'निर्णय ही एक मानवी प्रक्रिया ,बुद्धीच्या आणि मनाच्या झुंजीतून याचा जन्म होतो . कधी तो एकट्याने तर कधी तो सामूहिक रीतीने अस्तित्वात येतो.कोणत्याही निर्णयापर्यंत पोहचण्याची प्रक्रिया पण वेगवेगळ्या ... खूप दीर्घ अशी विचारांची खलबत .... तर कधी एका झटक्यात ....निर्णय .
(सध्याच्या.. त्रिकुट vs मी पुन्हा येईनचच बघा ना.)
आता ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर .. निर्णय अंमलबजावणीत आल्यावर इतिहास बदलतो....
सकारात्मक -नकारात्मक बदल घडतात.या बदलांमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर बोटे ठेवणारे हि अनेक .... मात्र भरपूर अस्तर लावलेल्या ह्या निर्णयावर ठाम राहण्याची क्षमता हवी. हीच 'निर्णय क्षमता' ..... उच्च पदावरच्या व्यक्तीच्या विकासात हीचा अधिक वाटा.
आपण आपल्या निर्णयावर शंकाग्रस्त न होता ठाम असू तर त्याला निर्णय म्हणता येईल ....नाहीतर सारा पोरखेळच.
@भक्ती..
No comments:
Post a Comment