Friday, August 30, 2024

द हिडन लाईफ ऑफ ट्रीज् -पुस्तक परिचय


जंगलातील परिसंस्था निरंतर चालते, किंबहुना वाढीसच लागते. कारण प्रत्येक प्रजातीची जिवंत राहण्याची धडपड असते. ते आपल्याला लागेलल ते दुसयांकडून घेत राहतात, प्रत्येक जण तसा निर्दयी असतो, पण ही  व्यवस्था कोलमडत नाही. कारण गरजेपेक्षा जास्त ओरबडणाऱ्या पासून इथे संरक्षण असते. गरजेपेक्षा जास्त घेणारा परतफेड करत नाही, त्याने अधिक घेतले तर तेही संपून जाते आणि तो स्वता: ही तग धरू शकत नाही.


पीटर वोह्ललेबेन या जर्मन वनरक्षकांनी जंगलातील झाडांचे, त्यातील परिसंस्थांचे सूक्ष्म निरीक्षण केले. त्यातूनच जगप्रसि‌द्ध पुस्तक - द हिडन लाईफ ऑफ ट्रीज्  लिहिले गेले. मराठीत याचा अनुवाद गुरुदास, नूलकर यांनी केला आहे पुस्तकाचे


झाडांच्या अबोल विश्वाचे बोलक दर्शन हे पुस्तकाचे ब्रीद  खरोखर सार्थ आहे. लहानपणी झाडाच्या फांदया त्याचे हात, मूळ, खोड़ त्याचे पाय तर पानांचा वृक्षाचा डेरा त्याचे डोके असे चित्र सहज रेखाटायचो.. पण हे प्रत्यक्षात उलट आहे. जमिनीच्या काळोखात वाढणारे मूळं त्याच्या मेंदूसारखे काम करतात त्यांच्या / मूळांच्या टोकांना संवेदना असतात. जिकडे पाणी तिकडे ते वळतात. आणि हेच टोक उपयोगी बुरशीबरोबर मैत्री करून एक जाळ, जंगलाचे इंटरनेट संपूर्ण जंगलभर पसरवतात.(wood wide web-www.) या जाळयातून नायट्रोजन फॉस्फरस , पोषकद्रव्ये वाटप, एखाद्‌या -सर्व झाडांशी संपर्कात राहणे, पोषकद्रव्याचे आजारी, वठलेल्या झाडाला, झाडांच्या छोट्या पिलांना पोषकद्र‌व्ये पाठवणे हे करत राहतात, बुरशीला या बदल्यात भरघोस साखर झाडांकडून मिळते. तसेच सुगंध 

पसरुन कीटकांना पराग धूळ उडवण्यासाठी आकर्षित करतात.

तर एखादे जिराफ,प्राणी ,कीटक उगाच जास्त पाने खात बसला की Phyto chemical सोडून त्यांची चव तर खराब करतातच पण कित्येक मैल फेरोमोन्स

 या केमिकलचा गंध इतर झाडांना शत्रूपासून सावध राहायला संरक्षण होते. अशाच प्रक्रियेत  निर्माण झालेले टॅनिन  यामुळे ओकच्या लाकडाच्या पिपाचा वाईन मुरायला उपयोग होतो .झाडांनी दरवर्षी फुलून रुचकर बिया तयार केल्यातर डुक्कर  आणि हरिण ते खाऊन पुष्ट होऊन जोमाने प्रजनन करतील,यांची खूप संख्या वाढेल. त्यामुळे बिया रूजणार कशा?  तेव्हा दरवर्षी न फुलता वर्षाआड /ठराविक वर्षानंतर झाड फुलते. या प्राण्यांची संख्याही नियोजित होऊन डोकेदुखी होत नाही. 

लॉटरी लागून लाखो लाखो बियांपैकी एखादेच बी 'पूर्ण वृक्षात रूपांतरीत होते. बी अवस्थेत हरिण इतर प्राण्यांपासून रक्षण पाहिज.मग जरा एखादे मोठे उंच झाड वठून जाऊन पडल्यावर भरपूर सूर्यप्रकाश मिळतो मग त्याची वाढ जोमाने होते. मग हे झाड जंगलाच्या शिष्टचारानुसार समांतर फांद्या, मजबूत बुंधा, व्हि आकारातल्या फांदया, डेरेदार आकार घेत सौंद‌र्यवान होते, पुढच्या २००-किंवा ५०० वर्षांप‌र्यंतही तो राजा होतो.


निसर्गमात्र झाडांची ही कडक शिक्षकाप्रमाणे शाळा घेतो. कधी बर्फाचे वादळ  अस्ताव्यस्त फांद्यांना बर्फाच्या ओझ्याने मोडून टाकतो .जखमी झाडांच्या वाकवून मोडून टाकतो आत बुरशी शिरतात त्यासी पोखरू लागतात. बार्क बीटल, अफीडच्या लोभाने वूडपीकर पक्षी झाडांच्या खोडांना टोची मारत अळ्या खाऊन टाकतो पण झाडाला इजा होते. पण एक झाड शहीद झाल्यामुळे इतर झाड या कीटकांपासून वाचते.


झाडांतून पाण्याचे पंप चालू असतात, टेस्थोस्कोप लावून पाहिल तर प्रवाहाचा आवाज ऐकू येतो? 


झाड आपल्या वाढीने हवेचाही वेग नियंत्रित करतात, बाष्पीभवन कमी करून जास्त पाणी मिळवून वेगाने वाढतात.


अफिड लागल्यास झाडावर चिकट हनीड्यूवर मुंग्या, काही भ्रमर तुटून पडतात.

पान झाडांना वेळेचे, दिवसाच्या लांबीचे भान असते मुल त्यानुसार वसंताची चाहुल, शरदाचे आगमन त्यांना समजते.


जंगलात प्रकाशासाठी स्पर्धाच असते.सर्वांत करती ९७% तर बाकीची खालील पिलाना-रोपांना प्रकाशाची देवाण असते. 

प्रकाशसंश्लेषण जोमाने होऊन ती अधिक अन्नसाठा करायची ही स्पर्धाच असते.


 झाडांच्या बिया पक्षी जमिनीत खाण्यासाठी पुरतात नंतर विसरतात मग रूजून झाड येते, काही बियांना दूर जाता यावे म्हणून पंखही असतात, जणू त्या उडणाऱ्या बियाच!


*झाडांच्या स्वप्नातील स्वर्ग


त्यांना पोषणयुक्त, मोकळी, हवेशीर आणि आर्द्रता टिकवणारी माती आवडते. जमीन कोरड्या हवेतही ओलसर राहिली पाहिजे. उन्हाळ्यात फार तापू नये किंवा थंडीत गारठू नये. बेताचा हिमवर्षाव चालेल कारण त्यातून बर्फ वितळल्यावर जमिनीला पाणी मिळते. तिथे डोंगरामुळे वादळी वारे अडवले गेले पाहिजेत आणि बुरशी किंवा कीटकांचा प्रादुर्भाव कमी असावा. "

पण याने जैवविविधता वाढणार नाही एकच शक्तिशाली प्रजाती अशा स्वर्गात जोमाने वाढेल.


माणसाने आपला जंगलातील हस्तक्षेप कमी केला तर ही जंगलाची भाषा प्राचीन होईल नाहीतर लुप्तच होईल.

-भक्ती

Monday, August 26, 2024

कृष्णाच्या गोष्टी-१०

 लग्नासाठी जमलेली सर्व राजेमंडळी परतल्यानंतर द्रुपद, विराट आणि युधिष्ठिर यांनी, देशोदेशी आपले दूत पाठवून कौरव-पांडवांचे युद्ध उभे राहिल्यास आपल्या पक्षास मदत करण्याची निमंत्रणे आणि आवाहने त्यांच्याकडे रवाना केली.

 दुर्योधनानेहि देशोदेशी असेच दूत पाठवण्याचा सपाटा चालविला. दुर्योधनाने बाप आणि अभिषिक्त सम्राट असा मोठा भाऊ जिवंत असता, राजसूययज्ञ करण्याचा भ्रष्टपणा केला होता. बलाने अगर मित्रत्त्वाच्या नात्यानेआपलीच बाजू खरी असल्याचे त्याने अनेकांना पटविले होते, त्यामुळे हे संदेश मिळताब विविध राज्यातून त्या त्या देशाच्या राजांनी ससैन्य हस्तिनापुराकडे तद्बत उपप्लाव्याकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.

- द्रुपदने पांडवांतर्फे बोलणी करण्यासाठी आपल्या राजपुरोहिताला योग्य अशा सूचना देऊन हस्तिनापुरी धृतराष्ट्राकडे पाठविले होते. (या नाही त्या पद्धतीने बोलणी लांबवून पांडवांना मित्रराजांना निमंत्रणे पाठविण्यास अवधी मिळण्याएवढा वेळ त्याने हस्तिनापुरात काढावा अशा सूचना त्याला दिल्या होत्या. 

**यादवांना युद्धार्थ निमंत्रण

मध्यंतरीच्या काळात यादवांनी युद्धामध्ये आपल्या बाजूने लढावे अशी विनंती रामकृष्णांना करण्यासाठी हस्तिनापुराहून स्वतः दुर्योधन आणि उपप्लाव्याहून धनंजय द्वारकेत हजर झाले. त्यातहि दुर्योधनाने बाजी मारली तो अर्जुनाआधी कृष्णाच्या महालात पोचला. आणि त्याच्या डोक्याशी बसून राहिला. 

दुर्योधन आला तेव्हा कृष्ण निद्रिस्त होता. पाठोपाठ आलेला अर्जुनही कृष्णाच्या शयनमंदिरात आला आणि त्याच्या पायाशी हात जोडून उभा राहिला. कृष्ण उठला तो समोर अर्जुन त्याच्या दृष्टीला पडला. मागे वळून पाहतो तो डोक्याशी दुर्योधन. कृष्णाने हसून दोघांचेहि स्वागत केले

 कृष्ण हसला. म्हणाला 'दुर्योधना तू इथे पहिल्याने आला असलास तरी अर्जुन माझ्या दृष्टीस पहिल्याने आहे. दृष्टिप्रामाण्याच्या अनुरोधाने अर्जुनच माझ्याकडे पहिल्याने आपण असे होऊ शकेल, तरी पण मी तो तांत्रिक मुद्दा पुढे करीत नाही, तू पहिल्याने आलास, अर्जुन पहिल्याने मला दिसला. तेव्हा मी दोघांनाहि मदत करण्यास तयार आहे. तुम्हां दोघांचाही माझ्यावर सारखाच अधिकार लागू झाला आहे. पण रूड प्रथेनुसार हा अधिकारहि पहिल्याने अर्जुनाने वापरावयास हवा. कारण अर्जुन तुझ्यापेक्षा लहान आहे, कारण प्रथेप्रमाणे लहानाचे समाधान पहिल्याने करायचे असते आणि सज्जन माणसे प्रथा काटेकोरपणे पाळतात. एका बाजूला मी, माझी एक अक्षौहिणी नारायणी सेना देणार आहे तर दुसऱ्या बाजूला मी स्वतः जाईन, मात्र मी युद्ध करणार नाही. तेव्हा लढणारे सैन्य आणि मी दोहोमधून तुम्ही निवड करायची आहे. मात्र निवडीचा पहिला अधिकार अर्जुनाचा. नंतर तुझा. माग धनंजया तुला काय हवे?

कष्णाने युक्तीने निर्णयाचा अधिकार अर्जुनाला दिला. 

अर्जुनाने कृष्णाला आपल्या पक्षाकडे यायची विनंती केली. अर्जुनाने कृष्णाला मागितलेले पाहून दुर्योधन खूष झाला. त्याने नारायणी सेनेचा स्वीकार करून आनंदाने कृष्णाचा निरोप घेतला. कृष्ण म्हणाला, 'पार्था  पण मी जरूर तुझ्या रथाचे घोडे सांभाळीन."

कृष्णाच्या महालातून बाहेर पडलेला दुर्योधन तडक बलरामाच्या महाली गेला. बलरामाने त्याला स्पष्ट सांगितले की, 'दुर्योधना तू माझा शिष्य आहेस. तुझ्यावर माझे प्रेम आहे. पण कृष्ण पांडवांच्या बाजूने उभा असता, मला तुझ्या बाजूने त्याच्या विरूद्ध लढणे शक्य नाही. खूप विचार करून या युद्धात मी तटस्थ रहाण्याचा निर्णय घेतला आहे. मी तीर्थयात्रेला जाणार आहे.' कृष्ण पांडवांकडे गेला तरी तो युद्ध करणार नाही आणि बलराम कुणाच्याच बाजूने लढणार नाही, म्हणजे पांडवांचा पराभव अटळ आहे, असे मांडे मनांत खात दुर्योधन द्वारकेहून हस्तिनापुरी परतला.

**शल्यावर धर्मसंकट

दुर्योधनाने मद्र देशाच्या बलाढ्य राजाला, महारथी शल्याला, मोठ्या युक्तीने फसवून आपल्या बाजूला दाखल केले. शल्य माद्वीसुत नकुलसहदेवांचा मामा होता. युद्ध सहाय्यार्थ युधिष्ठिराचे निमंत्रण आल्यानंतर तो ससैन्य उपप्लाव्यनगरी निघाला. मजल दरमजल करीत शल्य आपल्या एक अक्षौहिणी सैन्यासह युधिष्ठिराकडे निघाला असता, मुक्कामाच्या निरनिराळ्या ठिकाणी त्याची आणि त्याच्या सैन्याची रहाण्याची चोख व्यवस्था दुर्योधनाने केली. ही सारी व्यवस्था युधिष्ठिराकडूनच होत असावी अशी 'शल्याची समजूत होती. त्याने एका मुक्कामी युधिष्ठिराचे जे सेवक ती व्यवस्था करीत असतील त्यांना आपल्यापुढे उपस्थित रहाण्याची आज्ञा केली. आपण त्यांना ते मागतील ते भेट देणार आहोत, असेहि त्याने जाहीर केले. हे कळल्यावर, दुर्योधन शल्यापुढे हजर झाला. आपली आणि आपल्या सैन्याची इतकी चोख व्यवस्था दुर्योधनाने ठेवली होती हे समजल्यावर शल्य चकित झाला. पण त्याच्या तोंडून शब्द गेला होता. त्यामुळे दुर्योधनाच्या मागण्याप्रमाणे त्याला उपप्लाव्या ऐवजी हस्तिनापुराकडे सैन्याचा मोहरा वळवावा लागला. धर्मज्ञ युधिष्ठिर म्हणाला, 'मामा, क्षत्रियाने शब्दाला जागले पाहिजे. आपण दुर्योधनाच्या बाजूने लढलात तर त्यात आपला दोष नाही. पण आपण आमचे आप्त आहात. जगात महारथी म्हणून जसा तुमचा लौकिक आहे, तद्वत् सारथ्य कर्मात कृष्णाच्या तोडीचे सारथी म्हणूनही आपला लौकिक आहे. युद्धात राधेय आणि अर्जुन यांचा जेव्हा संग्राम उभा राहील तेव्हा राधेयाचे सारथ्य करण्याची विनंती तुम्हाला होणारच. | आपल्या सारख्या महारथ्याला दुसऱ्या महारथ्याचे सारथ्य करावयाला लागणे अपमानाचे खरे. पण आमच्यासाठी ते मान्य करा. आणि आयत्यावेळी राधेयाचा तेजोभंग करा शल्याने ते मान्य केले. आणि तो आपल्या सैन्यापाठोपाठ हस्तिनापुरी निघून गेला

युधिष्ठिराने शल्याकडून राधेयाचा तेजोभंग करण्याचे वचन घेणे हा प्रसंग मागून घेतला गेला असावा असे वाटते. कारण महारथी शल्यावर कर्णाचे सारथ्य करण्याचा प्रसंग येईल हे भविष्य युधिष्ठिराला माहीत होते असे समजणे बुद्धीला पटण्यासारखे नाही. 

**संजय शिष्टाई

कावेबाज धृतराष्ट्राने आपला दूत म्हणून पांडवांशी बोलणी करण्याकरिता ठरल्याप्रमाणे संजयाला उपप्लाव्य नगरीस पाठविले.

 त्याने राजाज्ञेप्रमाणे पांडवाच्या धर्मानुरूप वागण्याच्या वृत्तीचे कौतुक करून त्यांनी आपले राज्य परत मागण्याचा क्षुद्र प्रकार आपली धर्मवृत्ती सोडून करू नये, कारण त्यातून एकंदर जगाचा विध्वंस करणारे महायुद्ध उभे राहील, आणि त्याचे सर्व उत्तरदायित्त्व, पाप आणि दोषारोप अत्यंत धार्मिक अशा तुम्हा पांडवांवर येईल. कारण युद्धात कुणाचाहि जय झाला किंवा पराजय झाला तरी त्यातून काहीहि निष्पन होणार नाही, असा राजाचा संदेश त्यांना ऐकविला. चुलत्याचा हा संदेश ऐकून युधिष्ठिरहि चकित झाला. दुर्योधनापेक्षाहि आपला चुलंता अधिक दुष्ट आहे याची त्याला खात्री पटली. 

संजयाने युधिष्ठिराला राजाचे म्हणणे आणखीहि ऐकवले म्हणाला, 'युधिष्ठिरा, सुख दुःख हे ज्याच्या त्याच्या भाग्यावर अवलंबून असते. म्हणूनच मनुष्याने मिळेल तेवढ्यावर संतुष्ट राहावे. माणसाने जपावे ते चारित्र्य. जगावे ते धार्मिकपणे, लोक तुला धार्मिक म्हणतात. कुरुकुलाची धर्मपताका उंचफडकावीत ठेवणे हे तुझे काम आहे. दुर्योधन तर पतित आहे. तो लान कोळून प्याला आहे. पण तू चांगला आहेस, आजवर धर्म वृत्तीने वागत आला आहेस. तीच कीर्ती शेवटी बरोबर येणार आहे. पुत्रा, मला महिती आहे कुलनाशक युद्ध करण्याऐवजी बंधूंसह द्वारकेला भिक्षा मागणेहि तू पसंत करशील. कारण तुला माहित आहे की राज्य कुणाचेच टिकले नाही. धमपिक्षा राज्य मोठे नाही. धर्माची पताका सांभाळण्यासाठी जग आज तुझ्याकडे डोळे लावून बसले आहे."

संजयाच्या बोलण्याचा आणि चुलत्याच्या संदेशाचा युधिष्ठिर प्रमुख पांडवांच्या मनावर एवढा परिणाम झाला की, खरोखरच कुलनाशक युद्ध टाळून राज्यावरचा अधिकार सोडून द्यायला ते तयार झाले. कृष्णाने म्हणूनच धार्मिक परिभाषेतच संजयावर आणि पर्यायाने त्या कणिकशिष्य धृतराष्ट्रावर बाजू उलटविली. उद्योगपर्वाच्या एकोणतिसाव्या अध्यायात कृष्णाचे ते भाषण आले आहे

कृष्ण म्हणाला, 'संजया आम्हाला मोठा धर्माचा उपदेश तू करतोस. माझ्यापेक्षा आणि या धर्मराजापेक्षा तुला धर्म अधिक समजतो काय? प्रत्यक्ष धर्मालाच तू धर्माचा उपदेश करतोस ? धर्म तुला कळतो तर मला सांग, क्षत्रियांचा घुर्म कोणता ? न्यायासाठी युद्धाला सामोरे जाणे की, पाठ फिरविणे? जे राज्य पांडवांचे आहे, ते गिळंकृत केले असताना आणि राजा धृतराष्ट्र त्यांना ते पुन्हा कधीहि परत मिळू नये म्हणून कारस्थाने करीत असताना, राजधर्माची त्याला पुसटशीहि ओळख आहे असे कसे म्हणता येईल ? धर्माची ढाल करून राजा धृतराष्ट्र आपला लोभ, मनाचा पाताळयंत्री दुष्टपणा, कदूपणा झाकू पाहत आहे. संजया, तुला थोडा धर्म तरी समजत असला, तर, तू त्याचा उपदेश धृतराष्ट्राला आणि त्याच्या पुत्रांना कर. असल्या पापी अधर्मी लोकांचे अन खाऊन प्रष्ट झालेला तू आम्हांला धर्मोपदेश करतोस? जा, धृतराष्ट्राला आणि त्याच्या पुत्रांना जाऊन सांग 'पांडव त्यांची सेवा करायला सिद्ध आहेत आणि त्यांच्याशी युद्ध करायलाहि सिद्ध आहेत. धर्मनिष्ठ पांडव जसे शांततेचे पुरस्कर्ते आहेत तद्वत् ते समर्थ आणि अद्वितीय योद्धेहि आहेत ही गोष्ट लक्षात ठेवून पुढचे पाऊल टाका.'

कृष्ण नसता तर, संजय शिष्टाईच्या जाळ्यात युधिष्ठिर अडकला असता, यात शंका नाही. संजयाला आणि पर्यायाने धृतराष्ट्राला गार करून टाकणाऱ्या धार्मिक परिभाषेतील या चपराकीने धृतराष्ट्राचे तोंड मिटले ते कायमचे. 

कृष्णाने संजय शिष्टाई उलटविताना समाजातील विविध थरातील लोकांच्या स्वधर्म पालनाची मांडलेली चिकित्सा फार महत्वाची आहे. कर्म किंवा धर्माची इथे त्याने केलेली व्याख्या गीतेत विस्ताराने स्पष्ट झाली आहे. चोराच्या हातून आपल्या संपत्तीचे रक्षण करणे आपला धर्म आहे. इंग्रजी कायदा यालाच न्याय म्हणतो. राष्ट्राच्या दृष्टीने तसे करणे म्हणजे राष्ट्रभक्ती ठरते. कृष्ण त्याला स्वधर्म-पालन म्हणतो.

**कृष्ण-शिष्टाई


संजयाला परत पाठवून कृष्णाने पांडवांतर्फे बोलणी करण्यारिता स्वतः हस्तिनापुरास जाण्याचे ठरविले. उद्योगपर्वातील हा भाग महत्त्वाचा

कृष्णाला संधी मान्य होता का ? शिष्टाई प्रकरणाचा एकंदर विचार केला तर, कौरवांशी संधी करणे आणि त्यामुळे युद्ध टाळणे शक्य होईल असे कृष्णाला वाटत होते असे दिसत नाही

कृष्ण म्हणाला, 'मी दैव काही बदलू शकत नाही. दुर्योधन दुष्ट आहे. लोकलज्जा सोडून वागत आहे. स्वतःच्या अपकृत्यांचा त्याला काडीमात्रहि पश्चाताप नाही. कर्ण, शकुनी दुःशासन त्याच्या दुष्ट मनोवृत्तीला चेतावणी देत असताना, तुमचा वाटा परत देऊन शांती घडवून आणणे त्याला अशक्य आहे तेव्हा त्याचा वध हा एकच मार्ग आता उरला आहे. लहानपणापासून तुमच्यावर अन्याय करीत आलेला दुर्योधन माझ्या दृष्टीने तर वध्य आहेच.'

शिष्टाईसाठी पाठविताना फक्त पांच गांवांवर संतुष्ट होण्याची सुचिभिराची सिद्धता असली तरी ती कल्पना कृष्णाला पूर्णपणे अमान्य होती. हस्तिनापुरी जाण्यासाठी प्रस्थान ठेवण्यापूर्वी, कृष्णाने द्रौपदीलाहि स्पष्ट सांगितले होते की, मी जरी संधी करण्याच्या हेतूने कौरवांच्या दरबारात जात असलो तरी दुर्योधनादी कौरव माझे म्हणणे मानतील आणि संधी करतील असे मला मुळीच वाटत नाही. युद्ध अटळ असून पुढल्या काही दिवसातच साऱ्या कौरवांचे धारातीर्थी पतन होईल आणि त्यांच्या बायकांना धाय मोकलून रडताना दू पहाशील' 

इथे प्रश्न असा उपस्थित होतो की संधी होणार नाही हे स्पष्ट दिसत असताना के बंकीमचंद्र म्हणतात त्याप्रमाणे, केवळ आपले कर्तव्यकर्म म्हणून कृष्ण शिष्टाई साठी हस्तिनापुरी गेला का? कै. बाळशास्त्री हरदासांनी, 'भगवान् श्रीकृष्ण' ह्या आपल्या ग्रंथात कृष्णशिष्टाईची जी कारणे दिली आहेत ती कृष्णाच्या एकंदर व्यक्तिमत्वाचा आणि व्यवहारी दृष्टीकोनाचा विचार करता कुणालाहि पटण्यासारखी आहेत

पहिले कारण, युधिष्ठिराचा भ्रमनिरास; आणि तो त्याला प्रसन्न राखून करायचा होता. संजयशिष्टाई कृष्णाने उलटवून लावली असली, तरी तिचा युधिष्ठिराच्या मनावर इतका विलक्षण परिणाम झाला होता की कृष्ण नसता तर सर्वस्व त्याग करून आणि संन्यास घेऊन युधिष्ठिराने शांती पदरात पाडून घेतली असती कृष्णाच्या आग्रहामुळे कौरवांकडे आपल्या राज्याची नव्हे पांच गावांची तरी मागणी करायला तो तयार झाला. संजय शिष्टाईचा युधिष्ठिरावर नव्हे तर साऱ्या पांडवांवर तसाच परिणाम झाला होता.

लोकापवाद टाळणे, या कृष्णशिष्टाईचा दुसऱ्या कारणाचा उल्लेख मागे आला आहेच. कृष्ण उभय पक्षाचा नातलग होता. पांडवांप्रमाणे कौरवसभेतही त्याच्या शब्दाला मान होता. एक बलवंत योद्धा आणि बुद्धिमान राजकारणी म्हणून त्याचा सर्वत्र लौकिक झाला होता. कौरव-पांडवांचे युद्ध टाळणे कृष्णाने खटपट केल्यास शक्य आहे, असे खुद्द बलरामालाही वाटत होते.) तेव्हा आपणकाही केले नाही असे होऊ नये, आपण सर्व प्रयत्न करून कौरवांच्या हटवादामुळे यशस्वी झालो नाही असे सिद्ध करण्यासाठी कृष्ण शिष्टाईला तयार झाला.

भीष्म द्रोण आणि कृपाचार्य इत्यादी स्वतःला न्यायी, धार्मिक समजणाऱ्या लोकांच्या मनात, कौरवांच्या बाजूने समजले जाणारे त्यांचे खङ्ङ्ग अन्यायाच्या बाजूने समजले जात आहे हे स्पष्ट करून, त्यांची युद्धाची उत्साहशक्ती नष्ट करणे आणि त्यातून पांडवांच्या विजयाचा मार्ग मोकळा करणे, हा कृष्ण शिष्टाईमागील पहिला राजकीय हेतू होता.

 प्रत्यक्ष हस्तिनापुरात जाऊन कौरव पक्षाचे बलाबलहि त्याला आपल्या दृष्टीखालून घालायचे होते. कौरवांकडील जिद्दी, युद्धनिपुण, श्रेष्ठ धनुर्धर, बलिष्ठ योद्धा, महारथी कर्ण होता. 

दुर्योधनाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेचे ते जनित्र होते. या कर्णाचा तेजोभंग करून त्याचा रणोत्साह संपवावा असेहि कृष्णाच्या मनात होते. 

कर्ण संपला की कौरवांचा पक्ष जवळ जवळ संपला, याची त्याला जाणीव होती. हस्तिनापुरी जाण्याचे तेहि एक महत्वाचे कारण होते. याशिवाय कौरवपक्षीय योद्धयांची परस्परात फूट किंवा मतभेद किती आहेत ते अजमावून पाहोणे, जो आपल्या दृष्टीने वध्य आहे तो जगाच्याहि दृष्टीनेच नव्हे तर त्याच्या पक्षाला साहाय्य करण्याऱ्या लोकांच्याहि दृष्टीने वध्य ठरविणे आवश्यक होते, म्हणूनहि कृष्ण हस्तिनापुरी गेला. आपल्या या विविध राजकीय हेतूंचे स्पष्टीकरण कृष्णाने उद्योगपर्वात अनेक ठिकाणी केले आहे. (म. भा. उ. प. अ. ७३, ७९) 

**कृष्णाची स्वसंरक्षणाची तयारी

कौरवांच्या राजनगरीत हस्तिनापुरात शिष्टाईसाठी जात असता, कृष्ण केवळ स्वतःच्या ईश्वरी सामर्थ्यावर विसंबून तिथे गेला, आणि दुर्योधनाने त्याला बंदी करण्याचा घाट घातला, तेव्हा तो आपल्या ईश्वरी सामर्थ्यामुळेच त्यातून सुटला, असे सांगण्याचा आणि समजण्याचाहि प्रघात आहे. महाभारतानुसार तर ही समजूत खोटी आहेच, पंण अधार्मिकांना निखंदून, धर्मनिष्ठ राज्यसंस्था निर्माण करण्याचे आपले जीवनध्येय गाठीत असता, सर्वसामान्यापुढे एक मार्गदर्शक आदर्श ठेऊ पहाणारा कृष्ण, त्याच्यामधे असली, तरी ती ईश्वरी शक्ती प्रकट करण्याचा संभव नाही. मानवतेचा मार्गदर्शक ही भूमिका मानवाप्रमाणे वागण्यानेच सिद्ध होणार होती. त्यामुळे कुरुसभेत जाताना तिथे संभवनीय असलेले सर्व धोके विचारात घेऊन, आपल्या संरक्षणाची कडेकोट सिद्धता करून, कृष्ण हस्तिनापुरात गेला होता. त्यामुळेच हस्तिनापुरात जाताना त्याचा रथ सर्व शस्त्रास्त्रांनी सिद्ध होता. त्याच्या बरोबर दहा यादव महारथी, सात्यकीच्या नेतृत्वाखाली हस्तिनापुरास निघाले होते. एक हजार पायदळ, एक हजार घोडेस्वार, खाण्यापिण्याचे भरपूर साहित्य, विपुल सेवक, त्यानी बरोबर घेतले होते. (म. भा. उ. प. अ. ८४ श्लोक १, २) शिवाय दुर्योधनाच्या मदतीसाठी दिलेल्या नारायणी सेनेचा सेनापती हार्दिक्य कृतवर्मा, आपल्या एक अक्षोहिणी सेनेसह, म्हणजे जवळ जवळ अडीच लक्ष सैन्यासह, हस्तिनापुरी तळ देऊन बसला होता. आणि कृष्ण हस्तिनापुरात येत असल्याच्या सूचना त्यालाहि पोचल्या होत्या. कुरू-पांडवांच्या युद्धात तो पांडवांच्या विरूद्ध लढणार असला, तरी कृष्ण-कौरव संघर्ष उभा राहिल्यास तो कृष्णाच्याच बाजूने उभा राहणार होता, ही गोष्ट स्वतःसिद्ध होती. 

बरोबर कृष्णाने खाद्यपेयादी पदार्थ घेतले होते. कारण कृष्णासारख्या पांडवांच्या आधारशिलेबर प्रहार करण्याची एकहि संधी कौरव सोडणार नाहीत, याची कृष्णाला कल्पना होती. कृष्णाच्या पहिल्या मुक्कामावर वृकस्थल येथे तो व त्याच्या सैनिकांच्या आदरातिथ्याची संपूर्ण व्यवस्था करण्याचा धृतराष्ट्राने केलेला प्रयत्न त्या दृष्टीने बोलका आहे.

भारताचार्य चिंतामणराव वैद्य यांच्या गणनेप्रमाणे शालिवाहन शकपूर्व ३१८० व्या वर्षी, कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी, सकाळी, सर्व आन्हिके उरकून, कृष्णाने रेवती नक्षत्रावर, उपप्लाव्य नगरीतून, हस्तिनापुरासाठी प्रयाण केले. वृकस्थली सारख्या ठिकठिकाणच्या मुक्कामी जनपदवासीयांशी हितगुज करीत धृतराष्ट्र आणि दुर्योधनाने केलेल्या व्यवस्थेचा आव्हेर करीत कृष्ण हस्तिनापुराकडे निघाला. प्रत्येक ठिकाणी उतरण्याची सोय कृष्णाने आपल्या बरोबर ठेवली होतीच.

**हस्तिनापुरी स्वागत

हस्तिनापुरच्या प्रवेशद्वारी कृष्णाचे भव्य स्वागत झाले. युवराज दुर्योधन सोडून धृतराष्ट्राचे सर्व पुत्र, भीष्म, द्रोण, कृप, कुरुसभेतील ज्येष्ठ, श्रेष्ठ, अमात्य, भारत, ज्येष्ठ पौरजन, त्याच्या स्वागतार्थ उपस्थित होते. कृष्णाने सर्वांना यथोचित वंदन करून धृतराष्ट्राचा स्वागत सन्मान स्वीकारला आणि सर्वांशी हसत, खेळत, बोलत त्यांचा निरोप घेतला. दुःशासनाच्या महालात त्याची उतरावयाची सोय केली आहे हे सांगायला, कुणाला अवसरहि न देता आपली आत्याबाई कुंती हिला भेटण्याच्या मिषाने कृष्ण राजभवनातून निघून विदुराधरी गेला.

कृष्णावर देवत्व लादणारी मंडळी, भगवान् श्रीकृष्ण, दुर्योधन करीत असलेला आदर सत्कार अव्हेरून आपल्या गरीब भक्ताकडे, विदुराकडे, त्याच्या. घरच्या 'कण्या खायला' गेले, अशी विकृत वर्णने करीत असतात. यातला कीर्तनकारी भाबडेपणा सरळ आहे, एकतर विदुर गरीब नव्हता. तो कौरवांचा महामंत्री होता. सद्वर्तनी होता. धर्मनिष्ठ होता. म्हणून कृष्ण त्याच्याकडे उतरला. आणि दुसरे म्हणजे कौरवांसारख्या दुष्ट मंडळींकडून आदरसत्काराच्या निमित्ताने होणारा धोकाहि त्याला टाळायचा होता.

**आतिथ्याला नकार

कृष्णाने कुंतीची भेट घेऊन तिला तिच्या पुत्रांचे कुशल सांगितले. संघी नच झाल्यास ते युद्धालाहि तयार असल्याचे तिला सांगून, तिला वंदन, करून युवराज दुर्योधनाच्या खाजगी भेटीसाठी कृष्ण गेला. आपल्या मित्रमंडळीसमवेत भोजनाला थांबण्याचीहि त्याने विनंती केली. पण कृष्णाने नम्रपणे ते निमंत्रण नाकारले. यावर दुर्योधन म्हणाला. 'कृष्णा पांडवांचा आणि आमचा तू सारखाच सहाय्यक आणि नातेवाईक आहेस. दोघांच्या हिताची तुला काळजी आहे. म्हणूनच तुझ्या वाटेवर तुझ्यासाठी सुखसोयी निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केला. इथेहि दुःशासनाच्या मंदिरात तुझ्या उतरण्याची सोय केली. पण तू त्यांचा अव्हेर केलास. कृष्णा तुला धर्मार्थाने चांगले ज्ञान आहे. तरीहि तू असे करावेस याचे आश्चर्य वाटते.' इथे दुर्योधनाला असे सुचवायचे होते की, कृष्ण ज्या कार्यासाठी तिथे आला होता त्याच्या फलद्वफ्तेसाठी कौरवांना प्रसन्न राखणे राजनीतीच्या दृष्टीने आवश्यक होते.

 यावर कृष्ण म्हणाला, 'मी दूत म्हणून इथे आलो आहे. दूत आपल्या कार्यात सफल झाले तरच सत्कार घेतात. मी ज्या कार्यासाठी इथे आलो आहे ते सफल झाले तर तू हवा तितका माझा सत्कार कर. तो मी घेईन,' त्यावर दुर्योधन म्हणाला, 'तुझे कार्य सफल होवो अगर न होवो, त्याचा आणि तुझा आम्ही करीत असलेल्या या सत्काराचा काही संबंध नाही. तू आमचा संबंधी आहेस. तुझ्यात आणि आमच्यात काही संघर्ष नाही. आमच्या बरोबर भोजनहि न करावे बाला काही कारण आहे का?

 यावर कृष्ण प्रसन्नपणे हसून म्हणाला, 'दुर्योधना, दोन कारणासाठी लोक एकमेकांकडे भोजन करतात. एकमेकांवर प्रेम असेल तर माणसे एकमेकांकडे भोजन करतात. किंवा एखाद्याची अन्नान्न दशा झाली असली, तर माणूस कुठलेही अन्न पत्करतो. दुर्योधना, तुझ्या माझ्यात प्रेम नाही. आणि माझी अन्नान्न दशा झालेली नाही. तेव्हा मी तुझ्याकडे जेवणार नाही. तू तुझ्या माझ्यात कोणते वैर आहे विचारतोस? एक सांग, धर्मनिष्ठ पांडवांशी पूर्णपणे एकरूप झालेल्या माझे, पांडवांचा द्वेष आणि त्यांचा अनन्वित छळ करून तू काही अप्रिय केले नाहीस, असे वाटते तुला? तुमच्या त्या साऱ्या पापांचा पाढा वाचायला हवा? दुर्योधना, तूच काय, पण तुमच्या येथील कुणाचेहि अन्न मी खाण्याच्या योग्यतेचे नाही. ते दुष्टांचे अन्न आहे. ते पापाने डागळले आहे. तुझ्या राज्यात मी ज्याच्याकडे जेवावे असा योग्यतेचा फक्त एकटा विदुर आहे. (म. भा. उ. प. अ. ९१

 दुर्योधनाघरचे भोजनाचे निमंत्रण नाकारताना, भीष्म, द्रोण, कृप, बाल्हीक यांच्या घरचे अन्नही पापाचे आहे, म्हणून स्वतःला ग्रहण करण्यास अयोग्य आहे, असे सर्वासमक्ष बजावण्यात, कृष्णाने भेदनीतीचा उच्चांक गाठला. 

कौरव सभेत दुसऱ्या दिवशी कृष्णाची आन्हिके चालू असताना, युवराज दुर्योधन आणि गांधारराज शकुनी त्याला कुरुसमेत घेऊन जाण्यासाठी हजर झाले. कृष्णाने आन्हिके आटोपली. स्वसंरक्षणाची सर्व सिद्धता आहे ना? याची खात्री करून घेतली. आणि तो रथारूढ झाला. महाभारतकारांनी कृष्णाच्या कुरुसभेतील प्रवेशाचे, सर्वाशी सस्नेह पण सावध रीतीने वागण्याचे उत्कृष्ट वर्णन उद्योगपर्वाच्या ९४ व्या अध्यायात केले आहे. 

सर्वत्र शांतता पसरली. कृष्णाचे भाषण ऐकावयास सर्व आतूर होते.

कृष्ण जगातील एक उत्कृष्ट वक्ता गणला जातो. उपन्यास, विविध मुद्यांचा विस्तार, ते करीत असताना स्वरांचा चढ उतार, धीरगंभीर आवाज, विशिष्ट शब्दांवरील आघातांनी विशिष्ट परिणाम साधण्याची क्रिया, या दृष्टीने ते वक्तृत्व अमोघ होते. आपलया भाषणांत धृतराष्ट्राला उद्देशून आपल्या येण्याचे प्रयोजन प्रथम त्याने स्पष्ट केले.

 म्हणाला, 'राजा धृतराष्ट्रा, क्षत्रिय वीरांचा विनाश न होता कौरव व पांडव यांच्यात शांतता नांदावी व संधी व्हावा म्हणून मी येथे आलो आहे.' त्यानंतर कुरुकुलाची स्तुती करून, कुरुप्रमुख म्हणून त्याच्या उत्तरदायित्त्वाचा उच्चार करून, त्याचे दुर्योधनप्रमुख पुत्र, धर्म व राजकीय नीतिमत्ता यांच्याकडे पाठ करून नृशंसाप्रमाणे वर्तत असल्याचे सांगून, सभ्यपणाची मर्यादा सोडून त्यांनी आपल्या बंधूंची आणि बंधुस्त्रीची केलेली विटंबना, आणि त्यामुळे निर्माण झालेली जगाचा विनाश करणारी परिस्थिती, यांचा आढावा घेऊन कृष्ण म्हणाला. 'राजा, आज शांतता केवळ दोन व्यक्तींच्या इच्छेवर अवलंबून आहे. त्या दोन व्यक्ती म्हणजे एक तू आणि दुसरा मी. तू आपल्या पुत्रांना आवर. मी पांडवांना आवरतो. त्यांतच तुझ्या पुत्रांचे आणि पांडवांचे हित आहे. कौरवपांडव एक झाले, पांडवांचे समर्थ बल तुझ्यापाठी उभे राहिले, तर देवेंद्रालाहि तू अजिंक्य होशील, जगाचा तू एकछत्री सम्राट बनशील. संधी घडवून आण. त्यासाठी तुझ्या दुष्ट मुलांना ताळ्याबर आण. युद्धासाठी निमंत्रिलेल्या या हजारो राजांना त्यांचा सत्कार करून परत पाठव. राजा, उभय पक्षांनी एकमेकांचा नाश करण्यात काय हंशील आहे? कोणता धर्म आहे? तुला काय सुख आहे? पांडवाना न्यायानुसार त्यांचे राज्य परत करण्यास तुझ्या पुत्रांच्या कोणत्या अधिकाराचा अपहार आहे? पांडवांवर तुझ्या पुत्रांनी कोणकोणते अत्याचार केले, सम्राज्ञी द्रौपदीची कशी कशी विटंबना केली या गोष्टींचा पाढा वाचून इथे पुन्हा कडवटपणा निर्माण करण्याकरिता मी आलो नाही. तुझ्या पुत्रांना तू आवर, एवढेच मला तुला स्पष्टपणे सांगायचे आहे. तुझी इच्छा असली तर पांडव तुझी सेवा करायला तयार आहेत. तुझी तशीच इच्छा असली तर ते युद्ध करायलाही सिद्ध आहेत. युद्ध की शांतता याची निवड तू करायची आहेस. शांततेच्या यशाचा वाटेकरी व्हायचे की विनाशाच्या अपकीर्तीचा वाटेकरी व्हायचे हे तुझे तूच ठरवायचे आहेस.'

कृष्णाने युक्तीने येऊ घातलेल्या युद्धापत्तीचे उत्तरदायित्त्व धृतराष्ट्राच्या माथी ठेवल्यामुळे, एरवी ढोंगीपणाने मोठेपणा घेऊन स्वार्थ पदरात पाडून घेणारा, दुष्ट कृती करवून नामानिराळा राहणारा धृतराष्ट्र, कृष्णाच्या या पवित्र्याने गोंधळून गेला. सहस्त्रावधी राजांच्या समक्ष, घडलेल्या अनेक अनैतिक, आणि अधार्मिक प्रसंगांचे दायित्व दुर्योधनावर ढकलून धृतराष्ट्र मोकळा झाला. आपला मूर्ख, दुष्ट मुलगा आपले मुळीच ऐकत नाही. गांधारी, विदुर, भीष्म यांच्याहि म्हणण्याला भीक घालीत नाही. तो महान् पापबुद्धी, क्रूर व प्रष्टचित्त आहे. त्या दुरात्म्याला आपण काही सांगू शकत नाही. कृष्णा तूच त्याला वळवू शकलास तर जगत्कल्याणाचे एक मोठे कार्य तुझ्या हातून घडेल. असे त्याने कृष्णाला सांगितले.

 कौरव पक्ष अन्यायी आहे, याची स्वतः धृतराष्ट्राकडून प्रकट उद्घोषणा करवून कृष्णाने एक बाजी मारली. (उ. प. अ. १२४, ८ ते ६२) दुर्बलांकडून संरक्षण अपेक्षू नये. दुःशासन, शकुनी किंवा कर्ण है त्याला हवे असलेले ऐश्वर्य मिळवून देण्यास असमर्थ आहेत, हे त्याने जाणावे, त्याच्याकडे असलेले भीष्म, द्रोण, कर्ण, भूरिश्रवा, अश्वत्थामा, जयद्रथ ही मंडळी प्रतियोद्धे म्हणून भीमार्जुनांपुढे उभे राहू शकत नाहीत, याचे सम्यगुज्ञान मनी धरून, लाखो लोकांची हत्या व्हायला त्याने कारणीभूत ठरू नये. असे कृष्णाने दुर्योधनाला बजावले.

'सर्वनाश होऊ नये म्हणून पांडवांशी संधी कर. तुझ्या राज्याच्या विभागात पांडव धृतराष्ट्राला राजा आणि तुला युवराज म्हणून नियुक्त करतील. वैभवाला लाथाडून बिनाश करून घेऊ नको. मित्रांना आनंद दे. सर्वाचा दुवा घे.' कृष्या अगदी तळमळीने बोलला होता. त्यातून पांडवांचा पक्ष अल्पसंख्यांकांचा आहे या गोष्टीवरून सर्वांचे लक्ष उडवून, बहुसंख्य मंडळी असलेला कौरवांचा पक्ष अन्यायी असल्याचे कृष्णाने दुर्योधनाला उद्देशून केलेल्या भाषणात स्पष्ट केले. केवळ एका व्यक्तीच्या हटवादासाठी अधार्मिक कौरव, नाश ओढवून घेत आहेत हे त्यांच्या सहाय्यकांनाहि कृष्णाने पटविले. कुरुवृद्ध तर भर सभेत दुर्योधनालाच उपदेशू लागले. त्यामुळे आपल्या स्वभावाप्रमाणे दुर्योधन संतापला. मोडेन पण वाकणार नाही या आपल्या वृत्तीचे त्याने प्रदर्शन केले. 'समरांगणातील मृत्यूला क्षत्रिय घाबरत नाहीत', असे सांगून सुईच्या अग्राने उकरली जाईल एवढीदेखील भूमी, हक्क म्हणून पांडवांना न देण्याचा आपला कृतनिश्चय त्याने घोषित केला

कृष्णाच्या या जोरदार भाषणामुळे दुर्योधनाची चांडाळ चौकडी चिडली, संतापली. भयचकित झाली. आणि उद्दामपणे सभात्याग करून सभेतून निघून गेली.प्रत्यक्ष अपराध करणारा म्हणून दुर्योधन जितका दोषाला पात्र आहे, तितकेच त्याच्या अपराधाकडे प्रेक्षकाच्या भूमिकेवरून पाहणारे, स्वतःच्या सामर्थ्याचा उपयोग न करणारे, म्हणून तुम्हीहि तितकेच दोषी आहात, असे त्याने कुरूवृद्धांना बजावले. त्यांनी सर्वांनी आपला सामर्थ्याचा उपयोग करून दुर्योधन, शकुनी, कर्ण व दुःशासन यांना बंदी करून पांडवांच्या स्वाधीन करावे, कारण ग्रामाच्या संरक्षणासाठी कुळाचा परित्याग करावा, देशाच्या संरक्षणासाठी ग्रामाचा परित्याग करावा व आत्मकल्याणासाठी पृथ्वीचा परित्याग करावा असे नीतिशास्त्र सांगते. कुरुकुल वाचावे म्हणून हे करणे आवश्यक आहे. तुमच्या शांततेच्या आणि सुजनतेच्या घोषणा प्रामाणिकपणाच्या आहेत हे सिद्ध करण्यासाठी हे आवश्यक आहे असेहि कृष्ण त्यांना म्हणाला.

कृष्णाच्या या सरळ सूचनेने कुरुवृद्धांचा पुराच दंभस्फोट होऊन ते अगदीच उघडे पडले. गोंधळलेल्या धृतराष्ट्राने विदुराकडून गांधारीला बोलावून, तिच्याकडून दुर्योधनाला उपदेश करण्याचे नाटकहि घडवून आणले, पग दुर्योधनावर त्याचा काही परिणाम झाला नाही. कृष्णाच्या अमोघ वक्तृत्वाचा दुर्योधना सहाय्यक असलेल्या पित्यावर एवढा परिणाम झालेला पाहून कृष्ण आणखी थोडावेळ बोलत राहिला तर आपला पिता आपणा सर्वांना बांधून त्याच्या स्वाधीन केल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा त्या आधी आपणच कृष्णाला बंदी करावे आणि हे प्रकरण संपवावे असा विचार दुर्योधन आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केला.

त्यांचे हे विचार केवळ त्यांच्या चेहऱ्यावरील भावावरून ओळखून कृष्णाचा परक्रमी सेनानी सात्यकी याने कृष्णाच्या संरक्षणाची तात्काळ सिद्धता केली. (उ. प. अ. १३० श्लोक ८ ते १७) कृतवर्याला सूचना दिली. त्याने आपल्या यादव सैन्यासह राजभवनाला वेढा देऊन राजसभेचे दार रोखून तो उभा राहिला, त्यानंतर सात्यकीने सभेत येऊन, दुर्योधनाचा कृष्णाला बंदी करण्याचा मानस आणि त्याने तशा दृष्टीने केलेली सिद्धता, याचा जाहीर उच्चार केला. 'कृष्णाला बंदी करणारे हातच नव्हे, त्यांची शरीरेसुद्धा दग्ध केल्यावाचून यादव राहणार नाहीत' असेहि त्याने जाहीर केले. त्याचे हे भयंकर उद्गार ऐकताच, कुरुसमेत एकच गोंधळ माजला. कृष्ण मात्र शांत होता. म्हणाला, 'राजा तुझे पुत्र मला बंदी करतात की मीच त्यांना बंदी करतो हे तू पहाच. 

घाबरलेल्या धृतराष्ट्राने दुर्योधनाला त्याच्या सहकाऱ्यासह सभेत बोलावून विदुराकरवी त्याला उपदेश करण्याचा प्रयत्न केला. पण ते पालथ्या घड्यावर पाणी होते. दुर्योधन काही ऐकायलाच तयार नव्हता. तेव्हा कृष्ण फक्त मोठ्याने हसला आणि सात्यकी आणि कृतवर्मा यांचा हात धरून त्या सर्वांसमक्ष सभेतून बाहेर पडला.

**विश्वरूपदर्शन

या ठिकाणी कृष्णाचे दैवीकरण करणाऱ्या मंडळींनी महाभारतात, कृष्णाच्या 'विश्वरूप दर्शनाचा' प्रसंग प्रक्षिप्त केला आहे. कृष्णाला बंदी करायला निघालेल्या चांडाळ चौकडीकडे पाहून कृष्ण तुच्छतेने मोठ्याने हसला. ही गोष्ट या तथाकथित विश्वरूपदर्शनाचा पाया आहे. असाच विश्वरूपदर्शनाचा प्रकार कृष्णाने अर्जुनाला दाखविल्याचा प्रसंग भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायात आला आहे. गीतेतील तत्वज्ञानाच्या दृष्टीने तिथला तो 'विश्वरूपं दर्शनाचा प्रसंग, उचित ठिकाणी आहे असे फार तर म्हणता येईल. पण भीष्मपर्वातील श्रीमत्भगवद्गीतापर्वाध्याय हाच प्रक्षिप्त असल्याने कै. बंकिमचंद्रादी विद्वांनाचे मत असल्याचे तो प्रसंगहि अनैसर्गिक, अलौकिक म्हणून प्रक्षिप्त ठरेल.कृष्ण माणूस होता. माणसासारखाच वागत होता. मानवी शक्तीनेच कार्य करीत होता. दैवी शक्तीने त्याला काही करता येत असते तर सारे महाभारतच घडले नसते. कृष्णाला केवळ पकडण्याची आपण सिद्धता करण्यापूर्वीच यादव सैन्याचा राजप्रासादाला पडलेला वेढा, राजसभेच्या द्वारी हाती खङ्ग घेऊन उभा राहिलेला कृतवर्मा आणि जाहीर पणे कौरवांना आव्हान देत कुरुसभेत उभा राहिलेला सात्यकी ही सारी कृष्णाची सिद्धता पाहूनच तर दुर्योधनाची चांडाळ चौकडी स्तिमित झाली होती, अवाक् झाली होती. त्यांच्या दृष्टीने राजनैतिक मुत्सद्दीपणाचे हेच 'विश्वरूपदर्शन' होते.

**कर्णाचा तेजोवध



कुरूसभेतून बाहेर पडून कृष्ण तडक विदुराधरी, कुंतीचा निरोप घेण्यास गेला. जाता जाता त्याने मोठ्या प्रेमाने खांद्यावर हात टाकून अंगराज कर्णाला आपल्या रथात घेतले. उपप्लाव्याच्या वाटेवर कृष्ण आणि कर्ण यांची ही भेट, हा कृष्णाच्या भेदनीतीचा उच्चांक म्हणता येईल. त्याच्या असामान्य बुद्धीचा आणि मुत्सद्दीपणाचा प्रत्यय इथे येतो. हस्तिनापुराची वेस ओलांडून रथ बराच लांब आल्यानंतर कृष्ण कर्णाला म्हणाला, 'राधेया तुला एक विशेष गोष्ट सांगतो. कुरूंच्या या महान् राज्याचा वारस दुर्योधन अथवा युधिष्ठिर नसून तू आहेस. तू स्वतःला राधेय समजतोस. पण तू राधेय नसून कौतय आहेस (महाभारत उ. प. अ. १४० श्लोक ६ ते २९) कुंतीचा तू कौमार्यावस्थेत झालेला पुत्र असून धर्मशास्त्रानुसार महाराज पंडू हा तुझा पिता आहे. तू पहिला आणि ज्येष्ठ पांडव आहेस. राज्याचा घनी आहेस. तू दुर्योधनाचा पक्ष सोडून पांडवांकडे ये, आणि तुझा अधिकार हाती घे. कर्णा, पितृपक्षात पांडव तर मातृपक्षात सर्वश्रेष्ठ पराक्रमी यादव असणारा तू भाग्यवान आहेस. माझ्या बरोबर तू आत्ता पांडवांकडे चलावेस अशी माझी इच्छा आह. पांडव तुझे आनंदाने स्वागत करतील. 

तुमचे कृष्णाने 'द्रौपदीही पहिला पांडव म्हणून, आपला सहावा पती म्हणून, तुझा स्वीकार करील,' अशीहि लालूच कृष्णाने कर्णाला दाखविली. मात्र मुशाभारतातील उल्लेख लक्षात घेऊन काही लोक कृष्णाला दूषण देतात. पण एक तर स्त्रियांसंबंधी महाभारतकालीन परिस्थिती लक्षात घेता, हे विधान फारसे अनुचित वाटत नाही.

बायकांना मन असते, ही गोष्ट त्यावेळचे कोणतेच पुरूष, भीष्म, वसुदेव, पांडव, कृष्ण कोणीच मानीत नसत. जे इतर क्षत्रिय करत असत तेच या बाबतीत कृष्णानेहि केले.

कृष्णाच्या शब्दांनी कर्णाच्या अंतःकरणावर विलक्षण परिणाम केला. त्यांनी त्याच्या अंतःकरणाची सारी धारणाच बदलून टाकली. आपण कितीहि प्रलोभने दाखविली, अगदी साम्राज्य देऊ केले, तरी तो वसुषेण कर्ण, पांडव पक्षाला येऊन मिळणे केवळ अशक्य आहे, याची कृष्णाला पूर्णपणे जाणीव होती. कर्ण अशा परिस्थितीत होता व कौरव पांडवांचे वैर अशा पातळीवर येऊन ठेपले होते की, त्या अवस्थेत कौरव पक्ष सोडून पांडवांना येऊन मिळणे, राधेयाला केवळ दुरापास्त होते. हे माहीत असता, भेदनीतीचा हा प्रयोग कृष्णाने केला. 

शेक्टचा टोला तर अप्रतिम मुत्सद्यीपणाचे द्योतक होता. त्यामुळे पांडव-विद्वेषाची कर्णाच्या मनातील धार बोथट झाली. पांडवांना छळण्यामध्ये आपण घेतलेल्या पुढाकारामुळे, कर्णाला स्वतःची लाज बाटली. प्रत्यक्ष आपल्या धाकट्या बंधूंच्या स्त्रीचे सर्वस्व हिरावून घेण्याची आज्ञा आपण केली, त्याची विलक्षण टोंचणी त्याच्या मनाला लागून कर्णाचे अंतःकरण जळू लागले. या घोर अपराधांना आपल्या मरणाशिवाय दुसरे प्रायःश्चित नाही, याची कर्णाला खात्री पटली. आपण एकाहून एक भयंकर अशी पातके केली, त्यात आणखी मित्रद्रोह व विश्वासघात यांची भर पडायला नको, म्हणून कौरवांचा पक्ष न सोडण्याचा आपला निश्चय त्याने कृष्णाला बोलून दाखविला

कृष्णाने केलेल्या या प्रयोगाने कर्णाच्या मनावर इतका परिणाम झाला, अन्यायाच्या जाणिवेने त्याच्या मनाला एवढी टोचणी लागली की, त्याने पुढे कुंतीला कोणत्याहि परिस्थितीत आपल्या चार बंधूंना न मारण्याचे व पूर्णपणे 'वांचविण्याचे वचन, तिने न मागता दिले, आणि युद्धातहि ते पाळले.

कर्णा तू परत जा. भीष्म, द्रोणांना जाऊन सांग, सध्या कार्तिक महिना आहे. युद्धाला हे दिवस फार चांगले आहेत. आज पासून सातव्या दिवशी अमावस्या आहे. त्या दिवशी तुम्हा सर्वांची युद्धात मरणाची इच्छा पूर्ण करणारे युद्ध सुरू होईल (म. भा. उ. प. अ. १४२ श्लोक २ ते २०) कृष्णाचे बोलणे ऐकून कर्ण म्हणाला, 'हे सगळे मला स्पष्ट दिसत आहे. वासुदेवा, माझ्यासह सर्व राजमंडळ या युद्धाच्या वणव्यात आहे, याची मला कल्पना आहे. तीच नियती आहे.' 

उपप्लाव्य नगरीला परतून कृष्णाने हस्तिनापुरात घडलेली सर्व हकीकत पांडवांना सांगून, आता युद्धाशिवाय पर्याय नाही हे युधिष्ठिराला पटवले, आणि युधिष्ठिराच्या सैन्याने कुरूक्षेत्राकडे प्रयाण केले.

कै. बाळशास्त्री हरदासांनी, कृष्ण-शिष्टाईचे फलित आपल्या 'भगवान् श्रीकृष्ण या ग्रंथाच्या ४२३ व्या पानावर दिले आहे. ते असे :

१) लोकापवाद टळला.

२) युद्धाला युधिष्ठिराची संमती मिळाली.

३) कौरवांच्या भीष्मादी योद्धधात न्यूनगंड निर्माण झाला.

४) कौरवांचे सर्व सामर्थ्य ज्या एका महान् व्यक्तीत केंद्रित झाले होते, त्या कर्णाचा उत्साह संपवून कृष्णाने त्याचा इतका तेजोवध केला की, कर्ण जवळ जवळ संपला. कर्ण संपला तिथेच कौरवांचा पराजय निश्चित झाला.

५) कौरव योद्ध्यांची विसंवादिता स्पष्ट झाली.

६) आपल्या दृष्टीने वध्य, ते जगाच्याहि किंबहुना कौरवपक्षीय प्रमुख सेनापतींच्या दृष्टीनेहि वध्य ठरविले.

पांडवांच्या विजयाच्या दृष्टीने, कृष्णाचे हस्तिनापुरातील 'तथाकथित संधी' प्रयत्न अत्यंत यशस्वी झाले, असेच म्हणायला हवे. प्रत्यक्ष युद्ध उभे राहिले, तेव्हा कौरव पक्षातील सेनापतीहि पांडवांच्या जयाची इच्छा करू लागले होते. इतकेच नव्हे तर आपला पक्ष अन्यायी आहे, आणि पांडवांचा पक्षच न्याय्य आहे, हे त्यांना पटले होते. 

**पांडवांच्या जयाचे इंगित

आपल्या उद्दिष्टांच्या न्याय्यतेबद्दल पांडव पक्षीयांची पूर्ण श्रद्धा तर होतीच, पण न्यायाच्या प्रतिष्ठापनेसाठी, धर्मराज्याच्या संस्थापनेसाठी, आपण लढत आहोत, ही त्यांची धारणा होती. शत्रूविषयी त्यांच्या अंतःकरणांत विलक्षण चीड आणि तिरस्कार होता. शत्रूच्या विनाशासाठी ती मंडळी उत्सुकहि होती. सर्वानुमते त्यांनी धृष्टद्युम्न्याला सरसेनापती म्हणून मान्य केले होते. तो द्रौपदीचा भाऊ होता, आणि खरे तर ते महायुद्ध द्रौपदीच्या शीलासाठी लढले जात असल्यामुळे, कौरवांविषयी अत्यंत द्वेष असलेला सरसेनापती पांडवांनी निवडला होता. द्रुपद, विराट, सात्यकी, धृष्टकेतू, शिखंडी, जरासंधपुत्र सहदेव, अशी ज्येष्ठ मंडळी धृष्टद्युम्न्याच्या नेतृत्वाखाली, सेनापती म्हणून आनंदाने काम करायला तयार झाली होती. इथेच पांडवांचा विजय होता. 

या उलट, कौरव पक्षाकडील भीष्म आणि कर्ण या दोन महत्वाच्या सेनापतींमधील वितुष्ट तर पराकोटीला पोहोचलेले होते. इतके की भीष्माने महारथी कर्णाला जाहीरपणे अर्धरथी म्हणावे, आणि 'भीष्म जिवंत असेपर्यंत अगर रणांत लढत असे पर्यंत आपण युद्धात सहभागी होणार नाहीं असे कर्णाने जाहीर करावे! सैन्यातील शिस्तीच्या दृष्टीने ही गोष्ट किती अयोग्य होती? हे सहज ध्यानात येते. भीष्म बरोबर असले किंवा कर्ण बरोबर असला तरीहि अनेक अनुचर योद्ध्यांपुढे त्यांनी हे कुठले उदाहरण घालून दिले? कर्ण, अश्वस्थामा यांची तोंडातोंडी, कर्ण आणि कृप यांच्या झटापटी आणि कर्ण सेनापती असताना, महारथी शल्य त्याचा सारथी असताना, त्याने कर्णाचा केलेला तेजोभंग, या साऱ्या गोष्टी कौरवांचा पक्ष आतून किती विघटित होता, हेच दाखवितात.

कृष्णाने आपल्या मंत्रयुद्धाने, दिढीने असलेल्या कौरव सैन्याचा निःपात करण्याची व पांडवांच्या विजयाची जय्यत तयारी केली असली, तरीहि तो विजय प्रत्यक्ष पदरात पडणे रणांगणावरील कौशल्यावर अवलंबून होते. भारताचार्य चिंतामणराव वैद्यांनी एक अक्षौहिणी सैन्याचा हिशोब अडीच लाखांचा मांडला आहे. म्हणजे कौरव पांडवांकडील एकूण सैन्य अठरा अक्षौहिणी म्हणजे चाळीस लाखाच्या घरात जाते! एवढ्या लोकांचा, फक्त अठरा दिवस चाललेल्या महायुद्धात प्रचंड संहार झाला. ही जागतिक पातळीवरची महान् घटनाच म्हणायला हवी. कारण आज वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगती एवढ्यामोठ्या प्रमाणावर झाली असूनहि, इतक्या थोड्या दिवसांत, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचा संहार झाल्याचे इतिहासात नमूद नाही. पांडवांना हाताशी धरून स्थापन केलेले धर्मसाम्राज्य एकदा उधळले गेले असता, ते पुन्हा निर्माण करण्याचा कृष्णाचा हा महान् प्रयत्न. पण त्याने हाताशी धरलेली साधने श्रीरामचंद्राप्रमाणे (लक्ष्मण, हनुमंतासारखी) स्वयंपूर्ण नसल्याने, हाती असलेल्या अपूर्ण साधनांच्या आधारे, जगातील आसुरी शक्तींवर अवघ्या अठरा दिवसात मात करणे, हे खरे तर कृष्णापुढे आव्हानच होते. अशा परिस्थितीत कृष्णाने विजय खेचून आणला, हे त्याच्या विलक्षण विभूतिमत्वाचे लक्षण आहे. युद्धाच्या प्रारंभीच अर्जुनासारखा नरोत्तम शत्रुपक्षतील नातलगांना पाहताच प्रेम, वत्सलता, ममता या भावनांनी विवश झाला. महायुद्धाच्या भयंकर परिणामांनी समाजाचे केवढे अधःपतन होईल याची कल्पना मनात येऊन खचला. त्याच्या अंगाला कंप सुटला. त्याचे गांडीव धनुष्य त्याच्या हातातून गळून पडले. कौरवांनी आपल्याला ठार मारले तरी चालेल, पण आपण त्यांच्यावर हात उचलणार नाही. इहलोकीचे राज्यच काय, पण त्रैलोक्याचे राज्य मिळाले तरी, स्वजनांना मारून आणि गुरुहत्या करून ते मिळणार असेल, तर मला ते नको, असे म्हणून तो रथात स्वस्थ बसला.

अर्जुनाची ही अवस्था पाहून कृष्ण थक्क झाला. त्याचा तो सारा मोह नष्ट करण्यासाठी कृष्णाने त्याला 'श्रीमत् भगवद्गीता' रूपी विश्वोद्धारक तत्वज्ञानाचा उपदेश केला. अलौकिक कथेप्रमाणे त्याला 'विश्वरूप दर्शन' करून, त्याच्या बुद्धीवरील मोहाचे पटल फाडून टाकले आणि त्याला युद्धाला तयार केले. 'श्रीमद्भगवद्गीता' म्हणजे कृष्णाने जगाला दिलेले, मानवी जीवनाची विकसन परंपरा ज्यामुळे टिकून राहील अशा शाश्वत जीवनमूल्यांचा आणि तत्वज्ञानाचा महान् आविष्कार आहे. 

युद्धकाळात कृष्णाने धर्मयुद्धापेक्षा 'युद्धधर्म प्रमाण मानून निरनिराळ्या प्रसंगी पांडवांना योग्य त्या सूचना, अगर त्यांच्या संभ्रमित अवस्थेत योग्य ते निर्णय दिले आहेत. साधनशुचितेचा नसता बाऊ न करता, ज्यांचा अंतिम परिणाम जनविरोधी मूल्यांच्या स्थापनेत होतो, त्या गोष्टी कितीहि शुद्ध असल्या तरी त्या पापमय आहेत, आणि ज्यांचा अंतिम परिणाम समाजापुढे आदर्श मूल्ये प्रस्थापनात होतो, त्या गोष्टी दिसायला पापमय वाटल्या तरी त्या पुण्यमयच असतात, या नीतीचा कृष्णाने अवलंब केला. कौरवांचा काय किंवा पांडवांचा काय, युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोण स्वार्थी होता. पांडव न्याय्य हक्काकरिता झगडत असल्यामुळे, त्यांचा स्वार्थ फारतर उदात्त स्वार्थ म्हणता येईल. पण नीच वा उदात्त स्वार्थाचा ज्याच्या अंतःकरणाला तिळमात्र स्पर्श झाला नव्हता आणि निःस्वार्थपणे या देशात धर्मराज्याची घडी बसवणे हेच ज्याचे ध्येय होते, म्हणजे नीतिमूल्यांचे रक्षण आणि विश्वकल्याण हेच ज्याचे उद्दिष्ट होते, असा त्या कुरुक्षेत्रावर हजर असलेला एकमेव महापुरूष म्हणजे कृष्ण होता. कृष्ण नसता तर पांडवांचा पक्ष, धार्मिक, सत्यनिष्ठ, उच्चमूल्यावर आधारित असूनहि त्या पक्षाचा विजय झाला नसता. देशात दृढमूल झालेली अधार्मिक सत्ता संपूर्णतया नष्ट करण्यासाठी, उपप्लाव्य नगरीतील उत्तरा-अभिमन्यु विवाह प्रसंगापासून कृष्णाने पावले टाकायला सुरवात केली, हे आपण पाहिले आहेच. कुरुक्षेत्रावरील अठरा दिवसांच्या युद्धाचा विचार केला तरी, पांडवपक्षीयांच्या शौयपिक्षा कृष्णामुळेच विजयाचे पारडे पांडवांच्या बाजूला झुकले असे ध्यानात येते.

संदर्भ -शोध कृष्णाचा प्रवासी पूर्णत्वाचा 

लेखक प्रा डॉ राम बिवलकर 

Sunday, August 25, 2024

कृष्ण निळा निळा

 


कृष्ण निळा निळा

बासुरीचा लावितो लळा..


कृष्ण(विष्णू )का तो निळा आहे? कोणी म्हणतो कालिया नागाच्या विषामुळे तो निळा झाला.कोणी म्हणे तो सागरात राहतो

पण कृष्णच काय,रामही निळा होता.एवढचं‌ काय तर पहिल्या वनवासानंतर आणि महाभारतानंतर पांडव जेव्हा पुन्हा वानप्रस्थाश्रमाला निघाले.तेव्हा युद्धिष्ठिरही निळा होत गेला.तो तर देवही नव्हता?


आता हे सर्व आपल्याला असे समजते तर या गोष्टींवरून काढलेल्या चित्रांमुळे,हो पण सर्व निळे का?


ते सर्वज्ञ होते.सर्व गोष्टींचे ज्ञान सुख -दु:खाच्या पलीकडे ते गेले ,स्वधर्माची संपूर्ण जाणीव झाली.त्यांनी स्वतःमध्ये ते ज्ञान सामावून घेतले.त्यांच्या ज्ञानाची सीमा आकाशाप्रमाणे,सागराच्या तळाप्रमाणे थांग न लागणारी होती.म्हणून निळ्या नभासम ते निळे 🩵 युद्धिष्ठिरला धर्माचे, स्वत्वाचे संपूर्ण ज्ञान झाल्याने तोही निळा जाहला.


एक विज्ञान शिक्षिका असल्याने जरा ,ध्यानभंग करते😄

आकाश सगळ्या रंगांची फ्रेक्वेन्सी अबसॉर्ब करतो फक्त निळ्या रंगाची नाही,निळा रंग त्याचा काही कामाचा नाही म्हणून त्याला निळा नकोय,तरी तो आपल्यासाठी निळा😄.

सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणात पोहोचतो आणि हवेतील सर्व वायू आणि कणांद्वारे सर्व दिशांना विखुरला जातो. निळा प्रकाश इतर रंगांपेक्षा जास्त विखुरलेला आहे कारण तो लहान, लहान लहरी म्हणून प्रवास करतो. त्यामुळेच आपल्याला बहुतेक वेळा निळे आकाश दिसते.

वसंत बापट यांची या निळ्या रंगावर एक अफलातून कविता / गीत आहे . त्यांनाही समजलं अंतरंग निळा म्हणून तो निळा😊


देव माझा निळानिळा | 


देव माझा निळानिळा, डोळे माझे निळे

माझा समुद्रही निळा, आभाळही निळे


श्रावणाच्या खुळ्या धारा आल्या तशा गेल्या

तेव्हा ओल्या उन्हातून मोर आले निळे


आश्विनात आठ दिशा निळ्यानिळ्या झाल्या

नदीकाठी लव्हाळ्यांना तुरे आले निळे


फूलवेड्या वसंताची चाहूल लागली

निळ्यानिळ्या फुलांवरी पाखरू ये निळे


कशी बाई सावळ्याची जादू अशी निळी?

श्रीरंगही निळे आणि अंतरंग निळे


गीतकार-वसंत बापट

 

-भक्ती

Tuesday, August 20, 2024

फलाफल

 फलाफल



काहीतरी चुरचुरीत खायची इच्छा होती.खुप दिवस अख्खे हिरवे मूग वापरून रेसिपी झाली नव्हती.

रात्री दीड वाटी हिरवे मूग ,एक वाटी हरभरा डाळ,अर्धी वाटी तांदूळ आणि अर्धा चमचा मेथ्या एकत्र भिजवलेल्या.सकाळी जिरे, आलं तुकडा,दोन मिरच्या टाकून मिक्सरमधून भिजलेल्या डाळी जाडसर वाटून घेतल्या.

आता कांदा आणि कोथिंबीर चॉपरमधून बारीक केले.वाटलेल्या मिश्रणात चिरलेला कांदा, कोंथिबीर,धनेपूड,एक चमचा तिखट, स्वादानुसार मीठ घातलं.

छानपैकी मध्यम आकारात थापून खरपूस तळून घेतले.नुसत्या दह्याबरोबर खात आस्वाद घेतला.

नंतर परदेशी स्थायिक मैत्रिणीने  सांगितले की मागची मूग-हरभराडाळ वडे म्हणजे फलाफलसारखीच रेसिपी आहे.तेव्हा थोडं फलाफल विषयी शोधलं तर त्यात हरभरा डाळीऐवजी काबूली चणा किंवा हरभरे वापरतात हे समजलं. लगेच तीसुद्धा परत करून पाहिले.रेसिपी मागच्या सारखीच. 



नंतर एका मैत्रिणीने सांगितले श्राद्धासाठी असेच डाळी धुवून वाळवून त्याची भरड करून वडे करतात ते भरड वडे.
-भक्ती


Sunday, August 18, 2024

कृष्णाच्या गोष्टी-९

 ***धर्मराज्य हरपले

युधिष्ठिराच्या हातून कृष्णाने धर्मसत्ता प्रस्थापित केली असली तरी, अभिषिक्त सम्राट युधिष्ठिर होता. त्या सत्तेचे तो केंद्र होता. त्यामुळे युधिष्ठिरालाच दक्षपणे नव्याने स्थापन केलेल्या धर्मराज्याचे संरक्षण करणे आवश्यक होते. ही गोष्ट युधिष्ठिराने ध्यानी घ्यावी आगि निश्चिततेची भावना मनात मुळीच बाळगू नये म्हणून महर्षी व्यासांनी युधिष्ठिराचा निरोप घेताना सम्राटाच्या या जबाबदारीची त्याला स्पष्ट जाणीव दिली. महाभारताच्या सभापर्वातील वेदव्यासांचे ते उद्गार काळाची पावले ओळखणारे आहेत.


त्वामेकं कारणं कृत्वा कालेन भरतर्षभ। समेतं पार्थिवं क्षत्रं क्षयं यास्यति भारत। ९२॥ स्वस्ति तेऽस्तु गमिष्यामि कैलासं पर्वतं प्रति।अप्रमत्तः स्थितो दान्तः पृथिवीं परिपालय ।१३।।

(महाभारत, सभापर्व ४६)

'विकारवश न होता अत्यंत सावधपणाने राज्याचे संरक्षण कर'

व्यासांचा आणि कृष्णाचा इशारा ध्यानी घेऊन तेरा वर्षे पर्यंत संकट टाळण्यासाठी युधिष्ठिराने आपल्या वागण्याची ठरविलेली पद्धत, बंधूंना अगर कुणा राजालाहि कठोर न बोलण्याचा केलेला निश्चय, सर्वांच्या अनुमतीने कुठलेहि कार्य करण्याची केलेली प्रतिज्ञा, आणि सर्वांशी कसोशीने चांगले वागण्याचा आणि बोलण्याचा केलेला निश्चय, त्याला आणि त्याच्या बंधूंना येणाऱ्या महासंकटापासून वाचवू शकला नाही. राजाने अधर्मसंयुक्त आणि अनर्थसंयुक्त व्यवहार टाळलेच पाहिजेत. ही गोष्ट राजा असूनहि पुढल्या काही वर्षांत तो विसरला. आणि द्यूताचा तो अनर्थ घडला. 

***द्युत





राजसूय यज्ञानंतर सर्व राजेरजवाडे ऋषीमुनी आपापल्या स्थानी परतले तरी दुर्योधन हस्तिनापुराला त्वरित परतला नाही. युधिष्ठिराच्या वैभवाने त्याला दिपवले होते. मयसभेत फिरताना झालेल्या त्याच्या फजितीला द्रौपदी हसल्यामुळे त्याचे विलक्षण द्वेषात रूपांतर झाले होते. त्या द्वेषाग्नीने जळत, चडफडत तो हस्तिनापुरी परतला. मार्ग शकुनीने त्याला सुचविला म्हणाला युद्धाशिवाय वैभव मिळविल्याना एकच मार्ग आहे. दुर्योधना तो म्हणजे छूट, फाशांचा खेळ। सम्राट युधिष्ठीराला द्युत आवडते, पण त्यातले बारकावे समजत नाहीत. द्वंद्वाचे आव्हान द्युताचे  अगर द्युताचे  निमंत्रण क्षत्रियाला नाकारता येत नाही. युवराजाने, राजा धृतराष्ट्राजवळ तो विषय काढला. तेव्हा सत्ता आणि वैभव यांचा लोभी असलेल्या धृतराष्ट्रानेहि त्या गोष्टीस मान्यता दिली.

" हस्तिनापुराच्या उपनगरात, द्युतासाठी एक खास सभागृह दुर्योधनाने बांधून घेतले. मयसभेशी तुलता येण्यासारखे ते नसले तरी त्याची बांधणी डोळ्यात भरण्यासारखी होती. या सभागृहाचे नाव 'जयंतसभा' ठेवण्यात आले. वागण्याच्या आपल्या नव्या धोरणाप्रमाणे कौरवांना दुखवायचे नाही म्हणून युधिष्ठिर आपल्या चारहि बंधूंसह, द्रौपदी व कुंतीसह हस्तिनापुरात हजर झाला जयंतसभागृहात राज्याच्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत द्यूताला सुरवातहि झाली. युधिष्ठिर एकामागून एक डाव हरत होता. संपत्ती, हिरे, पाचू अलंकार, सोने, राज्य एकामागून एक डावांवर लावून, तो ही सारी संपत्ती हरला. कौरवांच्या गोटांत जल्लोष चालला होता. राजा धृतराष्ट्रहि त्यात सामील झाला होता, तो अंध राजा 'काय झाले? 'काय हरले? असे पुन्हा पुन्हा विदुराला विचारीत होता. विदुर, राजाला हा अनर्थ थांबविण्याची विनंती करीत होता. पण धृतराष्ट्राला जणू विदुराचे म्हणणे ऐकूच येत नव्हते. आपली सारी, भौतिक संपत्ती आणि राज्य हरल्यानंतर द्यूताची धुंदी चढलेल्या युधिष्ठिराने एकामागून एक आपले बंधू डावावर लावले आणि ते डावहि तो हरला. अखेर शेवटी स्वतःला डावावर लावूनहि युधिष्ठिर हरला आणि महापराक्रमी बलदंड पांडव दुर्योधनाचे दास झाले. मजा म्हणून सुरू झालेल्या डावातून महाभयंकर अनर्थ उभा राहिला.. शकुनीने धर्मराजाला साम्राज्ञी द्रौपदीची आठवण देऊन तिला डावावर लावायचे सुचविले, आणि भीमसेनाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. खेळाची धुंदी चढलेल्या युधिष्ठिराने द्रोपदीला डावावर लावले आणि तो डावहि तो हरला. भारताची सम्राज्ञी कौरवांची दासी झाली!


***द्रौपदी वस्त्रहरण



साऱ्या सभेलाच तो जबरदस्त धक्का होता. त्याने सारी सभा दिङ्मूढ झाली. दुर्योधनाने उद्दामपणे विदुराला, द्रौपदीला सभागृहात आणण्याची आज्ञा केली. 'हे करणे उचित नव्हे. सम्म्राज्ञी दासी झालेली नाही. कारण युधिष्ठिर दास झाल्यानंतर त्याने तिला डावावर लावले आहे.', असे सांगण्याचा निष्फळ प्रयत्न विदुराने चालविला. पण त्याकडे दुर्लक्ष करून दुर्योधनाने द्रौपदीला सभेत आणण्यासाठी प्रतिहारीला पिटाळले. पण तो लगेच परत आला. द्रौपदीने त्याला, सम्राटाने स्वतःला आधी डावावर लावले की सम्राज्ञीला? असा प्रश्न विचारला होता. दुर्योधन भयंकर संतापला. म्हणाला, 'जा तिला म्हणावे इथे येऊन काय तो प्रश्न विचार ? पण प्रतिहारी जागचा हलेना, तो थरथर कापत उभा रहिला. तेव्हा दुर्योधनाने दुःशासनाला द्रौपदीच्या महाली जाऊन ती जशी असेल तशी तिला फरफटत सभागृहात आणण्याची आज्ञा केली. 

आपण एकवस्त्र आहोत, रजस्वला आहोत, अशा स्थितीत सभागृहात येणे उचित नाही असे दुःशासनाला सांगण्याचा तिने प्रयत्न केला. पण तो नृशंस ऐकेना. द्रौपदीने त्याच्या हातून सुटून गांधारीच्या महाली जाण्याचा प्रयत्न केला. पण त्या उद्दाम माणसाने तिचे लांबसडक केस पकडले. आणि तिला खेचीत फरफटत तो सभागृहात घेऊन आला. द्रौपदी रडत होती. संतापली होती.

 पण सभागृहात येताच सारी सभा तटस्थपणे, दुःशासनाने चालविलेली आपली विटंबना पहात स्तब्ध असलेली पाहून संतापाने तिचे अश्रू आटले. क्रोधभरल्या धरधरत्या आवाजात तिने सभागृहाला प्रश्न केला, 'खरेच मी दासी झाले आहे का? सभेतील कुरुवृद्धांच्या माना खाली गेल्या. पितामह भीष्मांनीहि तिच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची टाळले. त्यांचे उत्तर धर्माधर्माची व्यर्थ चिकित्सा करणारे होते. 'युधिष्ठिराला त्याच्या मनाविरुद्ध कपटपटू शकूनीबरोबर दूत खेळायला लावण्यात व्याय होता का? जिथे युधिष्ठिर जिंकण्याची कधीच शक्यता नव्हती तो कपटी खेळ सभागृहातील कुरुवृद्धांनी थांबवायला नको होता का?, जे उचित बोलत नाहीत ते वृद्धच नव्हेत, ज्यात सत्याचा अंश नाही ते उचित नव्हे, आणि जे अविचाराला प्रवृत्त करते ते सत्य नव्हें.सारी सभा किंकर्तव्यमूढ झाली होती. 

एकट्या विकर्णाने द्रौपदीची बाजू घेतली, 'ती दासी झालेली नाही, असे ठणकावून सांगितले. पण सभेत सारी वडीलधारी आणि वयस्क मंडळी हजर असताना आपले शहाणपण पाजळणाऱ्या विकर्णाची राधेयाने चेष्टा केली. आपल्याहून वडील माणसांपुढे बोलू नये हे सुद्धा त्याला कळत नाही असे तो म्हणाला. त्याच्या मते एका ऐवजी पाच नवऱ्यांना वरणारी द्रौपदी एक निर्लज्ज स्त्री होती. दास झाल्यानंतर पांडवांना, अगर तिला अंगावर राजवस्त्र ठेवण्याचा हक्कच नव्हता. राधेयाने दुःशासनाला पांडवांची राजवस्त्रे काढून घेऊन ती दुर्योधनाच्या स्वाधीन करण्याची सूचना केली. अधिक विटंबना नको म्हणून पांचहि पांडवांनी आपली राजंवस्त्रे काढून ठेवली. आणि उघड्या अंगाने ते सभेत बसले!




द्रौपदी रजस्वला होती. एकवस्त्रा होती. दुःशासन तिचे वस्त्र फेडू निघाला. आपल्या राणीची अब्रू वाचवायला ते असहाय्य होतेः या विवित्र परिस्थितीतून स्वतःचे रक्षण करण्यासाठी तिने कृष्णाचा धावा सुरू केला.

आकृष्यमाणे वसने द्रौपद्याश्चिन्तितो हरिः। गोविंद द्वारकावासिन् कृष्ण गोपीजनप्रिय ।।४१ कौरवैः परिभूतां मां किं न जानासि केशव। हे नाथ हे रमानाथ व्रजनाधार्तिनाशन। कौरवार्णवमग्नां मामुद्धरस्व जनार्दन ।।४२ कृष्ण कृष्ण महायोगिन् विश्वात्मन् विश्वभावन। प्रपन्नां पाहि गोविन्द कुरुमध्येऽ वसीदतीम् ।।४३ (म. भा. स. प. अ. ६८)

आणि अहो आश्चर्यम्। दुःशासनाने तिच्या वस्त्राला हात घातला, ते फेडूत बाजूला टाकले, तर बारा वेगळ्या रंगाचे दुकूल तयार। दुःशासन द्रौपदीची वस्त्रे एकामागून एक फेडीत होता. आणि द्रौपदीच्या जणू शरीरातून नवनवी विविधरंगी वस्त्रे तयार होत होती. दुःशासन रागारागाने नवनवीन वस्त्रे खेचीत होता. त्याच्या पलीकडे वरांचा ढीग पडला, तरी द्रौपदीला विवस्त्र करणे त्याला शक्य झाले नाही. दमून तिच्या वस्वहरणाचा प्रयत्न सोडून दिला आणि तो आपल्या आसनावर बसला.

संतापलेल्या भीमाने चढ्या स्वरात द्रौपदीच्या अपमानाची भरपाई करण्यासाठी युद्धात दुःशासनाची छाती फोडून त्याचे रक्त पिण्याची प्रतिज्ञा केली. दुःशासन हसला. राधेयाने त्याला द्रौपदीला दासीवशात पाठवण्याची सूचना केली. त्यावर दुर्योधन पुढे म्हणाला, 'बघ, तुझ्या नवऱ्यांनाहि तू दासी झालेली नाहीस असे वाटत नाही. आता तू राधेय म्हणाला त्याप्रमाणे आम्हा कुणालाही पसंत करून त्याच्या बरोबर राहायचे ठरव.' आणि भीमाला चिडवण्यासाठी त्याने आपली डावी मांडी उघडी करून द्रौपदीला दाखविली. 'हीच तुझी डावी मांडी माझ्या गदेने फोडून युद्धात मी तिचे चूर्ण करीन.' अशी भीमाची महाभयंकर दुसरी प्रतिज्ञा सभेने ऐकली.

 पाठोपाठ राधेयाचा युद्धात वध करण्याची अर्जुनाची प्रतिज्ञा, गांधाररान शकुनीला ठार मारण्याची सहदेवाची प्रतिज्ञा, शकुनी-पुत्र उलूकाला मारण्याची नकुलाची प्रतिज्ञा सभेत ऐकू आली आणि आंधळा धृतराष्ट्र अस्वस्थ झाला. द्रौपदीला सहानुभूती दाखवीत त्याने तिची स्तुती केली. आणि आपल्या पुत्रांती केलेल्या तिच्या अवमानामुळे आपल्याला अतीव दुःख झाल्याचेहि त्याने तिला सांगितले. 

आणि 'हवा तो वर मागून में असे सुबविले. द्रौपदीने धृतराष्ट्राजवळ बुधिष्ठिराला दास्यातून मुक्त करण्याचा वर मागितला. राजा, आणखी एक वर माग असे म्हणाला, तेव्हा तिने इतर चारही पांडवांची मुक्तता करून घेतली. अन्यायाचे परिमार्जन करावे म्हणून 'आणखी एक वर मार्ग असे जेव्हा तो द्रौपदीला म्हणाला, तेव्हा तिने तिसरा वर मागणे धर्म्य नाही आणि माझे पती स्वतंत्र झाल्यानंतर जरूर तर पृथ्वीचे साम्राज्यहि ते स्वपराक्रमाने उभे करतील,असे ती त्याला म्हणाली. धृतराष्ट्राच्या या अचानक उद्भवलेल्या औदार्यामुळे दुर्योधन, दुःशासन,राधेय व शकुनी गोंधळून गेले. तरी सुद्धा राधेयाने पांडवांना 'बायकोच्या पुण्याईने बाचगारे भाग्यवान् आहात' असा टोला मारायला कमी केले नाही. 

***पुनर्द्युत 



युधिष्ठिराने चुलत्याची आज्ञा मिळताच बंधूसह आणि द्रौपदीसह त्वरित इंद्रप्रस्थी परतण्याचा निर्णय घेऊन हस्तिनापूर सोडले. पण दुर्योधनाने, राजा धृतराष्ट्राचे मन परत बळवून पुनर्द्युतसाठी युधिष्ठिरप्रमुख पांडवांना हस्तिनापुरी परत पाचारिले. 'युधिष्ठिराने, शकुनी बरोबर द्युताचा एकच निर्णायक डाव खेळावा' अशी त्याला विनंती करण्यात आली. या डावात जो हरेल त्याने, बारा बर्षे वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास स्वीकारावा. अज्ञातवासाच्या वर्षात जेत्याने जिताला शोधून काढल्यास, त्याने पुन्हा बारा वर्षे वनवास भोगावा, आणि या अवधीत नेत्याने सम्राटपद भोगावे अशी बोली ठरली.

 दुर्योधनाच्या वतीने या वेळीहि गांधारराज शकुनीने फासे टाकले, डाव जिंकला. त्यामुळे दुर्योधनाच्या पदरी साम्राज्य अलगद पडले. आणि पांडवांच्या नशिबी बारा वर्षांचा दुर्दैवी वनवास आला.

***शाल्व वध

पांडवांवर आणि त्यांच्या साम्राज्यावर हा उत्पात कोसळत असताना कृष्ण कुठे होता? आपल्या द्वारकेवर कोसळलेल्या शाल्व नामक एका पर्यकर संकटाशी झुंजण्यात तो गुंतला होता. शाल्व कृष्णद्वेष्टा होता. शिशुपालाचा आणि जरासंधाचा मित्र होता.. त्यासाठी त्याने घोर तपस्या करून शंकराला संतुष्ट केले. आणि त्याच्या कडून 'सौभ' नावाचे एक खास वाहन मिळविले. हे वाहन खूप मोठे होते. त्यात अनेक प्रकारची शस्त्रात्रे ठेवता येत. हे वाहन शस्त्रास्त्रासह हवेत उडू शकत असे आणि जमिनीप्रमाणे पाण्यावरूनहि चालू शकत असे.

इंद्रप्रस्थाहून परतल्यावर काही महत्त्वाच्या कामासाठी रामकृष्ण आनर्त देशाला गेले असता, शाल्वाने द्वारकेला वेढा घातला. आनर्तामध्ये रामकृष्णांना जेव्हा द्वारकेवरील हल्ल्याची बातमी समजली तेवहा ते त्वरित द्वारकेला यायला निघाले. पण तो पर्यंत शाल्व माघारी गेला होता. शाल्वाचा उद्दामपणा पाहून कृष्णाला खूप राग आला. त्याने त्वरित यादव सैन्य सुसंघटित करून शाल्वाच्या मर्तिकावत नावाच्या राजधानीवर जोरदार हल्ला चढविला. कृष्णसैन्याला तोंड देणे शाल्वाला कठीण झाले. त्याने सौभात बसून समुद्राकडे पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण कृष्णाने त्याचा पाठलाग करून सुदर्शनाच्या साहाय्याने त्याचे ते खास बाहन मोडून तोइत टाकले. समोरासमोरची लढाई न खेळता शाल्वाने मायावी युद्धाचा आश्रय घेतला. आणि कृष्णाला अनेक प्रकारे चकविण्याचा व फसविण्याचा प्रयत्न केला. परंतु शेवटी कृष्णाने एका तीक्ष्ण बाणाने शाल्याचे शिर घडावेगळे केले. 

जाहीरपणे कृष्णाशी बैर करणाऱ्या कंस, जरासंध, पौंड्रक, शिशुपाल या माळेतील शेवटचा दुष्ट यमसदनाला गेला.सौभपती शाल्व आणि कृष्ण यांच्या युद्धाची कथा अलौकिक पद्धतीने सांगितलेली असली तरी त्यात ऐतिहासिकता आहे, यात शंका नाही. याचे कारण पांडवांच्या वनवासाची बातमी कळताच त्यांना भेटण्यासाठी कृष्ण काम्यक बनात गेला असता, आपण शाल्वाशी लढण्यात गुंतलेले नसतो आणि द्यूताची बातमी आपल्याला समजली असती तर आपण हे अन्याय्य द्यूत होऊच दिले नसते. असे कृष्ण म्हणतो.

इथे एक प्रश्न उभा राहातो की द्यूताची हकिकत कृष्णाला माहीतच नव्हती तर द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी तिने त्याचा घांवा केला असता कृष्णाने तिला वस्त्रे पुरवून तिची लाज राखली, या गोष्टीची संगती कशी लावावी? म्हणजे पुन्हा बंकिमचंद्रांच्या पद्धतीने, ती कथा अलौकिक, अनैसर्गिक म्हणून त्याज्य ठरवायची, तर सम्राज्ञीचे भर सभेत वस्त्रहरण करून तिला नग्न करू पहाणारा दुःशासन, का, कसा आणि केव्हा थांबला? हे कळणे कठीण होते. माणसाची सद्विवेकबुद्धी त्याला, त्याच्या नीतिमत्तेच्या कडेलोटाच्या क्षणीच अडवते. त्याच्यातील नृशंसपणावर मात करते हेच खरे!

धर्मराजाचे धर्मसाम्राज्य प्रस्थापित झाले होते. शाल्याच्या वधाने कृष्णाचा शेवटचा शत्रु संपला होता. पण द्युतामुळे कृष्णाची सफलता क्षणजीवी ठरली.द्युत आणि पुनर्द्युत खेळण्याच्या बेड्या लहरीमुळे, कृष्णाने मोठ्या प्रयासाने घातलेली धर्मराज्याची घडी क्षणांत गडगडली

***वनवासातील कृष्ण-पांडवांच्या भेटी



पांडवांच्या वनवासाची बातमी ऐकताच कृष्ण काम्यक वनात बलराम, बसुदेव, सात्यकी यांच्यासह त्यांना भेटायला गेला. त्या काळी निरनिराळ्या राज्यांच्या परिसीमेवर काही जंगले होती. ती कुणाच्याच राज्यांना जोडलेली नव्हती. बानप्रस्थात जंगलात जाऊन राहणारे क्षत्रिय, तपश्र्चया करणारे ब्राह्मण, धनगर, गोपाल, काही शिकारी, वनवासी जमाती या जंगलांचा वापर करीत .

कृष्ण पांडवांना भेटायला गेला त्या वेळी त्यांच्या समाचाराला द्रौपदीचा भाऊ घुष्टद्युम्न, चेदिराज धृष्टकेतू, कैकयराज दोघे बंधू अशी पांडवांच्या परिवारातील मंडळी तिथे जमली होती 'द्यूत एक अन्याय होता. आत्ताच यादव पांचालांनी आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांनी हस्तिनापुरावर बालून जाऊन कौरवांचा पराभव करावा. आणि पांडवांचे राज्य त्यांना पुन्हा मिळवून द्यावे.' असा प्रस्ताव आणि यादव सात्यकी यांनी मांडला असता

 युधिष्ठिर म्हणाला, 'नाही मित्रांनो, मी चूक केली आहे. त्याचे प्रायश्चित वनवास भोगून मी केलेच पाहिजे. माझ्या बरोबर माझ्या भावांना आणि माझ्या पत्नीलाहि हे भोगावे लागणार आहे. याचे कारण त्यांची प्राक्तने माझ्याशी जोडलेली आहेत. आम्ही सोसले पाहिजे ही दैवगती आहे आणि ती अटळ आहे.'

. सात्यकीने असेहि सुचविले होते की कौरवांचा पराभव केल्यानंतर पांडवांच्या राज्यावर तात्पुरती योजना म्हणून अर्जुनपुत्र अभिमन्यूला बसवावे. युधिष्ठिराने बंधूसह सत्यधर्माचे परिपालन म्हणून, आपला वनवास संपवून परत आल्यावर पुन्हा राज्यपद ग्रहण करावे. (वनपर्व अ. १२०, श्लोक २३, २४) त्यावर कृष्ण म्हणाला, 'तुझे म्हणणे खरे आहे. सात्यकी, मी ते प्रत्यक्षात आणलेहि असते. पण हा युधिष्ठिर स्वतःच्या बाहुबलाच्या भरवंशावर जी भूमी जिंकलेली नाही तिचा स्वीकार कधीहि करणार नाही. दुसऱ्याच्या भरवशावर तो कधीही राज्य करणार नाही. त्यामुळे 'स्थितस्य गतिः चिंतनीया' या न्यायाने धर्मराज्याची घडी पुन्हा बसविण्यासाठी पांडवांचा वनवास संपेपर्यंत वाट पहाणे आवश्यक आहे.' कृष्णाने सर्वांनाच ते पटवून दिले. 

कृष्ण युधिष्ठिराला एवढेच म्हणाला, 'युधिष्ठिरा, नियतीने माझे आयुष्य तुझ्या बरोबर बांधले आहे. त्यामुळे तुझे शत्रू ते माझे शत्रू. मी त्यांचा पुरा नाश करीन. तात्काळ ही गोष्ट करायला नको असेल तर तुमचा वनवास संपल्यानंतर ते करता येईल. त्या सर्वांचा नाश अटळ आहे आणि हा फक्त कालगतीचा प्रश्न आहे.'



कृष्ण आणि धृष्टद्युम्न द्रौपदीच्या सांत्वनास गेले तेव्हा राधेय, दुर्योधन, दुःशासन यांनी केलेला आपला अवमान आठवून द्रौपदीच्या अश्रूचा बांघ फुटला. रडत, हुंदके देत ती कृष्णाला म्हणाली, 

'कृष्णा बलंदंड पांडवांच्या या राणीकडे पहा. अग्निजांत धृष्टद्युम्नाच्या आणि यादववीर कृष्णाच्या बहिणीला केसांना धरून फरफटत त्या दुष्टाने भर सभेत नेले. कुरू वृद्ध भीष्म आणि धृतराष्ट्र हजर असलेल्या त्या सभेत ते पशू तिला दासी म्हणाले. माझ्या पाची पराक्रमी पर्तीच्या देखत त्या दुष्ट दुःशासनाने माझे वस्त्र फेडण्याचा प्रयत्न केला. यापेक्षा काही भयंकर असू शकते काय? ते कसे घडले ते मला कळले नाही. 

पण कृष्णा, माझ्या पतींनी पत्नीची सोडवूणक करण्यासाठी ते केले नाही. ते माणसे नाहीत,ते पुरूष नाहीत,त्यांच्या पाच मुलांची मी आई आहे पण मला पुत्र नाहीत. मला पतीहि नाहीत. मला भाऊहि नाहीत. आणि जगात माझे कुण्णी कुण्णी नाही!'

कृष्णाने तिच्या पाठीवर हात फिरवीत तिचे सांत्वन केले. म्हणाला 'रडू नकोस द्रौपदी. थोडी थांब. तुझे अश्रू फुकट जाणार नाहीत. कौरवांच्या बायकांना तुझ्याहूनहि अधिक घाय मोकलून रडावे लागेल. मी प्रतिज्ञा करतो. की मी साऱ्या कौरवांचा नाश घडवून आणीन.' म्हणाला, 'धर्मशास्त्राच्या एका नियमाप्रमाणे एक दिवस म्हणजे एक वर्ष. तुम्ही आता तेरा दिवस वनवासात काढले आहेतच, तेव्हा वचनभंग न करताहि तुम्हाला आता कौरवांवर हल्ला करता येईल. जो अन्याय आहे, त्याच्याशी मुकाबला करताना असा युक्तिवाद मांडून त्याचे परिमार्जन करायला हरकत नाही.'

कृष्णाच्या या युक्तिवादावर युधिष्ठिर फक्त विषण्णपणे हसला. काहीच बोलला नाही. कृष्णहि हंसला म्हणाला, 'तुला पटत नाही असे दिसते? ठीक आहे आम्ही सारे तुमचा वनवास संपण्याची वाट पाहू.' असे म्हणून यादवांनी आणि पांचालांनी पांडवांचा निरोप घेतला.



वनवासाच्या काळात कृष्ण पांडवांना तीन वेळा भेटला. पहिल्या भेटीचे वर्णन वर आलेच आहे. दुसऱ्या भेटीत सात्यकीने केलेल्या सूचनेचाहि उल्लेख वर आला आहे. तिसरी भेट दुर्वास-भोजनाची आणि सूर्य-थाळीची. पांडवांसाठी भोजन तयार करणारी थाळी देणे, दुर्योधनाने वनांत राहणाऱ्या पांडवांची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी हजारो शिष्यांसह दुर्वासाने सायंकाळी पांडवांकडे जाऊन भोजन मागावे म्हणून त्याला उद्युक्त करणे, सूर्यास्तानंतर थाळी भोजन देत नसल्यामुळे द्रौपदीने कृष्णाचे स्मरण करणे, कृष्णाने तिथे हजर होऊन द्रौपदीजवळ काही खायला मागणे, तिने सूर्य-थाळीला चिकटलले एक पान त्याच्या हातावर ठेवणे, ते खाऊन कृष्णाने तृप्तीचा ढेकर देणे ,आणि मग त्यामुळे दुर्वांसांसुद्धा त्या सर्व शिष्यांची भूकच नाहीशी होणे, ही सगळी अलौकिक कथा अनैसर्गिक म्हणून त्याज्य मानायला हवी. 

'सूर्यथाळी हा प्रकार आजकाल वैज्ञानिकांनी शोधून काढलेल्या सौर शक्तीच्या साहाय्याने अन्न शिजविणाऱ्या थाळीचाच प्रकार होता का? हा संशोधनाचा विषय आहे. दैवी चमत्कार बाजूला ठेऊन द्रौपदीच्या सूर्यधाळीचे स्पष्टीकरण करायचे असेल तर ते अशाच प्रकारे केले पाहिजे असे प्रस्तुत लेखकाचे मत आहे.


***कृष्णजीवनातील शांततेचा काळ 

पांडवांचा बारा वर्षाचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास, ही तेरा वर्षे पार पाडली. त्याच्या जाहीर शत्रूचे पारिपत्य त्याने केले होते किंवा इतरांकडून करविले होते. त्यामुळे द्वारकेला सुबत्तेचा आणि शांततेचा काळ उपभोगता आला. कृष्णाने आता आपल्या आयुष्याची सत्तरी गांठली होती. त्यामुळे हा शांततेचा काळ वानप्रस्थी जीवन जगण्यात त्याने घालविला. 

अनेक ज्ञानी ब्राह्मण, मुनी, यती, ऋषी यांना द्वारकेत पाचरण करून त्याने योग आणि तत्वज्ञान या संबंधीच्या चर्चा त्यांच्याशी केल्या. कर्म, अकर्म, ज्ञान, तपश्चर्या असे विविध विषय यातून चर्चिले गेले. घोर अंगिरसासारख्या ज्ञानी ऋर्षीकडून त्याने उपनिषदांचे सार आत्मसात केले. 

बालपणी उत्कृष्ट मल्लयुद्ध खेळणारा एक मल्ल म्हणून कृष्णाची ख्याती होती. 

तरूणपणी एक ख्यातनाम धर्नुधर लढवय्या म्हणून आणि जाणकार राजकारणी, आणि धोरणी मुत्सद्दी म्हणून आपली प्रतिमा त्याने प्रस्थापित केली होती.

 आयुष्याच्या उतरणीच्या या काळी एक मोठा तत्वज्ञ, नीतिज्ञ, धर्मज्ञ, योगी, योगयोगेश्वर कृष्ण म्हणून तो ओळखला जाऊ लागला.

***पांडवांचा वनवास

बारा वर्षांच्या काळात युधिष्ठिराने भेटायला येणाऱ्या ऋषिमुनींकडून खऱ्या धर्माचे स्वरूप शिकून घेतले. तर अर्जुनाने इंद्राकडून आणि शंकराकडून पाशुपतास्त्रासारख्या खास अस्त्रांची प्राप्ती करून घेतली. जंगलातील जीवनात देणाऱ्या अनंत अडचणीपासून सवचि संरक्षण करण्याचे काम भीमसेनाने घेतले .वनांत आलेल्या दुर्योधन, दुःशासन, राधेय, आणि शकुनी यांची चित्रसेन गंधर्वाहाती झालेली विटंबना, त्यांना सोसावी लागलेली कैद, भीमार्जुनाहाती युधिष्ठिराने चित्रसेनाच्या हातून त्यांची केलेली सुटका आणि ते करीत असताना 'वयं पंचाधिकं शतं म्हणून घेतलेली उदार भूमिका, यामुळे पांडव खिजवले जाण्याऐवजी त्यांच्या किर्तीत भरण पडली.

याच काळात पिता धृतराष्ट्र आणि जेष्ठ  युधिष्ठिर जिवंत असता, राधेया हातून दिग्विजय करून युवराज असलेल्या दुर्योधनाने भ्रष्टपणे केलेला राजसूय यज्ञ आणि सिंधूपती जयद्रथाने द्रौपदीला पळवून नेण्याचा केलेला उद्दामपणा आणि नंतर भीमाहाती त्याची झालेली विटंबना या साऱ्या पांडवांच्या वनवासी जीवनातील महत्वाच्या घटना म्हणून उल्लेख करायला हवा.

 याच काळात घडलेली आणखी एक घटना म्हणजे 'मृत्युडोह' राखणाऱ्या यक्षाकडून चार पांडवांचा मृत्यू, आणि यक्षप्रश्नांना युधिष्ठिराने उत्तरे दिल्यानंतर त्यांना निळालेले जीवदान. ही घटना तशी अलौकिक. तो यक्ष प्रत्यक्ष यमधर्म असणे हेहि विचित्र आणि अनैसर्गिक. भांडारकर इंन्स्टिट्यूटने प्रसिद्ध केलेल्या शुद्धीकृत महाभारताच्या प्रतीत 'यक्षप्रश्न' हा प्रसंग प्रक्षिप्त ठरविला आहे. प्रस्तुत लेखकही त्या मताशी सहमत असून हा भाग युधिष्ठिराच्या समर्थनाकरिता आला असावा असे त्याचे मत आहे.



अज्ञातवासाचे तेरावे वर्ष पांडवांनी मत्स्यनरेश विराट याच्या राजधानीत काढले. वेष बदलून विविध व्यावसायिक म्हणून ही मंडळी तिथे वावरत होती. युधिष्ठिर कंक म्हणून, भीमसेन 'बल्लव' नावाचा आचारी म्हणून, अर्जुन 'बृहन्नला' म्हणून, नकुल 'दमग्रंथी' नामक अश्वपरीक्षक आणि अश्वशिक्षक बनला तर 'तंतिपाल' या नावाने सहदेव पशुवैद्य म्हणून विराटाच्या गोशाळेत दाखल झाला. द्रौपदी 'सैरंध्री' या नावाने राणी सुदेष्णेची वेषभूषा आणि केशभूषा करणारी दासी बनली. 

सैरंध्रवर, राज्यात सेनापतीच्या हुद्यावर असलेल्या कीचक नामक सुदेष्णेच्या भावाची नजर पडली. द्रौपदीच्या मागे तो लागल्याने भीमाला गुप्तपणे त्याला मारावे उन्मत्त कौरवांनी उत्तरेच्या बाजूने आणि दक्षिणेच्या बाह विराटाच्या गौळबाजातील गाई पळविण्याचा प्रयत्न केला, तेव्हा विराटन उत्तराचे सारस्थ करणाऱ्या बृहनलेने अज्ञातवासाचे वर्ष संपले आहे हे लक्षात येताच 'अर्जुन' म्हणून प्रकट होऊन, गाई पळविणाऱ्या कौरवांचा धुव्वा उडविला, विराटाच्या गाई सोडवून आणल्या. 

त्याने पांडवांची माफी मागून वर्षभर बृहन्नलेच्या वेषात राजकन्या उत्तरेला नृत्य शिकविणऱ्या अर्जुनाला तिच्याशी विवाह करण्याची विनंती केली. पण अर्जुनाने मुलीसारख्या उत्तरेशी विवाह न करता, सून म्हणून तिचा स्वीकार करण्याचे मान्य केले. अर्जुनसान्निध्यात एक वर्ष काढलेल्या राजकन्येची सामाजिक प्रतिष्ठा राखण्याच्या दृष्टीने ते आवश्यक होते.


