Friday, August 29, 2025

नभीची चंद्रकोर उतरली



 आठवणींची गर्दी दाटली

मेंदीच्या रेषेत तुझी चाहूल 


नभीची चंद्रकोर उतरली

कमळ सौंदर्याची पडली भूल


नाजूक स्वप्नांची नक्षी रंगली

सख्याची साथ निरंतर अनमोल


नयनी तुझ्या चंद्रकोर न्हाली

काळोखातही स्वप्नांना आधारवेल


शीतल राती कळी उमलली

स्मित तुझे ,उमलले कमलदल


प्रेमाची सावली मिठीत गंधाळली 

बहरले ते नाजूक रानफूल


-भक्ती




Saturday, August 23, 2025

बेसरबिंदी - 'ग्रेस' एक स्मरण

 बेसरबिंदी - ग्रेस एक स्मरण






कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ग्रेस यांच्या ध्वनिमुद्रीत आवाज त्यांच्या अनवट वाटेच्या कवितांच्या सौंदर्याचे तत्त्व  उमलून सांगतात. आणि ग्रेस यांच्याच सुरेल गीताचे स्वर कानी पडतात...


प्रकाश गळतो हळूहळू 

चंद्र जसा उगवे 

पाण्यावरती उमटत जाती 

अंधूक अंधूक दिवे ...


दूर सनातन वृक्षांनाही

हिरवट गंध मूका

दुःख सुरांचा क्षितिजापाशी

मेघ दिसे परका...


बस... एका अनवट प्रकाशातून ग्रेसांचे स्मरण सुरु होते. बेसरबिंदीतील सादर झालेल्या कवितांचे,ललितबंधांचे,गीतांचे विषेशत्व  जाणवले की, ग्रेस यांच्या नेहमीच्याच  प्रसिद्‌ध कवितांपेक्षा वेगळ्या कवितांचा,लेखांचा यात मागोवा आहे.


कार्यक्रमाच्या संहितेमध्ये ग्रेस यांच्या कवितेच्या सृजनाचे अनेक पैलू स्पर्शित केले गेले. ग्रेसांना प्रिय असलेली भगवी संध्या, आईची गुढ माया, पावसाची  निरव रिमझिम, दुःखाची कातरवेळ आणि अजून बरेच काही..


ग्रेसांनी लिहिलेले अनेक ललितलेखन कार्यक्र‌मात सुंदररीत्या गुंफले आहेत. सुरुवातीलाच 'तोडाचा डोह'' काळजाला पिळवटून टाकतो. सादरकर्त्याच्या आव‌ा‌जाची धीर-गंभीरता त्या डोहाच्या वातावरणाचा आभास तंतोतंत उभा करतो.


तांदूळ मोजणाऱ्या मुलींची कथा व्यथा खोल शिरते. एलिझाबेथच्या शेवंतीच्या रोपांनी कशी मानवातील अहंकाराच्या मूळापाशी कधी नेले कळलेच नाही... प्रश्न शेवतींचा नाही एलिझाचा आहे.


नको मोजू माझ्या 

मुक्तीच्या अंतरे 

ब्रम्हांडाची दारे 

बंद झाली ..


माझ्या आसवांना 

फूटे हिमगंध 

मागे-पुढे बंध 

पापण्यांचे..


ग्रेसांची  दग्ध मुलींचे संध्यागीत यात संध्याकाळचे हिरवट दुःखाचे तरंग उमटत राहतात.


पक्षी पक्षी व्याकूळ व्याकूळ रुतवून काटा उर अभंग दग्धमुलींचे विरक्त हसणे संध्येपाशी एक तरंग

..

...

....

मी स्मरणाने गंध अचंबित संध्यामायेचा कल्लोळ|


ग्रेस यांच्या लिखाणाला दुर्बोधताचा शाप नाही तर  ते वरदान आहे कारण Making Sense From Non Sense हे परीसस्परीस शक्तीचे द्योतक आहे.


मी महाकवी दुःखाचा 

प्राचीन नदीपरी खोल 

दगडाचे माझ्या हाती 

वेगाने होते फूल - 

ग्रेस


अशा या प्रिय ग्रेस यांच्या स्मरणाची संध्या मी अनुभवली ABAA(आबा) 'अहमदनगर बॅकस्टेज आर्टिस्ट असोशिअसन यांच्या अभूतपूर्व सुंदर बेसरबिंदी यां कार्यक्र‌मामधून!


