्मणोऽपि निपातेन येषां स्यात् स्कन्थपर्ययः ॥ (भमाशां.१५.१६)

जगामध्ये कोण कोणाला खात नाही?जीवो जीवस्य जीवनम्|

प्राणस्य न्नमिदं सर्वम" अहिंसेच्या नियमांतहि कर्तव्याकर्तव्याचा तारतम्य विचार सुटत नाही.

अहिंसाधर्माला धरूनच क्षमा, शांती, दया है गुण येतात. न श्रेयः सततं तेजो न नित्यं श्रेयगी क्षमा ।

तम्मानित्यं क्षमा तात पण्डिलैरपवादिता ।।

'नेहमीच क्षमा किंवा नेहमीच तापटपणा श्रेयस्कर होत नाही, यासाठीच बाबा! ज्ञात्यांनी क्षमेस अपवाद सांगिलले आहेत, पण असे सूक्ष्म प्रसंग ओळखून तत्त्व समजून घेणे महत्त्वाचे आहे.

**सत्य - नास्ति सत्यात्यरो धर्म (ममा.शां १६२-२४)

सत्यं हि परमं बलम् = (अनु. १६७.५०) परंतू यासही अपवाद‌ आहे .

नापृष्टः कस्यचिद्ब्रूयान्न बचान्यायेन पृच्छतः (, मभा शां)

"विचारल्या खेरीज कोणाशी बोलू नये आणि अन्यायाने जर कोणी प्रश्न करीत असल्यास विचारिल्यावरही उत्तर देऊ नये. माहित असले तरी वेड्‌यासारखे हू हू करून वेळ - मारुन न्यावी - 'जानन्नपि हि मेधावी जडवल्लोक आचरेत्।

पण वेळ बोलूनही टळणारी नसेल तर...

अकूजनेन चेन्मोक्षो नावकूजेत्कथंचन अवश्यं कूजितव्ये वा शंकरन्वायकूजनात् ।

श्रेयस्तमानृतं वक्तुं सत्यादिति विचारितम् ।

"न बोलता मोक्ष म्हणजे सुटका होण्यासारखी असेल तर काही झाले तरी बोलू नये आणि बोलणे अवश्यच असेल तर, किंवा न बोलल्यामुळे (दुसऱ्यास) शंका येण्याचा संभव असेल तर, त्यावे‌ळी सत्यापेक्षा खाटे बोलणे अधिक प्रशस्त असे विचारांनी ठरलेले आहे! ' (शां. १७९,१५,१६).

'सत्यस्य वचनं श्रेया संत्यादपि हितं वदेतू ।

यद्‌भूतहितमायन्तं एतत्सत्यं मतं मम । (शां ३२९, १३)

 "सत्य बोलणे हे प्रशस्त होय, पण सत्यापेक्षांहि सर्व लोकांचे ज्यांत हित असेल ते बोलावे, कारण सर्व जनांचे ज्यांत अत्यंत हित हेच माझ्या मते खरे सत्य होय'.

अपवाद? 'राजकीय गुपित लपवण्यास, चोरांसमोर, अन्यायाने प्रश्न करणाऱ्यास, वकिलांना धंद‌यात खोटे बोलणे गैर नाही? (सिन्विक)

पण फायद्यासाठी व्यापाऱ्यांनी खोटे बोलणे कसे चालेल ? सत्य हे वाचिक सत्य वा वास्तव (सर्वभूतहितकारक) सत्य असू शकते. 

परंतू

'आताहेतोः परार्थ वा नर्महास्याश्रयात्तथा 988 ये मृषा न वदन्तीह ले जराः स्वर्गगामिनः । मभा अनु) 

"स्वार्थाकरितां परहितार्थ किंवा थट्‌टेनेहि जे पुरुष था जगी कधी देखील खोटे बोलत नाहींत त्यांसच स्वर्गप्राप्त होते."

हा देखील शास्त्रांकारकांचा अखेरचा तात्विक सि‌द्धांत आहे.

 सत्य बोलण्यात वचन, प्रतिज्ञा पाळणे याचा समावेश होतो. पण याचे सूक्ष्म मर्म जाणून कृती अपेक्षित आहे यासाठी अनुभव - संपन्न व्हावे वा अशांचा सल्ला जरुर घ्यावा.

(टीप- यातील संस्कृत श्लोक अशुद्ध लिहिले असू शकतात,मुळ श्लोकांचा शोध घेत आहे.पण भावार्थ जरूर जाणावा)

#गीतारहस्य३

#कर्मजिज्ञासा२


* अस्तेय (चोरी)


एकाने यथान्याय मिळवलेली संपत्ती चोरून किंवा लुटून नेण्याची इतरांना मोकळीक मिळेल तर द्रव्यसंचय करण्याचे बंद पडून सर्वांचेच नुकसान होईल, समाजाची घडी विस्कळून सर्वत्र अनवस्था होईल हे निर्विवाद आहे. पण यासही अपवाद आहेत चोहोंकडे दुष्काळ पडल्यामुळे विकत, मजुरी करून, धर्मार्थहि अन्न मिळत नाही अशी आपत्ति प्राप्त झाल्यावर चोरीने आत्मसंरक्षण करण्याचे कोणी मनांत आणिल्यास त्यास आपण पापी समजू का?

बारा वर्ष दुष्काळ पडून विश्वामित्रावर असाच दुर्धर प्रसँग आला, व श्वपचाच्या ( कुत्र्याच्या मांसाची तंगडी) चोरून त्या अभक्ष्य अन्नाने आपला बचाव करण्यासाठी ते प्रवृत्त झाले (शां १४९).. '

जीवितं मरणात्श्रेयो जीवन्धर्ममवाप्नुयात्"


जगेल तर पुढे धर्म, म्हणून धर्मदृष्ट्याहि मरण्यापेक्षा जगणे श्रेयस्कर असे विश्वामित्रांनी यावेळी म्हंटले आहे.