***उपप्लाव्य

राजधानी जवळच्या उपप्लाव्य नगरात सम्म्राट युधिष्ठिराची ' वनवासी राजधानी' प्रस्थापित करण्यात आली. विराटाने खरे तर सारे मत्स्यराज्यच युधिष्ठिराला देऊ केले होते. (मत्स्यदेश म्हणजे हल्लीचे भरतपूर, नाभा, अलवार हे प्रदेश) पण युधिष्ठिराने आपल्या पुढील हालचालीसाठी उपप्लाव्य नामक या एका नगराचाच स्वीकार केला. उत्तरा अभिमन्यूचे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले.

 विवाह समारंभ उरकताच राजा द्रुपदाच्या पुढाकाराने जमलेल्या राजांची एक सभा आयोजिण्यात आली. पांडवांचा वनवास आणि अज्ञातवास संपला. पुढे काय? हा प्रश्न सभेपुढे विचारार्थ ठेवण्यात आला.

 कृष्णाने द्यूत, अनुद्युत, द्रौपदी वस्त्रहरण, बारा वर्षे वनवास, अपमानित जिण्याचा एक वर्षाचा अज्ञातवास या साऱ्या घटनांचा आढावा घेऊन, कपट द्यूतानंतर पांडव त्वरित कौरवांचे पारिपत्य करू शकले असते, ही वस्तुस्थिती मांडून, केवळ धर्मनिष्ठेमुळे पांडवांनी हे सर्व अग्निदिव्य सोसले आहे असे सांगितले. आणि पांडवांनी आपले राज्य परत मागण्यासाठी, धृतराष्ट्राच्या दरबारात आपला कुणी वकील पाठवावा या राजा द्रुपदाच्या सूचनेला दुजोरा दिला. धृतराष्ट्राने अगर दुर्योधनाने अन्यायाने गिळंकृत केलेले युधिष्ठिरांचे राज्य सामोपचाराने परत करण्यास नकार दिल्यास युद्ध अरेल, असेही तो म्हणाला. (म. भा. ज. प.१५) 



उद्योगपर्वाच्या पहिल्या अध्यायातील कृष्णाचे हे भाषणे खरेतर मुळातूनच वाचायला हवे. कृष्णाच्या यशस्वी आणि दैदीप्यमान मुत्सद्दीपणा राजकारणी महणून त्याचे श्रेष्ठत्व उद्योग पर्वातस दिसत असल्यामुळे 'भारते सारमुद्योगम् असे म्हटले जाते.

 तेरा वर्षात कौरवांनी इतर राजांशी आपले संबंध दृढ केले असल्याने, विद्यमान बहुसंख्य राज्यसत्तांचे साहाय्य त्यांना मिळणार, तेरा वर्षे समाजाच्या दृष्टिपथातून दूर असलेल्या पांडवाना इतके सहाय्…दोष देण्यात अर्थ नाही. आपल्या नम्रपणे मधुर शब्दांनीच दुर्योधनाशी जे काय बोलणे करायचे असेल ते केले पाहिजे.' (म. भा. ३.५.अ.२-१९.१२) वनपर्वांतील आणि उद्योगपतील बलरामाच्या बोलण्यात केली विसंगती आहे? 

ही विसंगती कुणी निर्माण केली? दुर्योधन, धृतराष्ट्र, भीष्म गांना एकेकाळी पापात्ये म्हणून संबोधणारा बलराम, पांडव-पक्षपाती म्हणून कृष्णाला दोष द्यायला तयार होतो, आणि आपल्या मनांत दुर्योधनाला साहाय्य करायचे आहे असे बोलूनही दाखवितो. फक्त बंधुप्रेमाने कौरव पांडवांत युद्ध उभे राहिले असता तटस्थ राहायचे ठरवून तीर्थयात्रेला निघून जातो. याचे मर्म तेरा वर्षाचा दीर्घ कालावधी हेच होय

सात्यकीने आणि द्रुपदने बलराम दादाच्या भाषणातील सुराला विरोध दर्शविला. 

पण दुर्योधन युद्धाशिवाय पांडवांचे राज्य कधीहि परत करणार नाही ही आपली अटकळ व्यक्त करून राजा द्रुपदाने युद्धासाठी मदत मागण्यासाठी पांडवांनी आपले दूत विविध देशींच्या राजांकडे त्वरित पाठवावेत असा प्रस्ताव मांडला. कारण युद्धाकरता ज्याच्याकडून प्रथम निमंत्रण येईल त्याला युद्धात साहाय्यभूत होण्याचा रिवाज त्या काळी राजमंडळात होता. या बाबतीत आपण दुर्योधनावर मात केली पाहिजे असे द्रुपदाचे म्हणणे होते. 

द्रुपदाचे भाषण आणि सूचना ऐकून कृष्ण म्हणाला 'पांडवांच्या हिताची सर्व जिम्मेदारी राजा द्रुपदाने उचलल्यामुळे माझ्या डोक्यावरचा भार खूपच हलका झाला आहे. हृपदासारख्या महारथ्याने पुढची सर्व पावले उचलावीत. आपण म्हणाल तेव्हा पांडवांच्या बाजूने लढण्यासाठी यादव हजर होतील.' 

आणि कृष्णाने बलरामासह द्वारकेकडे प्रयाण केले. ** *

-संदर्भ शोध कृष्णाचा -प्रवासी पूर्णत्वाचा,

लेखक प्रा डॉ राम बिवलकर 

Sunday, August 11, 2024

कायगाव टोका -प्रवरासंगम



 भूयस्तु शरमुद‍्धृत्य कुपितस्तत्र राघवः।

सूर्यरश्मिप्रतीकाशं ज्वलन्तमरिमर्दनम्॥ १३॥


संधाय सुदृढे चापे विकृष्य बलवद‍्बली।

तमेव मृगमुद्दिश्य श्वसन्तमिव पन्नगम्॥ १४॥


मुमोच ज्वलितं दीप्तमस्त्रं ब्रह्मविनिर्मितम्।

शरीरं मृगरूपस्य विनिर्भिद्य शरोत्तमः॥ १५॥


मारीचस्यैव हृदयं बिभेदाशनिसंनिभः।

तालमात्रमथोत्प्लुत्य न्यपतत् स भृशातुरः॥ १६॥


अरण्यकांड सर्ग ४४, वाल्मिकी रामायण 


रामाने रागाने पुन्हा बाण उचलला

ते सूर्याच्या किरणांसारखे चमकत होते आणि शत्रूंना चिरडत होते 13. 13.

त्याने ते मजबूत धनुष्याने निश्चित केले आणि जोराने खेचले

मोठ्याने श्वास घेणाऱ्या सापाप्रमाणे त्याने त्या हरणाकडे पाहिले १४॥

त्यांनी ब्रह्मदेवाने बनवलेले ज्वलंत अस्त्र सोडले

सर्वोत्तम बाणांनी हरणाच्या शरीराला छेद दिला 15. 15.

गडगडाटाने मारिचाच्या हृदयालाच छेद दिला.

अत्यंत व्यथित होऊन त्याने ताडाच्या झाडावरून उडी मारली आणि खाली पडला 16.

****

मायावी हरणाने म्हणजे मारीची याने गोदावरीच्या कडे कडेने प्रभूराम यांना झुंजवत या कायगाव टोके या  ठिकाणा पर्यंत आणले. त्याचवेळेस प्रभुराम यांच्या लक्षात आले की हा नक्कीच कोणीतरी मायावी आहे. तेव्हा त्यांनी बाण मारून त्याचा वध केला. त्या बाणाचे टोक येथेच जमिनीत रुतले होते. म्हणून गावाचे नाव तीर्थ क्षेत्र टोका, असे पडले. या ठिकाणी गोदावरी नदीला धनुष्याचा आकार असल्याने तिला बाणगंगा असेही म्हणतात. 


रामाने कार्य सिद्ध होऊन स्थापन केलेले शिवाचे सिद्धेश्वर मंदिर, मारीच नावाच्या राक्षसाने सुवर्णमृगाचे रूप धारण केले होते त्याचा देह म्हणजे काया जेथे पडली ते कायगाव, रामेश्वर व मारीच राक्षसाला ज्या ठिकाणी मुक्ती मिळाली ते मुक्तेश्वर असे विविध संदर्भ अनेक ग्रंथांत कायगाव टोके या गावाचे आढळतात.







प्रवरा ही महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातून उगम पावणारी नदी आहे. हिला मुळा, आढळा, म्हाळुंगी या उपनद्या मिळतात. ही नदी पुढे गोदावरीला जाऊन मिळते. प्रवरानदीच्या किनाऱ्यावर अकोले, संगमनेर, कोल्हार, नेवासा ही प्रमुख गावे आहेत. नदी रतनवाडीला उगम पावुन प्रवरासंगम येथे गोदावरी नदीस मिळते.


प्रवरा आणि गोदावरी यांचा संगम नेवासापासून जवळ असलेल्या टोका या गावी झाला आहे. या गावाला एक तीर्थक्षेत्र म्हणून संबोधले जाते. हा भाग म्हणजे रामायणातील दण्डकरण्याचा भाग आहे, असे आजही त्याचे महत्व आहे.


या संगमाच्या बाजुलाच भगवान शंकराचे मंदिर आहे. बाजूलाच सिद्धेश्वर, घोटेश्वर, रामेश्वर, मुक्तेश्वर, संगमेश्वर, बाण गंगा अशी मंदिरे आहेत.

पेशवेकालीन सन १७०० नंतरची ही मंदिरे हेमांडपंथी आणि नागरशैलीचा वापर करत बांधली आहे.नगरच्या टाकळी ढोकेश्वरच्या पळशीचे मंदिरही जमीनदारी मिळालेल्या पेशवे सरदाराने बांधले होते तसेच कोण्या सरदारांच्या मदतीने (धन) ही मंदिरे बांधली असावीत.

नगर- संभाजी नगर रस्त्याच्या देवगड पुढेच डावीकडे नदीवरचा पुल सुरू होण्यापूर्वी एक रस्ता या मंदिराकडून आपल्याला घेऊन जातो.पहिल्यांदा घटेश्वर मंदिर यांचे दर्शन होते.मग पुढे गेल्यावर रेखीव शिल्पांच्या सौंदर्याने नटलेले सिद्धेश्वर मंदिर आहे.मंदिर प्रवरासंगमाच्या काठावर पूर्वाभिमुख पण प्रवेशद्वार पश्चिमेसही आहे.पूर्वेच्या प्रवेशद्वारवर मोठा सज्जा म्हणजेच नगारखाना? आहे.

हे मंदिर तीन देवतांच्या मंदिरात विभागले आहे.

१.सिद्धेश्वर

मधोमध भव्य मुख्य शंकराचे सिद्धेश्वरचे मंदिर आहे.शिववाहन नंदीची नंदी मंडपात घुंगरूमाळ चढवलेली आकर्षक भव्य मूर्ती आहे.



मंदिर मंडपामध्ये खांबांवर भारवाहक यक्ष आहेतच.गर्भगृहातील शंभूची पिंड अत्यंत सुखदायक आहे.(योगायोगाने आम्हांला पुजाऱ्यांनी  आरतीची संधी दिल्याने तिथले वातावरण माझ्यासाठी आणखीच आनंददायी झाले.)तिथेच कुठल्यातरी देवीची २ फूट उंच ही मूर्ती आहे,ती कोणती समजली नाही.मंदिराच्या बाहेरील बाजूला रेखीव शिल्पांची रेलचेल आहे. यात पहिल्यांदा एक हत्तीवर बसलेले पेशवे? याच मंदिराची प्रतिकृती असलेले शिल्प आहे.पुढे ताक घुसळणाऱ्या गोपी, कालिया मर्दन, अर्जुन आणि भीम गर्वहरण, शिवपार्वती नंदी ही छोटी शिल्पे आपल्याच उंचीसमोर कोरलेली आहेत.समोरच्या भिंतीवर विष्णू दशावतार कोरलेले आहेत.हा दशावतार पट निश्चितच आतापर्यंत पाहिलेल्या पटांपैकी खूप सरस आहे.कारण यातल्या प्रत्येक अवताराच्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने दाखवल्या आहेत.राम अवतारात रावणाचे शिल्प अधिक संशोधन करण्यासारखे आहे.तसेच मत्स्य आणि कूर्म अवताराचे आहे.कली अवतार मी पहिल्यांदाच नीट पाहिला.आता दुसऱ्या भिंतीवर विविध वाद्ये टाळ,पखवाज,वीणा वाजवणाऱ्या सुंदरी आहेत.तर एक शिल्पात सुंदरीने धनुष्य धरले आहे?.एक आयताकृती मोठे शिल्प म्हणजे द्रोपदी स्वयंवरपट अर्जुन धनुष्य घेत वर असलेल्या माशाचा वेध घेत आहे.जवळच बाकी पांडव,द्रुपद आहे.












२.विष्णू मंदिर 

डाव्या बाजूला सुंदर अशा विष्णूवाहन गरूड देवाची २-३ फूट गुडघ्यांवर बसलेली गरूड मुर्ती आहे.पण वरती कृष्ण गोपी शिल्प आणि रासलीलेचे गोलाकार नृत्य शिल्प आकर्षक आहे.








छोटेखानी या मंदिरावर चहू बाजूंनी अष्ट दिक्पाल यांची शिल्पे आहेत.

आठ दिशांचे पालन करणाऱ्या आठ देवांना ही संज्ञा आहे. इंद्र, अग्‍नी, यम, निर्ऋती, वरुण, वायू, कुबेर आणि ईशान हे अनुक्रमे पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैर्ऋत्य, पश्‍चिम, वायव्य, उत्तर आणि ईशान्य ह्या आठ दिशांचे पालन करणारे अष्टदिक्पाल म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची वाहने अनुक्रमे ऐरावत, छाग (मेंढा), महिष, पुरुष, मकर, हरीण, दशाश्वथ (अथवा अश्व अथवा शश) व वृषभ ही होत. आयुधे अनुक्रमे वज्र, शक्ती, पाश व दंड, खड, नागपाश, ध्वज, गदा आणि त्रिशूल ही होत. 

३.देवी मंदिर

उजव्या बाजूला देवीचे मंदिर आहे.मंदिराच्या बाहेरील भिंतींवर सप्तमातृकांची शिल्पे आहेत.आदिशक्तीचे भिन्नभिन्न रुपे आहेत. प्रमुख पुरुष देवतांच्या शक्ती आहेत. ब्रह्मापासून ब्रह्माणी, विष्णूपासून वैष्णवी, शिवापासून माहेश्वरी, कार्तिकेया पासून कौमारी, इंद्रापासून इंद्राणी/ऐन्द्री वराह अवतारापासून वाराही तर देवीपासून चामुंडा अशी शक्ती उत्पन्न झाली. आणि काही ठिकाणी चौसष्ट योगिनीपैकी नारसिंही (प्रत्यंगिरा देवी), देवीचाही अन्य मातृकामध्ये उल्लेख आढळतो. अशा वेळी त्यांना अष्टमातृका असे म्हणतात.

या मंदिरात नारसिंही मातृदेवताही आहे हे विशेष!

मंदिराच्या एका बाजूला सुंदर महिरपी असलेल्या असंख्य खांबांच्या रांगांची एक पडली आहे.अगदी राजस्थानीशैलीच्या महालांसारखी..


आता मंदिराच्या समोरच तो प्रसन्न दोन जीवनदायिनी प्रवरा -गोदावरी संगमांचा शांत वाहणारा प्रवाह मनाचा ठाव घेत राहतो.

-भक्ती