विविध क्षेत्रात स्थिरावलेल्या पण २०-२२ वर्ष कलेच्या अनेक रंगी तंतूने जोडलेल्या या गुणी प्रतिभावंत कलाकारांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. बेसरबिंदीचा  पहिला कार्यक्रम एफ.टी.आय(FTII) ओल्ड मेन थिअटर ,पुणे येथे सादर झाला. यातील सादरीकरण केवळ गीत, लेख यानेच  सजलेले नाही तर  प्रकाश योजना, नेप्यथ्य याच्या परीपूर्ण साथीने चमकले आहे.


प्राचीताईच्या आंतरजालावरच्या मैत्रीने मी या कार्यक्रमाच्या संगतीत आले. काल प्राचीताई आणि सर्व कलाकारांच्या या 'बेसरबिंदीने' ग्रेस यांच्या स्मरणाचे चांदणं मनभरून स्पर्शून आले.


हा कार्यक्रम अजिबात चुकवू नका.नक्की पहा!



-भक्ती



Friday, August 22, 2025

बैलपोळ्या निमित्ताने

 #बैलपोळा

#मातृदिन

#६४_योगिनी


आंतरजालावर bull  आणि bull with hump शोधा.दोन्ही चित्रे मिळतील .मग समजते कि बैलांच्या उत्क्रांतीमध्ये वातावरणाचा खूप मोठा भाग आहे. 





आज आपण पाहतो ते बैल, म्हणजे पाळीव गुरांची एक प्रजाती, ऑरॉक्स (Aurochs) नावाच्या एका जंगली प्राण्यापासून विकसित झाले आहेत. हा प्राणी आता नामशेष झाला आहे.झेबू हा भारतीय भागात आढणारा बैलाची विशिष्ट प्रजाती आहे.सुमारे 10,000 वर्षांपूर्वी, मध्य पूर्व (आताचे तुर्की) आणि भारतीय उपखंडात ऑरॉक्स (Bos primigenius) या मोठ्या, जंगली गुरांना पाळीव बनवण्याची प्रक्रिया सुरू झाली.बर्फ़ाळ भागात याक या    

या प्रजातीने  प्राणवायू कमी असलेल्या भागात स्वतः:च्या   लाल  रक्तपेशी वाढवून मानवाला साथ दिली तर पाठीवर नांगर घेऊन झेबूच्या वंशांच्या भारतीय  शेतीला  साथ दिली. 


दोन मुख्य प्रजाती: या पाळीव बनवण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे आजच्या आधुनिक गुरांच्या दोन प्रमुख प्रजाती उदयास आल्या:


#टॉरिन गुरांचे वंशज (Bos taurus): हे मध्य पूर्व आणि युरोपमध्ये विकसित झाले. या प्राण्यांना खांद्यावर कूबड (hump) नसते आणि त्यांचे कान सरळ असतात.

होल्स्टीन, जर्सी, अँगस, हेरफोर्ड इ. यांचा उगम युरोप, अमेरिका किंवा ऑस्ट्रेलियासारख्या थंड हवामानाच्या प्रदेशात झाला आहे.


#इंडिकाइन गुरांचे वंशज (Bos indicus): हे भारतीय उपखंडात (सिंधू खोऱ्याच्या आसपास) विकसित झाले. या प्राण्यांच्या खांद्यावर एक विशिष्ट कूबड असते आणि त्यांचे कान लोंबकळलेले असतात.  हे कूबड उष्णता सहन करण्यास आणि शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. याशिवाय, त्यांची सैलसर त्वचा आणि मोठे लोंबकळणारे कान उष्ण हवामानाशी जुळवून घेण्यासाठी उपयुक्त ठरतात.

भारतात आढळणारे बहुतेक बैल याच वंशाचे आहेत, ज्यांना आपण झेबू (Zebu) नावानेही ओळखतो.


#भारतीय_बैलांची_उत्क्रांती ही साधारणपणे ८,००० वर्षांपूर्वी सिंधू संस्कृतीच्या काळात सुरू झाली. हे बैल ऑरॉक्स (Bos primigenius) या जंगली गुरांच्या एका भारतीय उप-प्रजातीपासून विकसित झाले आहेत, ज्यांना भारतीय ऑरॉक्स (Bos primigenius namadicus) म्हणून ओळखले जाते.


बैलांच्या उत्क्रांतीचे प्रमुख टप्पे:

पाळीवकरण (Domestication): उत्खननात सापडलेल्या पुराव्यांनुसार, मेहरगढ (आताचे पाकिस्तान) आणि सिंधू खोऱ्याच्या आसपासच्या प्रदेशात मानवाने जंगली बैलांना पाळीव बनवण्यास सुरुवात केली. यामुळेच, भारतीय बैल हे त्यांच्या युरोपियन आणि आफ्रिकन नातेवाईकांपेक्षा वेगळे आहेत.


जनुकीय वेगळेपण: भारतीय बैल, ज्यांना झेबू (Bos indicus) म्हणून ओळखले जाते, त्यांच्यामध्ये त्यांच्या युरोपियन नातेवाईकांपेक्षा काही खास जनुकीय आणि शारीरिक वैशिष्ट्ये आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या खांद्यावर असलेले कूबड (hump).


कृत्रिम निवड (Artificial Selection): मानवाने शेतीची कामे (नांगरणी, वाहतूक) आणि दुधासाठी उपयुक्त असलेल्या बैलांची निवड केली आणि त्यांची पैदास केली. यामुळे अनेक स्थानिक जाती (breeds) उदयास आल्या.


मानवी हस्तक्षेपामुळे झालेले बदल

मानवाने शेती आणि इतर कामांसाठी बैलांचा वापर सुरू केल्यावर, त्यांच्यामध्ये अनेक बदल घडवून आणले. याला कृत्रिम निवड (Artificial Selection) म्हणतात. माणसाने त्यांच्या गरजेनुसार शांत स्वभावाचे, मजबूत आणि अधिक काम करणाऱ्या बैलांची निवड केली आणि त्यांची पैदास केली. यामुळे जंगली ऑरॉक्सच्या तुलनेत आजच्या बैलांचे काही महत्त्वाचे बदल झाले:


आकार: पाळीव बैल त्यांच्या जंगली पूर्वजांपेक्षा लहान झाले.


स्वभाव: ते अधिक शांत आणि माणसाळलेले झाले, ज्यामुळे त्यांचा शेतीत वापर करणे सोपे झाले.


शारीरिक रचना: वेगवेगळ्या कामांसाठी (उदा. नांगरणी, वाहतूक) त्यांची शिंगे, कूबड आणि शरीर अधिक योग्य बनले.

#भारतीय_बैलांच्या_काही_प्रमुख_जाती:

खिलार: हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि मजबूत बैल आहेत, जे त्यांच्या वेग आणि सहनशीलतेसाठी ओळखले जातात.


कांकरेज: गुजरात आणि राजस्थानमध्ये आढळणारी ही जात दुहेरी कामासाठी (दूध आणि शेती) वापरली जाते.


गिर: गुजरातमध्ये आढळणारे हे बैल मुख्यतः दूध देणाऱ्या गावांसाठी प्रसिद्ध असले, तरी त्यांचे बैलही खूप शक्तिशाली असतात.


थारपारकर: राजस्थानमध्ये आढळणारी ही जात दुष्काळग्रस्त आणि उष्ण हवामानाला तोंड देण्यासाठी ओळखली जाते.



पिकासोचे evolution of bull हे चित्र


उत्क्रांतीचे पुरावे

बैलांची उत्क्रांती सिद्ध करण्यासाठी अनेक वैज्ञानिक पुरावे उपलब्ध आहेत.


पुराजीव विषयक पुरावे (Palaeontological evidences): लाखो वर्षांपूर्वीच्या ऑरॉक्स प्राण्यांचे सांगाडे आणि जीवाश्म सापडले आहेत, ज्यांचा अभ्यास करून त्यांचे आधुनिक बैलांशी असलेले साम्य सिद्ध होते.


बाह्यरूपीय पुरावे (Morphological evidences): आजच्या बैलांच्या हाडांची रचना (उदा. पायांची हाडे) आणि त्यांच्या जंगली पूर्वजांच्या हाडांची रचना यात खूप साम्य आढळते.


जनुकीय पुरावे (Genetic evidences): आधुनिक बैलांच्या डीएनएचा अभ्यास केल्यावर हे सिद्ध झाले आहे की त्यांचे जनुकीय स्वरूप ऑरॉक्सशी मिळतेजुळते आहे, ज्यामुळे ते एकाच पूर्वजाचे वंशज असल्याचे स्पष्ट होते.


थोडक्यात, बैलांची उत्क्रांती ही निसर्गाने घडवलेल्या नैसर्गिक निवडीचा आणि मानवाने केलेल्या कृत्रिम निवडीचा एक सुंदर संगम आहे, ज्यामुळे एक जंगली प्राणी माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला.


हा बैल पोळ्याचा एक महत्वाचा भाग परंतु आजच्या काळात अनेक वर्षांपासून हि पिठोरी अमावस्या #मातृदिन'  ओळखली जाते. स्त्रियांच्या रुपाला संतती देणारी म्हणून अधिक शक्तीरूपात पाहण्याच्या सिंधू संस्कृती नंतर खूप काळानंतर तंत्र सिद्धी या रूपात योग्य जाणणारी "योगिनी" स्त्री होत.



मीनानाथ यांच्याद्वारे या योगिनी कौलाची हि साधना प्रस्थापित करण्यात आली.माता ,बहीण ,पत्नी अशा उपासना विविध गुप्त पद्धतीच्या असत. आदिशक्तीपासून उत्पन्न ८ शक्तीच्या प्रत्येकी आठ रूपांची शक्ती मिळून ६४ योगिनी असाव्यात असे मानले जाते. शरीरातील ३२ धमन्यांमध्ये प्रत्येकी दोन योगिनीहि मानल्या जातात . 

ओरिसा ,भेडाघाट,मवाली,हिरापूर,राणीपुर,खजुराहो येथे हि मंदिर पाहता येतील. गोलाकार रचना असलेल्या मंदिरापासून भारताच्या गोलाकार संसदेची इमारत बनवली गेली. 



 ते सर्व ठीक आहे पण आधी पोटोबासाठी आज विशेष करून तांदळाची खीर,रव्याच्या साटोऱ्या केल्या ... तुमच्याकडे काय आहे मेन्यू ??



-भक्ती

लेखातील काही मजकूर AI माहितीस्रोतातील आहे.

Wednesday, August 13, 2025

#गीतारहस्य -प्रकरण८ विश्वाची उभारणी व संहारणी

 #गीतारहस्य 

#प्रकरण८ वे

( पान क्र. १०२-११८)

#विश्वाची_उभारणी_व_संहारणी


**विश्वाची उभारणी व संहारणी

सांख्याप्रमाणे प्रकृति व पुरुष या स्वतंत्र मूलतत्वांचे स्वरूप म्हणजे प्रकृति पुरुषासमोर आपल्या गुणाचा जो बाजार मांडते त्यास मराठी कवींनी 'संसृतीचा पिंगा' तर ज्ञानेश्वर महाराज यांनी 'प्रकृतीची टांकसाळ 'असे म्हटले आहे.


प्रकृतीच्या या व्यापारास समर्थांनी 'विश्वाची उभारणी व संहारणी' हे शब्द घेतले आहेत. भगवद्‌गीतेप्रमाणे प्रकृति आपला संसार चालविण्यास स्वतंत्र नसून ती हे काम परमेश्वराच्या इच्छेने चालवीत असते ,असे म्हटले आहे .( गी. ९.१०) परंतू कपिलांनी प्रकृति स्वतंत्र मानिली आहे. पुरुषाचा व तिचा संयोग झाला म्हणजे तिची टांकसाळे सुरू होते आणि प्रकृतीची मूळची साम्यावस्था मोडून तिच्या गुणांचा विस्तार होऊ लागतो असे सांख्यांचे म्हणणे आहे. उलटप‌क्षी वेदसंहितेत, उपनिषदांत स्मृती ग्रंथांत व प्रकृति मूळ न मानिता परब्रम्ह मूळ मानून त्यापासून 'हिरण्यगर्भ समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकः आसीत् 'प्रथम हिरण्यगमे (ऋ१०.१२१.१) आणि या हिरण्यगर्भापासून किंवा सत्यापासून सर्व सृष्टि झाली (ऋ. १०.७२, १०.१९०) किंवा प्रथम पाणी उत्पन्न होऊन  ऋ. १०.८२.६ ( त्यापासून सृष्टि त्यांत ब्रम्हदेव, ब्रम्ह‌देवापासून सर्व जग किंवा तोच ब्रम्हदेव अर्ध्या भागाने स्त्री झाला होता. अगर पाणी उत्पन्न होण्यापूर्वी पुरुष होता (कठ ४.६.) अगर ब्रम्हा-पासून प्रथम तेज, पाणी, व पृथ्वी (अन्न) ही तीनच तत्वे होऊन टंग मिश्रणाने पदार्थ झाले.


तथापि आत्मरूपी मूळ ब्रम्हापासूनच आकाशादिक्रमाने पंचमहाभूते निघाली (तै.उ. २.१.) हे अबेर वेदांतसूत्रात ठरविले.

वेदान्ती प्रकृति स्वतंत्र मानीत नसले तरी एकदा शु‌द्ध ब्रम्हातच मायात्मक प्रकृति, हा विकार दिसू लागल्यावर पुढील सृष्ट्युत्पत्तिक्रमासंबंधाने त्यांची आणि सांख्यांची अखेर एकवाक्यता झालेली होती, हे यावरून दिसून येते.


#सृष्ट्युत्पत्तिक्रमाची जुळणी


१.प्रकृतीची कळी उमलण्याच्या क्रमाबद्‌दल #गुणोत्कर्ष किंवा 'गुणपरिणामवाद' असे म्हणतात.


२.अव्यक्त प्रकृतीदेखील स्वतःची साम्यावस्था मोडून पुढे व्यक्त सृष्टि निर्माण करणाऱ्याचा निश्चय करीत असते, निश्चय म्हणजेच व्यवसाय, व तो करणे हे बुद्‌धीचे लक्षण आहे. म्हणून प्रकृतीत #व्यवसायत्मिक बु‌द्धी हा गुण प्रथम उत्पन्न होतो, असे सांख्यांनी ठरविले आहे.


३.मनुष्याला एखादे कृत्य करण्याची बु‌द्धी प्रथम होते, त्याचप्रमाणे प्रकृतिलाही आपला पसारा करण्याची बु‌द्धी प्रथम व्हावी लागते. या गुणास पाहिजे तर अचेतन / अस्वयंवेद्य म्हणजे स्वतः स न कळणारी बुद्‌धी म्हणा. (आधिभौतिक उदा. गुरुत्वाकर्षण / लोहचुंबकाचे आकर्षण).


४ प्रकृतित उत्पन्न होणारा बुद्‌धी हा गुण, सत्व, रज आणि तम या मिश्रणाचा असला तरी, त्यातील प्रत्येकाचे प्रमाण अनंत रीतींनीं भिन्न होत असल्यामुळे, या तिघांच्या प्रत्येकी अनंत भिन्न प्रमाणांनी झालेले बु‌द्धीचे प्रकारहि त्रिघात अनंत होऊ शकतात. हे सर्व इंद्रियगोचर असल्यान व्यक्त तत्त्व मानले जातात.


५.पण प्रकृति अजूनही एकजिनसी असते, तो मोडून बहूजिनसीपणा उत्पन्न होतो, यासच 'पृथकत्व म्हणतात

६.बुद्धीपासून पुढे उत्पन्न होणाऱ्या अन् पृथकपणाच्या या गुणासच #अहंकार' म्हणतात. कारण, पृथक् पणा 'मी-तूं' या शब्दांनीच प्रथम व्यक्त करण्यांत येत होता. म्हणजेच अहं-कार-अहं- अहं [मी-मी] करणे होय.

मूळ प्रकृतीत अहंकाराने भिन्न भिन्न पदार्थ बनण्याची शक्ति याप्रमाणे आल्यावर पुढील वाढीच्या दोन शाखा होतात.


१ झाडे, मनुष्य वगैरे #सेंद्रिय प्राण्यांची सृष्टि

२.#निरिंद्रिय पदार्थांची सृष्टि


** इंद्रिय याचा अर्थ इंद्रियवान प्राण्यांच्या इंद्रियांच्या शक्ती

 #सेंद्रिय प्राण्यांचा जड देह होतो. म्हणून फक्त इंद्रियांचा देहाचा समावेश जड म्हणजे निरिंद्रय सृष्टींत सांख्यांत सेंद्रिय सृष्टी म्हणजे देह विचार केला आहे. व आत्मा सोडून फक्त इंद्रियांचा विचार केला आहे.


अहंकार (एकूण १६ गुणोत्कर्ष)


#सत्त्वगुणोत्कर्ष

पाच इंद्रिये

पाच कर्मेंद्रिये व मन

(एकूण अकरा इंद्रिये)

#तमोगुणोत्कर्ष

निरिंद्रिय सृष्टी

पाच तन्मात्रद्रव्ये


९ तन्मात्रे - शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांची जिस तन्मात्रे, मिसळ न होता प्रत्येक गुणाची निरनिराळी अतिसूक्ष्म मूलस्वरुपे ही निरिंद्रिय सृष्टीची मूलतत्वे आहेत.

१०.या पंचतन्मात्रद्रव्यांपासून क्रमाक्रमाने स्थूल पंचमहाभूतें (यांस 'विशेष' असेहि नांव आहे) व स्थूल निरिंद्रिय पदार्थ होऊ लागतात, या पदार्थांचा यथासंभव अकरा सूक्ष्म इंद्रियांशी संयोग होऊन सेंद्रिय सृष्टि बनले, असे सांख्यांनी ठरविले आहे.


#स्थूलपंचमहाभूते व #पुरुष धरून याप्रमाणे एकंदर २५ तत्त्वे होतात. हे मूल प्रकृतिचेच विकार होत

त्यांतही विकार सूक्ष्मतन्मात्र व पाच स्थूल महाभूते हे द्रव्यात्मक असून बुद्धि, अहंकार गुण आहेत, ही असा भेद आहे. तेवीस व इंद्रिये या केवळ शक्ति किंवा तत्त्वे व्यक्त तर मूळ प्रकृति अव्यक्त


#ब्रम्हवृक्ष किंवा ब्रम्हवन [ ममा. अश्व ३५. २०-२३ व ४७.१२-१५] पान. नं १०८-१०९.

माह (मा, अश्व. २५. २०-२३ व ४७. १२-१५), 

अव्यक्तबीजप्रभवो बुद्धिस्कन्धमयो महान् ।

महाहंकारविटपः इन्द्रियान्तरकोटरः ।।

महाभूतविशाखश्च विशेषप्रतिशाखवान् ।


सदापर्णः सदापुष्पः शुभाशुभफलोदयः ।।


आजीव्यः सर्वभूतानां ब्रह्मवृक्षः सनातनः ।


एनं छित्वा च भित्त्वा च तत्त्वज्ञानासिना बुधः ।।


हित्त्वा सङ्गमयान् पाशान् मृत्युजन्मजरोदयान् ।


निर्ममो निरहंकारो मुच्यते नात्र संशयः ।।



"अव्यक्त (प्रकृति) हें ज्याचें बीं, बुद्धि (महान्) हें ज्याचें खोड, अहंकार हा ज्याचा मुख्य पल्लव, मन व दहा इंद्रियें हीं ज्याच्या आंतल्या ढोल्या, (सूक्ष्म) महाभूतें (पंचतन्मात्रे) या ज्याच्या मोठ्या शाखा, आणि विशेष म्हणजे स्थूल महाभूतें या ज्याच्या आडशाखा किंवा डहाळ्या, असा हा नेहमीं पानें, फुलें व शुभाशुभ फळें धारण करणारा, सर्व प्राणिमात्रांना

आधारभूत, पुरातन मोठा ब्रह्मवृक्ष आहे. याला तत्त्वज्ञानरूप तरवारीनें छेदून व त्याचे तुकडे तुकडे करून ज्ञानी पुरुषानें जन्म, जरा व मृत्यु उत्पन्न करणारे संगमय पाश तोडावे, आणि ममत्वबुद्धि व अहंकार यांचा त्याग करावा, म्हणजे तो निःसंशय मुक्त होतो." सारांश, हा ब्रह्मवृक्ष म्हणजेच 'संसृतीचा पिंगा' किंवा प्रकृतीचा अगर मायेचा 'पसारा' होय. याला 'वृक्ष' म्हणण्याची वहिवाट फार प्राचीन म्हणजे ऋग्वेदापर्यंत पोंचलेली असून, उपनिषदांतून यासच 'सनातन अश्वत्थवृक्ष असें म्हटलें आहे (कठ. ६. १). परंतु तेथे म्हणजे वेदांत या वृक्षाचे मूळ (परब्रह्म) वर आणि शाखा (दृश्यसृष्टीचा पसारा) खालीं एवढेच वर्णन केलेलें असतें. हैं वैदिक वर्णन आणि सांख्यांचीं तत्त्वें यांची जोड घालून गीतेंतील अश्वत्थवृक्षाचे वर्णन बनविलें आहे. हैं गीता १५.१ व २ या श्लोकांवरील आमच्या टीकेंत स्पष्ट करून दाखविलें आहे.


वर वृक्षरूपानें दिलेल्या पंचवीस तत्त्वांचेंच सांख्य आणि वेदान्ती निरनिराळ्या प्रकारें वर्गीकरण करीत असल्यामुळे, या वर्गीकरणाबद्दलचीहि थोडी माहिती येथें सांगितली पाहिजे. सांख्य असें म्हणतात कीं, या पंचवीस तत्त्वांचे मूलप्रकृति, प्रकृतिविकृति, विकृति आणि न-प्रकृति-न-विकृति, असे चार वर्ग होतात. (१) प्रकृतितत्त्व दुसऱ्या कोणापासून झालेलें नाहीं म्हणून त्यास मूलप्रकृति हैं नांव प्राप्त होतें. (२) ही मूलप्रकृति सोडून दुसऱ्या पायरीवर आलें म्हणजे महान् हें तत्त्व लागतें. महान् प्रकृतीपासून निघाला म्हणून तो 'प्रकृतीची विकृति किंवा विकार' आहे; व पुढें अहंकार या महान् तत्त्वापासून निघाला म्हणून महान् या अहंकाराचें प्रकृति किंवा मूळ आहे. एतावता महान् किंवा बुद्धि हा गुण एका बाजूनें अहंकाराची प्रकृति किंवा मूळ होतो; आणि दुसऱ्या बाजूनें मूळ प्रकृतीची विकृति म्हणजे विकार होतो. म्हणून सांख्यांनीं त्यास 'प्रकृति-विकृति' या वर्गात घातले आहे; व याच न्यायानें अहंकार व पंचतन्मात्रे यांचा समावेशहि 'प्रकृति-विकृति' या वर्गांतच करण्यांत येतो. जें तत्त्व अगर गुण स्वतः दुसऱ्यापासून निघालेलें (विकृति) असून पुढे आपणच दुसऱ्या तत्त्वांचें मूलभूत (प्रकृति) होतें त्यास 'प्रकृति-विकृति' असें म्हणतात. महान्, अहंकार व पंचतन्मात्रे हीं सात तत्त्वें अशा प्रकारचीं आहेत. (३) पण पांच ज्ञानेंद्रियें, पांच कर्मेंद्रियें, मन आणि स्थूल पंचमहाभूतें या सोळा तत्त्वांपासून पुढे दुसरी कोणतींहि तत्त्वें निघालेलीं नाहींत. उलट तींच दुसऱ्यापासून निघालीं आहेत. म्हणून या सोळा तत्त्वांस 'प्रकृति-विकृति' असें न म्हणतां नुसतें 'विकृति' किंवा 'विकार' असें म्हणतात. (४) पुरुष प्रकृति नाहीं व विकृतीहि नाहीं, तो स्वतंत्र व उदासीन द्रष्टा आहे.


११.मूलप्रकृतिरविकृतिः महादादयाः प्रकृतिविकृतयः सप्त । षोडषकस्तु विकारो न प्रकृतिर्न विकृतिः पुरुषः ।।

" मूळ प्रकृति ही अविकृति म्हणजे कशाचाच विकार नाही. महदादि साल, महत्, अहंकार व पंचतन्मात्र या प्रकृति विकृति होत. आणि मनासकट अकरा इंद्रिये व स्थूल पंचमहाभूतें मिळून सोळा तत्त्वांस नुसत्या विकृति किंवा विकार असे म्हणतात. पुरुष प्रकृति नाही आणि विकृति नाही. (सां.का.३)


१२.पण वेदांतशास्त्रात प्रकृति स्वतंत्र न मानता परमेश्वरापासून पुरुष व प्रकृति निर्माण होतात हा सि‌द्धांत आहे. त्यामुळे प्रकृति- विकृती या सांख्यभेद शिल्लक राहत नाही. ती परमेश्वरापासून उत्पन्न झाली असून ती प्रकृति-विकृतिच्या वर्गात येते.

वर्गात येते


१३.एका बाजूस जीव व दुसऱ्या बाजूस ८ प्रकारची प्रकृति निर्माण झाली. म्हणजे वेदान्त्यांनुसार पंचवीस तत्त्वापैकी सोळा तत्त्वे सोडून देऊन बाकी राहिलेल्या नऊ तत्त्वांचे जीव' व "अष्धा प्रकृति' हे दोनच प्रकार आहेत.


१४.गीतेत पुरुष' याला जीव म्हटले आहे, जी ईश्वराची 'परा प्रकृति - श्रेष्ठ रुप' आहे तर मूळप्रकृति गीतेत 'अपर' म्हणजे कनिष्ठ स्वरूप मानली जाते. (गी. ७.४५.)


# पंचीकरण - पाच महाभूतांपैकी प्रत्येकाचा कमीजास्त भाग घेऊन त्या सर्वांच्या मिश्रणाने नवा पदार्थ तयार होणे.


# पंचमहाभूते यांच्या उत्पत्तीचा क्रम तैतिरीयोपनिषदांत असा दिला आहे.


"आत्मनः आकाशः संमूतः । आकाशाद्वायुः । वायोरग्नि। अग्नेरापः ।


अद्‌भ्यः पृखिवी । पृथिव्या ओषधयः । इ"


आणि पंचमहाभूत निर्माण झाल्यानंतर.


'पृथिव्या ओषधयः । ओषधीभ्योऽन्नम् । अन्नात्पुरुषः"


१५.परंतू श्वेताश्वतरोपनिषद, छांदोग्योपनिषादांत पंचतत्त्वां ऐवजी तेज, आप व अन्न (पृथ्वी) ही तीनच मूलतत्वे त्रिवृत्कारणाने सृष्टी निर्माण झाली असे कोन आहे.


परंतू तैत्तरीय (२.१), प्रश्न (४.८), बृहदारण्यक ८४.४.५ वगैरे दुसया उपनिषदांतून, श्वेताश्वेतर (२०१२) वेदांत सूत्रर (२.३१-४) व शेवटी गीता (७.४, १३.५) यातही तिहींत ऐवजी पाच महाभूते सांगितली आहेत. गर्भोपिनिषदांत 'पंचात्मक' आहे असे आरंभीच म्हटले आहे.


#सचेतन तत्व-#पुरुष'


१..मूळ प्रकृतीपासून निघालेल्या पृथिव्यादि स्थूल पंचमहाभूतांम सूक्ष्म इंद्रियांशी संयोग झाला म्हणजे शरीर तयार होते पण ते सेंद्रिय तरीही जडच असते. या इंद्रियांना प्रेरणा करणारे तत्त्व जड प्रकृतिहून निराळे असून त्यास पुरुष म्हणतात.


२.हा पुरुष अकर्ता असून त्याचा प्रकृतीशी संयोग झाला म्हणजे सजीव सृष्टीस सुरुवात होते, व 'मी निराळा व प्रकृति निराळी हे ज्ञान झाल्यावर पुरुषाचा प्रकृतिशी झालेला संयोग लुटून तो मुक्त होतो.


#ज्ञानाखेरीज जो मनुष्य मरतो त्याच्या आत्मा प्रकृतीच्या चक्रांतून अजीबात सुटत नाही हे उघड आहे."


म्हणजेच ज्ञान नसतो प्राणी मेला तर मरतेवेळी त्याच्या आत्म्याबरोबर प्रकृतीच्या १८ तत्त्वांचे हे लिंगशरीर पंचमहाभूततत्त्वे) देहातून बाहेर पडते आणि ज्ञानप्राप्ती होईपर्यंत त्या पुरुषास नवे नवे जन्म घेण्यास लावीत असते.

(पान ११४)

३.पंचमहाभूते संपल्यावर इतर १३ तत्त्वे पंचतन्मात्रांसह राहते. पुढे वेदांतात कर्माकर्मानुसार तर सांख्यात सत्त्व, रज, तम गुणानुसार या लिंगशरीराला निवृत्ती अथवा देवयोनी (सत्व अधि मनुष्ययोनी (रज अधिक) तिर्थक्‌योनी (तमगुण अधिक] येथे जन्म प्राप्त होतो.


#संहार 

सांख्यशास्त्रानुसार मूळ अव्यक्त प्रकृतीपासून किंवा वेदांतानुसार मूळ सद्रूपी परब्रम्हापासून सृष्टीतील सर्व सजीव व निर्जीव व्यक्त पदार्थ क्रमाक्रमाने निर्माण झाल्यावर सृष्टीच्या संहाराची वेळ आली म्हणजे उभारणीचा वर जी गुणपरिणामक्रम सांगितला त्याच्या उलट क्रमाने सर्व व्यक्त पदार्थ अव्यक्त प्रकृतीत किंवा मून ब्रम्हांत लय पावतात असा सांख्य व वेदांत या दोन्हीं शास्त्रांचा सिद्‌धांत आहे.


पुढे श्रुतिस्मृतिपुराणांत ब्रम्हदेवांपासून / हिरण्य गर्भापासून / शैव / वैष्णव निमित्तकारणापासून सृष्टी कशी निर्माण झाली हे वर्णिले आहे.


भगवद्‌गीतेंतहि "मम योनिमहत ब्रम्ह" (गी. १४.३)असे त्रिगुणात्मक प्रकृतीलाच ब्रम्ह नाव देऊन या बीजापासून प्रकृतीच्या त्रिगुणाने अनेक मूर्ति झाल्या हे सांगितले.


तर (गी.१.६) मध्ये ब्रम्हदेवापासून सात मानसपुत्रांची उत्पत्ती व पुढे चराचर सृष्टी निर्मिती झाली आहे.


परंतू भागवतातील  संकर्षण, प्रद्युमन्न, अनिरुद्‌ध यांचा सृष्टीरचनेचा उल्लेख गीतेत कोठेही नाही. हा भागवत आणि गीता भेद पुन्हा दर्शित करतो.

-लोकमान्य टिळक