पण जगणे हाच काहीं जगातील पुरुषार्थ नव्हे.


'मुहूर्त ज्वलितं श्रेयो न च धूमयितं चिरं (मभा उ१३२१५)


अंथरुणावर पडून कूजून किंवा घरांत शंभर वर्ष फूकट धुमसत पडण्यापेक्षा घटकाभर पराक्रमाची ज्योत दाखवून मेलास तरी बरे "

कारण 'देह त्यागिता कीर्ती मागे उरावी ।मना सज्जना हेचि क्रिया करावी||'


कोणत्या प्रसंगी जिवावर उदार होणे योग्य आणि कोणत्या प्रसंगी अयोग्य हे समजण्यास कर्माकर्मशास्त्राचाहि त्या बरोबर विचार करावा लागेतो. नाहीपेक्षा जीवावर उदार होण्याचे यश मिळणे दूर राहून मूर्खपणाने आत्महत्या केल्याचे पाप मात्र पदरांत पडण्याचा संभव असतो.


माता, पिता, गुरु वगैरे वंद्य व पूज्य पुरुषांची देवाप्रमाणे पूजा, शुश्रूषा करणे हाहि सामान्य व सर्वमान्य एक प्रधानधर्म आहे. कारण तसे न करणे कुटुंबाची, गुरुकुलाची किंवा एकंदर समाजाचीही नीट व्यवस्था कधीच राहणार नाही.


'न तेन वृद‌धो भवति येनास्य पलितं शिरः।


यो वै युवाप्यधीयानस्तं देवाः स्थविरं विदुः ।


डोके पांढरे झाले म्हणजे तेवढ्यानेच एखादा मनुष्य वृद्‌ध होत नाही, तरुण असला तरी ज्ञानवान त्याला देव म्हातारा समजतात. (म.भा.वन११३.)


राजा तर गुरुपेक्षांहि श्रेष्ठ अशी देवता आहे, परंतू त्यासही धर्म सुटत नाहीत, सोडिल तर नाश पावतो [म भा.शां ५९)


* काम, क्रोध आणि लोभ ही तिन्ही नरकाची द्वारे असून आपला नाशाची कारणे आहेत, पण काम व क्रोध हे शत्रू खरे के पण केव्हा? अनावर राहू दिल्यास....


सृष्टिक्रम चालू राहण्यास योग्य मर्यादेचे आंत त्यांची अत्यंत आवश्यकता आहे, ही गोष्ट शास्त्रकारांसहि संमत आहे.


लोके व्यवायामिषमदयसेवा नित्यास्ति जन्तो नहि तत्र चोदना । व्यवस्थितिस्तेषु विवाह यज्ञसुराग्रहैरासू निवृत्तिरिष्टा ।


या जगांत मैथुन, मांस व मद्य यांचे सेवन कर म्हणून कोणांस सांगावयास नको, ती मनुष्यास स्वभावतःच हवी असतात या तिहींची हि काही व्यवस्था लावावी, म्हणजे त्यांस मर्यादा किंवा आळा घालून व्यवस्थित रूप द्यावे या हेतूने विवाह, सोमयाग व सौत्रामणि यज्ञ यांची अनुक्रमे योजना केली आहे, त्यांतही निवृत्ती म्हणजे निष्कामाचरणच इष्ट होय. (निष्काम बुद्‌धीचे कर्म] (मम भाग - ११,१०-१४


* शौर्य, धैर्य, दया, शील, मैत्री, समता इ. सर्व सद्‌गुणांस काही मर्यादाही लागू आहेत.


' विपदि धैर्यमथाभ्युद‌ये क्षमासदसि वाक्‌पटुता युधि विक्रमः ।


संकटकाली धैर्य, उत्कर्षाचे वेळी क्षमा, सभेत वकृत्व व युद्धात शौर्य के गुण आहेत,


'देशे काले च पात्र च तद्‌द्दानं सात्विक विदुः' 

देश, काल व पात्रता पाहून दिलेले जे दान तेच सात्विक होय.

* आचार कालामानाप्रमाणेच देशाचार, कुलाचार किंवा ज्ञातिधर्मति जमेंस धरावे लागतात, तरीही आचाराआचारांतहि तारतम्य पहावे लागते.


'न हि सर्वहितः कश्विदाचारः सम्प्रवर्तते ।


तेनैवान्यः प्रभवति सो ऽ परं बाधते पुनः ।।


सर्वांना सर्वदा एकसारखाच हितकारक असा आचार सापडत नाही. एक आचार घ्यावा तर दुसरा त्याच्या वरचढ असतो, व हा दुसरा आचार पत्करावा तर तो तिसऱ्याला पुनः विरुद्ध पडतो. "(शां२५९)


संसारात अनेक वेळी कठीण प्रसंग येतात कधी अहिंसा आणि आत्मरक्षण, कधी सत्य आणि सर्वभूतहित, कधी देहसंरक्षण आणि यश, कधी भिन्न भिन्न नात्यांनी उपस्थित होणारी कर्तव्ये यांत लढा पडून सर्वमान्य नीतीनियमांनी काम न भागता अनेक अपवाद कसे उत्पन्न होतात, त्यावेळ कर्तव्याकर्तव्याधमर्माचा निर्णय करण्यास काही कायमचे धोरण किंवा युक्ती आहे की नाही हे जाणण्याची इच्छा मनुष्यास होते.

त्यावेळी सूक्ष्म अभ्यासाची  गरज असते.

No comments: