Saturday, December 16, 2023

डॉ.स्वामिनाथन -३ (भारतीय हरितक्रांती घडली)

 


फोटो सौजन्य - livemint.com

डॉ.स्वामिनाथन -३ (भारतीय हरितक्रांती घडली)

ब्रिटीश राज्यानंतर स्वतंत्र भारताकडे प्रमुख जबाबदारी होती प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्येला पोसायची.ब्रिटीश धोरणांमुळे शेतीमध्ये क्रांती ऐवजी शेतकरी शोषण आणि दुष्काळ यांसारख्या समस्या सतत आजूबाजूला असता.अजूनही ‘जहाजाच्या अन्नावर ‘अवलंबून असणाऱ्या भारताचे प्रतिमा बदलण्यासाठी प्रथम पंतप्रधान नेहरू यांनी शेतीमध्ये संरचनात्मक ,संस्थात्मक सुधारणा करण्यासाठी वैज्ञानिकांना उपाययोजना करण्यास सांगितले.१९४७-१९६१ पर्यंत अनेक पायाभूत सुविधनाचा समावेश शेतीत होत गेला.परंतु तंत्रज्ञानातील मागासलेपणामुळे अजुन्ही हवी तशी उत्पादकता मिळत नव्हती.याचा परिणाम असा की अजुनही पीएल-४८० सारख्या करारानुसार अमेरिकेकडून निकृष्ठ गव्हाची आयात भारताला सहन करावी लागत असे.१९६१ चीन युद्धानन्तर त्यात आणखीनच भर पडून दरही खूप वाढवले गेले.पण Begging Bowl to Bread Basket असा प्रवास लवकरच होणार होता.

१९६१ साली डॉ.ए.बी जोशी यांच्या नेतृत्वात एक टीम जगातील  विविध शेती संशोधन संस्था यांना भेट देत होती.तेव्हा मेक्सिकोतील बोरलॉग यांच्या संशोधनाने भारावलेल्या टीमने त्यांना भारतात पाचारण करण्याचे ठरवले.फोर्ड फोंडेशान यांनी याबाबत आर्थिक मदत देण्याचे ठरवले.यासाठी काही टन गहू बियाणे तात्काळ आयात करण्याची परवानगी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिली.

बोरलॉग यांची टीम आणि डॉ.स्वामिनाथन यांनी दुसऱ्या पंचवार्षिक योजने अंतर्गत ही योजना राबविण्याचे ठरविले.

डॉ .स्वामिनाथन आणि सहकाऱ्यांनी राबविलेले काही मुद्दे-

१.HYV high yeilding variety अधिक उत्पादन देणारे बियाणे शेतकऱ्यांना पुरवणे.यासाठी बोरलॉग यांनी बनविलेलेया चार ३.सोनोरा ६४  ४. सोनोरा ६३ ५.लर्मारोजा ६४ आणि मियो ६१४ या प्रजातींबरोबर segregrating lines(F2-F5) याही भारतात आणल्या गेल्या.

(या बुटक्या गव्हामुळे जनावरांना चार कमी पडेल अस म्हणत काही वैज्ञानिकानी याला विरोधही केला.पण या योजनेचा प्रमुख हेतू जनावरांपेक्षा माणसाच्या मुखात  अन्न पडावे हा स्पष्टच होता त्यामुळे याला विरोध मावळला.

२.प्रदेश निवड- प्राथमिक चरणासाठी पाण्याची व जमिनीची उपलब्धता अधिक असणारे राज्ये म्हणजे पंजाब,हरियाणा,पश्चिम उत्तर प्रदेश यांची निवड करण्यात आली.

३.सिंचन-सिंचन सुविधेसाठी अनेक विहिरीई,ट्युबवेल बनविण्यात आल्या.

४.रासायनिक खते-भारतात सैन्द्रीय खतांचा वापराच होत असे.तेव्हा पिकांमध्ये रोग पडू नये,त्यांची रोगप्रतिकार क्षमता सुधारावी यासाठी नायट्रोजन,पोटाशियm,सल्फर युक्त रासायनिक खत पुरविण्यात आले.

५. आधुनिक उपकरणे-ट्रक्टर,नांगर ,मुबलक वीज पुरविली गेली.

६. कृषी सहायत्ता दुप्पट करण्यात आली.

७.कृषी मूल्य आयोग बनवून हमीभाव देण्याचे मान्य केले.

८.कृषी विज्ञान केंद्राची स्थापना करून माहिती सहज मिळावी याची उपाय योजना केली.

या सर्व गोष्टींवर योग्य कार्यवाही करण्यात आली.अनेक शेतकर्यांनी याचा स्वीकार केला आणि १९६६-१९६८ या काळात गहू धान्याच्या उत्पादनात तिपटीने वाढ झाली.

याच बरोबर तांदूळाच्या विकसित प्रजाती जया,रत्ना या  तैवान जैपोनिक सुधारित जातीतून IRRI,Philippins यांनी विकसित करून भारतात पाठवल्या.इतर तीन पिके बाजरी,मका,ज्वारी या पिकांच्याही उत्पादनात वाढ झाली.

जून १९६८ साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात हरितक्रांती घडली आहे याची घोषणा केली.८ मार्च १९६८ ला विल्ययम एस गौड यांनी जगातल्या वाढत्या शेती उत्पादाकेहून ग्रीन रिव्होल्युशन हा शब्द पहिल्यांदा वापरला होता.


फोटो सौजन्य -ट्विटर

दुसऱ्या टप्प्यात म्हणजे ७३-८३ मध्ये आंध्र,तामिळनाडू,कर्नाटक,गुजरात,महाराष्ट्र,पूर्व उत्तर प्रदेश याठिकाणी गहू ,तांदूळ बरोबरीनेच धने या पिकांत विक्रमी वाढ दिसली.महाराष्ट्रातीलं हरित क्रांतीसाठी पंजाबराव देशमुख आणि वसंत नाईक यांचे योगदानही बहुमुल्य होते.

तिसऱ्या टप्प्यात पूर्वेकडील राज्ये बिहार,उडीसा,बंगाल येथे हरित क्रांती घडली.

काही शेतकरी या उत्पादनातील गहू लाल आहे आणि पोळ्या नीट होत नाही याची तक्रार करू लागले तेव्हा segrigrating lines वापरून प्रयागांतीसोनालिका,कल्याण रोजा या सुधारित प्रजाती बाजारात आणल्या.(सध्या लोकवन,शरबती,राजवाडी,खपली गहू इ.या बनवलेल्या प्रजाती लोकप्रिय आहेत).

हरितक्रांतीचे सकारात्मक परिणाम-

१.अन्नधान्याच्या बाबतीत भारत आत्मनिर्भर झाला.

२.धान्याची निर्यात वाढून आयात थांबली

३.दुष्काळावर सहज मात करता येवू लागली.

४.अल्प भू धारक शेतकरी कमी उत्पादन,कर्जबाजारीपणा या समस्येतून सुटला.

५.उत्पादन वाढल्यामुळे आर्थिक सुबत्ता वाढली.एक संपन्न जीवनशैली शेतकरी जगू लागला.

६.गैर कृषी ग्रामीण समाज उदयाला आला.अनेक इतर शेतीपूरक व्यवसाय वाढले.

हरीक्रांतीचे नकारात्मक परिणाम

१.विषमता-हरितक्रांतीचा पहिला टप्पा यशस्वी पणे पंजाब हरियाणा भागात झाला इतरत्र यांची यशस्विता त्याप्रमाणात थोडी कमीच होती.त्यामुळे शेतकरी वर्गात विषमता आढळली.

२.जमीनीच्या किंमती वाढल्या.

३.रासायनिक खतांच्या अमर्यादित वापरांमुळे अनेक रोगांचा शिरकाव माणसांत झाला.पोटाश,सल्फर पाण्यात मिसळून संपर्कात येत गेले.कर्करोगाचा विळखा कित्येक कुटुंबात झाली. प्राणी-जनावरही यामुळे अधिक रोगांना बळी पडून वंध्यत्वही दिसले.

एव्हरग्रीन रिव्होल्युशन(Evergreen Revolution)

रासायनिक खतांच्या अमर्यादित वापरामुळे ही ग्रीन रिव्होल्युशन Green Revolution -ग्रीड रिव्होल्युशन(Greed Revolution)मध्ये बदलली होती.ही बाब डॉ.स्वामिनाथन यांना आता अस्वस्थ करीत होती.याबाबत त्यांना हरितक्रांती अशास्त्रीय पद्धतीने राबवल्याचे अनेक आरोप कायम सहन करावे लागले. इस्का,वाराणसी १९६८ मध्ये याबाबत  खंत बोलूनही दाखविली.गांधीजींचे अनुयायी असलेल्या डॉ.स्वामिनाथन यांनी यापुढे  एव्हरग्रीन रिव्होल्युशन(Evergreen Revolution)वर काम करण्याचे ठरवले आणि ते आजन्म केलेही....

-भक्ती

No comments: